शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी स्वातंत्र्य काही प्रश्न

By admin | Updated: July 19, 2016 06:08 IST

सोयाबीन, कापूस अजूनही बाजार समित्यांच्या जोखडात आहे. एकीकडे फळभाज्या खुल्या करायच्या व दुसरीकडे डाळ आयात करायची हा शेतकरी हिताचा दृष्टिकोन असूच शकत नाही.

सोयाबीन, कापूस अजूनही बाजार समित्यांच्या जोखडात आहे. एकीकडे फळभाज्या खुल्या करायच्या व दुसरीकडे डाळ आयात करायची हा शेतकरी हिताचा दृष्टिकोन असूच शकत नाही. नागपुरातील कॉटन मार्केटमधील एक अल्पभूधारक शेतकरी परवा म्हणाला, ‘शेतात राबायचे, भाजीपाला काढायचा, शहरात नेऊन विकायचा, विक्री न झालेला माल इथे ठेवायचा कुठे ? गावात परत घेऊन जाताना पुन्हा भाडे द्यायचे कसे? भाजीपाल्याचे उत्पादन घेणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांच्या साखळीत मी भरडून जाईन. कालपर्यंत दलाल, व्यापारी भाव ठरवत होते. आता हे बडे शेतकरी ठरवतील’. फळ- भाजीपाल्याच्या थेट विक्रीचा निर्णय घेताना सरकारने या गरीब शेतकऱ्याला भेडसावणाऱ्या मूळ प्रश्नांची उत्तरे शोधून पर्यायी व्यवस्था केली असती तर त्याच्या मनात आज प्रश्नांची आंदोलने निर्माण झाली नसती.आता आपला शेतीमाल विकण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्याला मिळाले असले तरी त्या मार्गातील अडथळे दूर करण्याची जबाबदारी सरकारचीच राहाणार आहे. सोयाबीन, कापूस अजूनही बाजार समित्यांच्या जोखडात आहे. त्यांना त्यातून ज्या दिवशी मुक्तता मिळेल ती शेतकऱ्यांच्या जीवनातील परिवर्तनाची पहाट असेल. एकीकडे फळभाज्या खुल्या करायच्या व दुसरीकडे डाळ आयात करायची हा शेतकरी हिताचा दृष्टिकोन असूच शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात शेतजमीन भाड्याने घेऊन तिथे डाळीचे उत्पादन करणार आहेत म्हणे! मोदी सरकारचा हा निर्णय बावळटच नाही, तर शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाराही आहे. पुढच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोदी आणि त्यांचा पक्ष परदेशात मते मागायला जाणार आहे का? इथल्याच शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले तर या देशात डाळीची कोठारे निर्माण होऊ शकतात. पण सरकारला ते करायचे नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील फडणवीस सरकार जेव्हा फळे आणि भाजीपाला नियंत्रणमुक्त करण्याचा निर्णय घेते तेव्हा सरकारच्या शेतकरी हिताबद्दल काही प्रश्न आणि शंका निर्माण होतात. शेतकऱ्याला आर्थिक अडचणींच्या वेळी कुठलीही बँक दारात उभी करीत नाही. शेवटी त्याच्या मदतीला बाजार समितीतील व्यापारी व दलालच धावून येत असतात. त्या गरजू शेतकऱ्याला मदत करताना या व्यापाऱ्यांची वृत्ती प्रामाणिक नसतेच. ती सरंजामशाहीचीच असते. पण अशा वेळी शेतकऱ्याचा नाईलाज असतो. ज्या ग्राहकाला शेतकरी आपला माल विकणार आहे, तो मध्यमवर्गीय ग्राहक आज भाव करण्यास चटावलेला आहे. तो मॉल्स, शोरुममधील वस्तूंबाबत कधीच घासाघीस करीत नाही. पण भाजीच्या भावाबाबत मात्र नेहमीच साशंक असतो. तो साठेबाजही आहे. तो पेट्रोलची साठेबाजी करून ठेवतो आणि डाळ, कांदाही घरी साठवून ठेवतो. हाच ग्राहक एरवी शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांनी व्यथित होतो. त्याच्या घरी सांत्वनासाठी जाऊन कधी ‘नाम’ तर कधी ‘बेनाम’ मदतही करतो. पण कांद्याचे आणि शेतीमालाचे भाव वाढले की तोच रस्त्यावर येतो आणि या शेतकऱ्याला कस्पटासमान पाहू लागतो. शेतकऱ्याच्या संघर्षात तो त्याच्या पाठीशी कधीच उभा राहात नाही. या नव्या व्यवस्थेत या मध्यमवर्गीय ग्राहकांचा नवा साठेबाज, लुटेरा वर्ग निर्माण होणार नाही कशावरून? यापुढे शेतकरी स्वत:च भाजीपाला पिकवेल व स्वत:च बाजारात आणून विकेल. अशा वेळी पान ठेल्यावर बसून असलेल्या पोराने म्हाताऱ्या बापाच्या खांद्यावरचे ओझे आपल्या खांद्यावर घेतले पाहिजे. आज खेड्यांत शेतमजुरांची मोठी समस्या आहे. त्या शेतमजुरांनी शेतकऱ्याच्या हातात हात घालून भाजीपाला विकायला मदत केली तर त्यांचेही कल्याण होईल. हे सर्व यासाठी गरजेचे आहे की, पिढ्यान्पिढ्या पिळवणूक झालेल्या शोषितांनाही शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खुल्या बाजाराच्या स्वातंत्र्याचे लाभ मिळावे. अन्यथा या नव्या व्यवस्थेतून शोषणाची जुनी व्यवस्था संपुष्टात येऊन शोषणकर्त्यांची नवी जात उदयास येईल, कदाचित ती पूर्वीपेक्षा अधिक जुलमी असेल. - गजानन जानभोर