शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Dr. Babasaheb Ambedkar: सामाजिक क्रांती, परिवर्तनाची नांदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 06:09 IST

Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचे चक्र भारतात गतिमान केले. त्यानिमित्त तीन प्रमुख संज्ञांचा विचार करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे. ‘समाज’, ‘क्रांती’ आणि ‘परिवर्तन’...

- संजय भगत(लोकमत संदर्भ विभाग, नागपूर)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचे चक्र भारतात गतिमान केले. त्यानिमित्त तीन प्रमुख संज्ञांचा विचार करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे. ‘समाज’, ‘क्रांती’ आणि ‘परिवर्तन’...समाज ही संज्ञा लॅटिन भाषेतील ‘सोशियस’ म्हणजे सहचर, सवंगडी यामधून घेतलेली आहे. समाज हा शब्द उच्चारला तरी त्याचा अर्थबोध होतो. स म्हणजे सर्व; संपूर्ण, मा म्हणजे मानव; माणूस, ज म्हणजे जमात; जाती आणि म्हणून ‘समाज’ म्हणजे सर्व मानव जमात होय. वेगळ्य़ा शब्दांत संपूर्ण मानव जातिसमूहाचे रूप ‘समाज.’‘व्हॉइस ऑफ अमेरिका’ या केंद्रावर भाषण देताना डॉ. आंबेडकर म्हणाले होते, समाज म्हणजे परस्परपूरक अशा मानवाचा संघ होय. ते सर्व परस्परांच्या उपयोगी पडणे, हे कर्तव्य मानतात व त्याचप्रमाणो वागतात, अशा एकात्म लोकांचा संघ म्हणजे समाज. क्रांती म्हणजे आमूलाग्र बदल, परिवर्तन, चक्राकार फिरणे होय. क्रांतिकारक बदल म्हणजेच परितर्वन. विषमता हे क्रांतीचे मूळ आहे. विषमतेने आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, बौद्धिक यातील विषम वाटणीच्या स्वरूपातून निर्माण झालेली अन्यायाची भावना क्रांतीबद्दलची मुख्य प्रेरणा असते, असे ॲरिस्टॉटल मानतो, तसेच जुलमी व शोषक वर्गापासून मुक्तता मिळविणे हीसद्धा परिवर्तनामागची प्रेरणा असते. क्रांती यशस्वी होण्याकरिता शिस्तबद्ध व निष्ठावंत क्रांतीच्या अग्रभागी असणे गरजेचे आहे, असे लेनीन मानीत होता. माणूस समप्रवृत्त असून, त्याच्याकडून सौजन्य अपेक्षित आहे. या तत्त्वज्ञानानुसार संपूर्ण क्रांती ही माणसाच्या मन परिवर्तनाने साध्य होऊन ती नवीन समाज निर्माण करेल. भारतीय समाजात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रात असलेल्या विषमतेत आमूलाग्र बदल घडून प्रत्येक नागरिक स्वतंत्र असेल. अशा क्रांतीला, जयप्रकाश नारायण ‘लोकक्रांती’ म्हणत असत.  परिवर्तन हे समाजाशी संबंधित आहे. परिवर्तन अचानक होत नाही किंवा तत्काळ दिसून येत नाही, तर एकाकी घडून येते ती क्रांती. समाजाने कधीही विचार केलेला नव्हता, असे बदल क्रांतीमुळे घडून येतात. भारतातसुद्धा फार मोठी क्रांती घडून आली ती म्हणजे बुद्ध धम्म क्रांती. ही क्रांती सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्रांती. ही रक्तविहीन क्रांती होती. बुद्धाने प्रस्थापित वैदिक व्यवस्था नाकारली आणि समतावादी व्यवस्था मांडली. विचाराने क्रांती घडवून आणली. समतेचा विचार, न्यायाचा विचार, बंधुतेचा विचार, स्वातंत्र्याचा विचार दिला. भगवान बुद्ध स्वत: म्हणतात, ‘जगातील गोष्टी अनित्य आहेत.’ समाजजीवनात सतत परिवर्तन होत असते. मात्र, फक्त बाह्यांगात होणारे परिवर्तनच यात अभिप्रेत नाही, तर व्यक्तीच्या मनात, विचारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातील प्रस्थापित, विषमतेवर आधारित हिंदू समाजव्यवस्थेच्या संरचनेत परिवर्तन हवे होते. म्हणून यासंदर्भात ते म्हणतात, ‘आपली समाजरचना बदलल्याशिवाय प्रगतीच्या मार्गावर तुम्हाला फारसा लाभ होऊ शकणार नाही. भारतात प्रचलित असलेल्या विषमतेवर आधारित समाजव्यवस्थेशी टक्कर घेऊन सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय सुधारणा केल्यावाचून कोणतीही क्रांती किंवा परिवर्तन या देशात संभवत नाही.’              डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रांतीविषयी बोलताना म्हणतात, ‘जगातील कोणतीही गोष्ट अपरिवर्तनशील नाही. कोणतीही वस्तू सनातन नाही. सर्व वस्तूत घडून येणारा बदल म्हणजे व्यक्तीच्या तसेच समाजाच्या जीवनाला मर्यादित करणारा निसर्गाचा नियम आहे. बदलत्या समाजामध्ये जुन्या व कुजलेल्या जीवनमूल्यांत सतत क्रांती घडून यावयास हवी.’ प्रस्थापित व्यवस्था बदलून दुसऱ्या व्यवस्था ज्या विचाराने निर्माण होतात, तो विचार क्रांतिकारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन म्हणजे, ‘नवीन जीवन सुरू होण्यापूर्वी व हृदयाचे ठोके सुरू होण्यापूर्वी जुन्याचा अंमल संपायलाच हवा’ असा आहे. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर