शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजकारणाची समाजनिरपेक्षता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 06:20 IST

महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभांचे निकाल अपेक्षेहून वेगळे लागले.

महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभांचे निकाल अपेक्षेहून वेगळे लागले. या दोन्ही राज्यांत भाजपचे संख्याबळ वाढेल आणि काँग्रेस व इतर पक्षांना आणखी मागे सरावे लागेल, असेच साऱ्यांना वाटत होते. मोदींचा तो दावा होता आणि भाजपचे इतर पुढारीही तीच भाषा बोलत होते. या निकालांची चर्चा व समीक्षा दीर्घकाळ होत राहील आणि वेगवेगळी माणसे त्याविषयी भिन्न भिन्न मते मांडतील. एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाशाएवढी स्पष्ट असली, तरी ती फारशी विचारात घेतली जात नाही आणि भल्याभल्यांनाही तिची चर्चा करावीशी वाटत नाही.

देशाच्या राजकारणाचा अर्थकारणाशी असलेला संबंध संपला आहे. तसाच तो समाजकारण व जनतेचे खरे प्रश्न यांच्याशीही आता फारसा राहिला नाही. जनतेच्या खºया प्रश्नांहून न-प्रश्नांचीच चर्चा आपल्या राजकारणात सध्या अधिक होते व समाजातील एक मोठा वर्ग त्यांनाच आपले प्रश्न मानत असतो. देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर होती. ती गेल्या पाच वर्षांत सातव्या क्रमांकावर आली.

आंतरराष्ट्रीय व्यापार घटला. देशातील ५०० मोठ्या उद्योगांपैकी ३५० उद्योगांनी तोटा जाहीर केला. अनेक राष्ट्रीय बँका बुडाल्या. रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता संपवून सरकारने तिच्या गंगाजळीचा सरळपणे वापर करायला सुरुवात केली. विमान कंपन्या बुडाल्या, रेल्वे लाइन्स विक्रीला निघाल्या. रेल्वेची स्टेशन्स भाड्याने देण्याची पाळी आली. उद्योग थांबल्याने व नवे न आल्याने पूर्वीच्या साडेसात कोटी बेकारांच्या संख्येत नवी भर पडली. भाववाढीने अस्मान गाठले आणि सामान्य माणसांचे अर्थकारण बिघडले. सरकारातील नोकरभरती बंद झाली आणि खासगी नोकऱ्यांत कपात होत आहे, परंतु या महत्त्वाच्या व लोकजीवनाशी संबद्ध असलेल्या प्रश्नांची आपल्या राजकारणात चर्चा होत नाही. जे अर्थकारणाचे तेच समाजकारणाचे. देशभरातल्या शेतकºयांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. स्त्रियांवरचे अत्याचार वाढले आहेत.

सार्वजनिक जागांवरील त्यांच्या विटंबनाही वाढल्या आहेत. ग्रामीण रोजगार बंद पडल्याने ग्रामीणांची शहरांकडे होणारी वाटचाल वाढली. त्यामुळे शहरांच्या समस्याही वाढल्या आहेत. पाणी, रस्ते, गर्दी, प्रदूषण यांसारखे प्रश्न त्यांनाही भेडसावू लागले आहेत. शहरांना आरोग्यसेवा पुरविणे जेथे अपुरे, तेथे ग्रामीण भागातील व आदिवासी क्षेत्रातील या सेवेची स्थिती कशी असेल, याची कल्पनाही भयकारी वाटावी अशी आहे. एका बाजूला मूठभर माणसांच्या हातचा पैसा वाढत असताना, मोठ्या लोकसंख्येचे आर्थिक दुबळेपणही वाढले आहे. त्यातच देशातील वाढत्या धर्मांधतेने सामाजिक शांततेचा बळी घेतला आहे. माणसे झुंडींकडून मारली जातात. तसे मारणाºयांना पकडणाºया यंत्रणा दुबळ्या झाल्या आहेत.

न्यायालयांचे निकाल खोळंबलेले तर आहेतच, शिवाय त्यांची स्वायत्तताही कमी केली जात आहे. समाजाच्या खºया प्रश्नांना राष्ट्रीय नेत्यांनी हात लावला नसला, तरी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे मात्र समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने बोलत राहिले आणि त्याचा प्रतिसादही उत्तम मिळाला. ज्या राजकीय पक्षांनी हे प्रश्न मांडायचे, ते पक्ष त्या साºयांविषयी उदासीन आहेत आणि त्यांना आता केवळ निवडणुका लढविण्यात व जिंकण्यातच रस उरला आहे. राजकारण हा समाजकारणाचा आरसा आहे, असे एके काळी म्हटले जायचे. आता त्या दोहोंचा काही एक संबंध असल्याचे दिसत नाहीत. अर्थकारणापासून राजकारण दूर झाले, समाजकारणापासून ते दूर गेले आणि जनतेच्या प्रश्नांशीही त्याचे नाते उरले नाही. नेते बोलत नाहीत, पक्ष दखल घेत नाहीत आणि माध्यमांमध्ये पुढाºयांच्या उपदेशपर भाषणांपलीकडे फारसे काही प्रकाशित होत नाही.

समाजाची कोंडी झाली असल्याचे सांगणारे हे चित्र आहे. गेले अडीच महिने काश्मीरची ८० लाख माणसे कर्फ्यूमध्ये बंद आहेत. त्यांच्यावर लक्षावधी सैनिकांचा पहारा आहे. मिझोरम आणि मणिपूर येथील स्थितीही अशीच आहे. मात्र, या देशाला त्याची जाण आणून देणारी माध्यमे अस्तित्वात नाहीत आणि राजकारण त्यांची चर्चा करीत नाहीत. आपला प्रदेश व आपला मतदारसंघ सांभाळला की, देशाचे राजकारणही हाताळता येते, एवढीच जाणीव असलेले पुढारी गावोगाव असतील, तर राजकारण समाजकारणापासून तुटलेलेच राहणार. एका बाजूला मूठभर माणसांच्या हातचा पैसा वाढत असताना, मोठ्या लोकसंख्येचे आर्थिक दुबळेपणही वाढले आहे. वाढत्या धर्मांधतेने सामाजिक शांततेचा बळी घेतला आहे. माणसे झुंडींकडून मारली जातात. तसे मारणाºयांना पकडणाºया यंत्रणा दुबळ्या झाल्या आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019haryana election 2019हरियाणा निवडणूकBJPभाजपा