शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरी डाळिंबाचा जगभर तोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:34 IST

विविध औषधी गुणांनी युक्त असलेलं डाळिंब हे फळ आता शेतकºयांना आर्थिक सक्षम तर करेलच; पण त्याची चव चाखण्यापूर्वी ग्राहकांना सोलापूरची आठवण करून देईल.

- बाळासाहेब बोचरेविविध औषधी गुणांनी युक्त असलेलं डाळिंब हे फळ आता शेतकºयांना आर्थिक सक्षम तर करेलच; पण त्याची चव चाखण्यापूर्वी ग्राहकांना सोलापूरची आठवण करून देईल. सोलापूरच्या डाळिंबाला जी.आय. मानांकन मिळाल्यामुळे ही डाळिंबे जगाच्या बाजारपेठेत ‘सोलापूर डाळिंब’ या नावाने तोरा मिरवू लागली आहेत. त्याला भावही चांगला मिळू लागला आहे.विविध औषधी गुणांनी युक्त असलेलं डाळिंब हे फळ शेतकºयांना आर्थिक सक्षम तर करेलच; पण जगाच्या बाजारपेठेतील ग्राहकाला ते चाखण्यापूर्वी सोलापूरची आठवण जरूर होईल. सोलापूरच्या डाळिंबाला जागतिक मानांकन मिळाले असून, ही डाळिंबे जगाच्या बाजारपेठेत ‘सोलापूर डाळिंब’ या नावाने तोरा मिरवू लागली आहेत. त्याला भावही चांगला मिळू लागला आहे. आखात आणि युरोपच्या बाजारपेठेत अफगाणी डाळिंबांचे वर्चस्व असायचे, पण वरचेवर सोलापूर डाळिंबांना विदेशात मागणी वाढली असून, अफगाणी डाळिंबाच्या तुलनेत सरस ठरू लागली आहेत.कोरडवाहू जिल्हा म्हणून ख्यात असलेल्या सोलापूर जिल्ह्याने फळफळावळांचा जिल्हा म्हणून अलीकडे नाव कमावले असून, त्यातल्यात्यात डाळिंबामध्ये प्रगती केली आहे. सोलापूरचं कोरडं हवामान हे फळांच्या चवीसाठी अत्यंत पोषक असून, कमी पाण्यात सोलापूरचा शेतकरी फळांची लागवड करतो. सर्वच फळांचे भाव उतरल्याने शेतकरी चिंतेत असताना सोलापूरच्या डाळिंबाला स्थानिक बाजारपेठेत किलोला ५०० रुपये भाव मिळाल्याची बातमी वाचून बाजारपेठच अवाक् झाली, पण ते सत्य आहे. आकर्षक आकार, फळावरचा तजेलपणा, रंग आणि कसलाही डाग नाही. मालाची प्रतवारी केली तेव्हा त्या शेतकºयाला ९० ते ५०० रुपये दर मिळाला होता. याचाच अर्थ तुम्ही दर्जेदार मालाचे उत्पादन केले तर त्यासाठी खाणाºयांची व पैसे सोडणाºयांची वानवा नाही.सोलापूरचे डाळिंबही त्यादिशेने वाटचाल करू लागले असून, या डाळिंबाला जी.आय. मानांकन मिळाल्याने जगात एक ओळख निर्माण झाली आहे. निर्यातक्षम मालाला भाव चांगला मिळतो, हे शेतकºयांना कळून चुकल्याने त्यांनीही दर्जेदार मालाचे उत्पादन करण्यासाठी पावले उचलली आहेत. डाळिंबाच्या प्रत्येक भागामध्ये औषधी गुणधर्म असल्याने डाळिंबाचा प्रत्येक भाग हा उपयुक्त झाला आहे. येथील राष्टÑीय डाळिंब संशोधन केंद्रामध्ये डाळिंबापासून तयार होणारे उपपदार्थ याची सतत प्रात्यक्षिके दाखविली जातात. एवढेच नव्हे तर ज्यांच्याकडे मशिनरी नाही त्यांच्यासाठी मशिनरीही वापरायला दिली जाते. त्यामुळे डाळिंबाची लागवड वाढू लागली असून, निर्यातही वाढली आहे. वर्षाला ३० ते ३५ टनाची निर्यात आता ५० हजार टनांपर्यंत गेली आहे. स्थानिक बाजारपेठेत भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल होतात. पण निर्यातक्षम डाळिंबाचे भाव बघून तोंडात बोटे घातल्याशिवाय राहत नाहीत. गेल्या तीन वर्षांची आकडेवारी पाहता २१ हजार टन, ४५ हजार टन व ५० हजार टन अशी निर्यात झाली आहे.देशाच्या ९० टक्के डाळिंब हे महाराष्टÑात पिकतात आणि राज्याच्या ९० टक्के डाळिंब हे सोलापूर जिल्ह्यात पिकतात. म्हणूनच याला ‘सोलापूर डाळिंब’ असे जी.आय. मानांकन मिळाले आहे. तरीही एकूण उत्पादनाच्या केवळ १० टक्के डाळिंबे निर्यातक्षम उत्पादित होतात. आज प्रत्येक फळाला प्रदेशानुसार मानांकन मिळाले आहे, पण त्याची गुणवत्ता टिकवण्यात अन् निर्यातीमध्ये आगेकृूच करण्यात सोलापूर डाळिंबाने आघाडी घेतली आहे, असेच म्हणावे लागेल. दर्जेदार मालाला जगात मिळणारा चांगला दर पाहता शेतकºयांनाही आता दर्जेदार माल उत्पादित करण्याची गोडी लागल्याशिवाय राहणार नाही.