शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

सामाजिक भान जपणारा निर्णय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:38 IST

मिलिंद कुलकर्णी कोरोनाचा प्रकोप वाढण्यासाठी अन्य कारणांसोबतच लग्न आणि अंत्ययात्रेला झालेली गर्दी हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

मिलिंद कुलकर्णीकोरोनाचा प्रकोप वाढण्यासाठी अन्य कारणांसोबतच लग्न आणि अंत्ययात्रेला झालेली गर्दी हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. काही ठिकाणी कारवाईदेखील झाली. अशा गर्दीची माहिती न देणाऱ्या पोलीस पाटलांना निलंबितदेखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय लेवा पाटीदार गुर्जर समाज आणि जळगाव जिल्हा सकल मराठा समाजाने पुढाकार घेऊन लग्नाला ५० तर अंत्ययात्रेला २० पेक्षा अधिक लोक न बोलावण्याच्या शासन निर्णयाचे काटेकोर पालन करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. दोन्ही समाजातील धुरिणांनी स्वयंस्फूर्तीने केलेले आवाहन समाजाला दिशादर्शक आणि सामाजिक भान जपणारे आहे.कोरोना ही जागतिक महामारी आहे. संपूर्ण जग त्याच्याशी लढतेय. हात धुणे, मास्क वापरणे व शारीरिक अंतर राखणे हे उपाय करुन कोरोनापासून दूर राहण्याचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. पाश्चात्य देशात मास्कविरोधात आंदोलने होत असताना आपल्याकडे लग्न व अंत्ययात्रेप्रसंगी गर्दी करु नये, या शासकीय दंडकाला सामाजिक बळ देण्याचे मोठे कार्य या दोन समाज संघटनांनी केले आहे.कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लस शोधण्यासाठी सुमारे १२५ संस्था प्रयत्नशील आहेत. काहींच्या मानवी चाचण्या सुरु झाल्या आहेत. आशादायक असे चित्र त्यातून दिसून येत असले तरी सद्यस्थितीत समूह संसर्गाची भीती भारतात व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर वैयक्तीक, सामाजिक पातळीवर जनजागृतीची मोठी आवश्यकता आहे. लोकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्याचीअ ावश्यकता आहे. त्यात अखिल भारतीय लेवा पाटीदार गुर्जर समाज व जळगाव जिल्हा सकल मराठा समाज या सामाजिक संघटनांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनमत तयार करण्यासाठी पावले उचलली आहेत. या दोन्ही संस्थांनी सामाजिक विकासात मोठे योगदान दिलेले आहे. गुर्जर समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील यांचे वडील ज्येष्ठ नेते स्व.पी.के.अण्णा पाटील यांनी काळानुरुप बदलासाठी गुर्जर समाजाला तयार केले. संपर्क, संवाद आणि समन्वय अशी त्रिसूत्री वापरत त्यांनी अनेक कालबाह्य रुढी, परंपरा बदलण्यासाठी समाजाची मानसिकता तयार केली. त्याच प्रमाणे प्रा.डी.डी.बच्छाव यांनी शिक्षणक्षेत्रात कार्य करीत असताना भावी पिढीला सुशिक्षित करीत असताना सुसंस्कृत बनविले. उद्यमशीलतेचे धडे दिले. या दोन्ही नेत्यांच्या शब्दाला वजन आहे. मान आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या आवाहनानुसार दोन्ही समाज शासकीय नियमांचे काटेकोर पालन करतील, असा सार्थ विश्वास आहे.कोरोनाशी लढ्याला चार महिने पूर्ण होत आले. प्रशासकीय, वैद्यकीय व पोलीस यंत्रणा आता थकली आहे. त्यापैकी काहींना कोरोनाची बाधा झाली आहे. हीच वेळ आहे, समाजाने पुढे येण्याची. ती गरज ओळखून आता विविध ठिकाणी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने, व्यावसायिक समूह यांनी प्रशासनाला मदत करण्याचे काम सुरु केले आहे. आॅक्सिजन, व्हेंटिलेटरयुक्त खाटा उपलब्ध करुन देण्याचे काम, आरोग्य केंद्र, विलगीकरण कक्ष उभारण्याचे कार्य केले जात आहे. जळगाव शहरात जैन समाज, माहेश्वरी समाजाने विलगीकरण कक्ष उभारले आहेत. लहान कुटुंबामुळे विलगीकरणात राहण्यासाठी जागेची अडचण, शुश्रूषा करताना गैरसोय अशा बाबी लक्षात घेऊन वसतिगृह, मंगल कार्यालयात विलगीकरण कक्ष उभारण्यात आले. नाश्ता, भोजन, वैद्यकीय मदत अशी सुविधा त्याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कोरोनासारख्या कठीण काळात समाज संघटनांचा हा सकारात्मक पुढाकार निश्चितच स्वागतार्ह आणि दिशादर्शक असा आहे.सोन्याचा धूर निघणाºया देशात ग्रामस्वराज्य होते. स्वयंपूर्ण गाव होते. चलनासाठी पैशाची गरज नसे. धान्याने व्यवहार होत असत. हा काही फार जुना काळ नव्हे. पण समाजाची मानसिकता बदलली, शासकीय धोरणे बदलली. गाव-खेडी ओस पडली. शहरे फुगली. कोरोनापूर्व काळात शहरे बकाल झाली आणि गावे भकास झाली. कोरोनापश्चात लोक गावाकडे परतले. शेतीत रमले. कुटुंब, समाजाचे मोल जाणले. आपत्तीने आम्हाला ह्यजुने ते सोनेह्ण हा मोलाचा संदेश दिला. तो जपूया.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव