शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सैनिकहो, तुमच्यासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 16:19 IST

मिलिंद कुलकर्णी पुलवामा येथे पाकिस्तान पुरस्कृृत दहशतवाद्यांनी केलेल्या विघातक घटनेत ४९ भारतीय जवान शहीद झाल्याने संपूर्ण देशभर संताप आणि ...

मिलिंद कुलकर्णीपुलवामा येथे पाकिस्तान पुरस्कृृत दहशतवाद्यांनी केलेल्या विघातक घटनेत ४९ भारतीय जवान शहीद झाल्याने संपूर्ण देशभर संताप आणि शोक अशा संमिश्र भावना दाटल्या आहेत. पाकिस्तानचा ध्वज जाळणे, कँडल मार्च काढून शहिद सैनिकांना श्रध्दांजली वाहणे, रक्तदान शिबीर घेऊन शहिदांना आदरांजली वाहणे, ठिकठिकाणी फलके वाहून शहिदांचे स्मरण करणे अशा कृतीतून सामान्य नागरिक आपल्या भावना व्यक्त करीत आहे. देशप्रेम आणि सैनिकांविषयी आदरभावाला अशा प्रसंगी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येते.दहशतवादी हल्लयाने संतप्त झालेल्या देशवासीयांना शहिद सैनिकांविषयी जाणता वा अजाणता होणारी विपरीत कृती असह्य होते, याचीही अनुभूती याकाळात आली. हल्लयाच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली, त्यांची हास्यमुद्रा होती, यावरही नापसंती व्यक्त झाली. शहिद सैनिकाच्या अंत्यदर्शनाला गेलेल्या मंत्र्याने पादत्राणे न काढल्याने नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागले.लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला ‘जय जवान जय किसान’चा नारा हा भारतीय नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आणि हृदयाला थेट हात घालणारा आहे. प्रत्येक युध्दावेळी देश आणि देशातील नागरिक सगळे आपापसातील मतभेद विसरुन एकत्र येतात. अभूतपूर्व अशा एकतेचा परिचय देतात. हीच खरी देशभक्ती आहे. सैनिक रात्रेंदिवस सीमेवर जागता पहारा देत असल्याने आपण नागरिक सुखाने झोप घेऊ शकतो, जगू शकतो हे वास्तव असल्याने सैनिकांवर हल्ला झाला की, नागरिकांना तो जिव्हारी लागतो.लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना या वातावरणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणारी मंडळीदेखील समाजात आहेत. पण ती जागरुक नागरिकांमुळे तोंडघशी पडत आहेत. समाजाच्या रोषाला त्यांना बळी पडावे लागत आहे. पक्षीय भेदांपासून अलिप्त होत सर्वच राजकीय पक्षांनी सरकार आणि लष्काराला संपूर्ण सहकार्य करण्याची आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची स्वागतार्ह आणि परिपक्व अशी भूमिका घेतली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार आता पाकिस्तानला कसे उत्तर देतात, याविषयी जनमानसात उत्सुकता आणि उत्कंठा आहे. तुमच्याइतकाच संताप माझ्याही मनात आहे, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. बदला निश्चित घेऊ, असे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. जनमानसातील भावना त्यांच्या मुखातून व्यक्त होत आहे. मात्र ही संयमाची परीक्षा राहणार आहे.सरकारने काय केले पाहिजे याविषयी वेगवेगळ्या भूमिका, मतांतरे व्यक्त होत आहे. कुणाला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानात शिरुन केलेल्या हल्लयाची आठवण होते आहे, तर कुणी पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक ’ करा असे आवाहन करीत आहे. अपेक्षा व्यक्त होणे स्वाभाविक आहे, परंतु संरक्षणविषयक तज्ज्ञ असल्याच्या थाटात समाज माध्यमे आणि गप्पांमध्ये काही लोक जे अकलेचे तारे तोडतात, ते पाहून त्यांची किव करावीशी वाटते.सरकार, लष्कर, सुरक्षाविषयक तज्ज्ञ ही मंडळी अभ्यासपूर्वक काम करीत आहे. आततायीपणापेक्षा योग्य वेळेची वाट पाहत कारवाई होईल, असा विश्वास ठेवायला काय हरकत आहे? देश, सैन्य यांचा पूर्णत: विचार करुन निर्णय घ्यावा लागणार आहे. पण आम्ही स्वत:च तज्ज्ञ असल्याच्या थाटात बोलतो. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, याला काय अर्थ आहे?

टॅग्स :Jalgaonजळगाव