शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

जैन उद्योगसमूहाची सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 03:12 IST

एखाद्या उद्योगसमूहाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान पाहायचे असेल तर निश्चित जळगावात यावे लागेल. ज्या जळगावात सात हजार रुपयांच्या भागभांडवलावर भवरलाल जैन यांनी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली

एखाद्या उद्योगसमूहाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान पाहायचे असेल तर निश्चित जळगावात यावे लागेल. ज्या जळगावात सात हजार रुपयांच्या भागभांडवलावर भवरलाल जैन यांनी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली, त्याच जळगावात या उद्योगाची भरभराट झाली. सात हजार कोटींवर उलाढाल पोहोचली. जगभर विस्तार झाला. परंतु उद्योगसमूहाचे मुख्यालय जळगावातच कायम ठेवण्याच्या आग्रही भूमिकेत जळगावविषयी असलेले जैन परिवाराचे प्रेम, आपुलकी आणि बांधिलकी अधोरेखित होते. जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या या जळगावचे ऋण फेडण्याचे प्रयत्न या उद्योगसमूहाने सुरुवातीपासून केले ते अविरत कायम आहेत.जळगावात कला, साहित्य, संस्कृती, क्रीडा, शिक्षण, सामाजिक, आरोग्य म्हणजे जीवनाशी निगडीत सर्व अंगांचा व्यापक विकास व्हावा, मूलभूत सोयीसुविधांअभावी जळगावातील तरुण मागे पडू नये हा उद्देश ठेवून जैन उद्योगसमूहाने प्रयत्न केलेला आहे. जैन चॅरिटीज्, त्यानंतर भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठे प्रकल्प उभे करण्यात आले.न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गांधी रिसर्च फाऊंडेशनची स्थापना करून अल्पावधीत ‘गांधीतीर्थ’ हे जगातील गांधीजींविषयी अमूल्य असे संग्रहालय उभारण्यात आले. केवळ संग्रहालयापुरते कार्य सीमित न ठेवता गांधी विचारांवरील अभ्यासक्रम, कार्यशाळा, ग्रामविकास यासंबंधी निरंतर कार्य सुरू आहे. जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या माध्यमातून क्रिकेट, बुध्दिबळ, जलतरणासह अनेकविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रशिक्षण, स्पर्धा आयोजनासह खेळाडू दत्तक योजनेसारखे उपक्रम अव्याहत सुरू आहेत. भारतीय संस्कृती आणि विचारावर आधारित परंतु जागतिक दर्जाची ‘अनुभूती’ नावाची शाळा सुरूकरीत असतानाच ‘अनुभूती २’ ही दारिद्र्यरेषेखालील नागरिकांच्या पाल्यांसाठी मोफत शिक्षण देणारी दर्जेदार व उपक्रमशील शाळादेखील सुरू करण्यात आली.गांधीजी, टाटा, नेहरू यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या भवरलाल जैन यांनी सामाजिक बांधिलकीची रुजवात करून दिली. त्यांच्यानंतर पुत्र अशोक, अनिल, अजित व अतुल यांनी व्यवसायासोबत ही बांधिलकी अधिक दृढ केली. कोणताही राजकीय पक्ष, विचार, जात-धर्म असा भेद न बाळगणाºया या उद्योगसमूहाने चांगले काम करणाºया व्यक्ती, संस्थांना कायम मदतीचा हात दिला आहे.महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने विकासाचा मोठा अनुशेष आहे. अशा स्थितीत जळगावकरांशी असलेल्या बांधिलकीला हा उद्योग समूह जागला आहे. मग पाणीटंचाई काळात पीव्हीसी पाईप तातडीने उपलब्ध करून देणे असो की, गणेशविसर्जन मार्गावरील रस्त्यांची आपत्कालीन दुरुस्ती असो हा समूह अग्रभागी राहिला. लोकसहभागातून मेहरुण तलावाची गळती थांबवून गाळ काढण्याचा उपक्रम महापालिकेने हाती घेतला असताना या समूहाने मोलाचा वाटा उचलला. नागरी सुविधा पुरविण्यात महापालिका अपुरी पडत असताना उद्यानांची उभारणी आणि पुनर्बांधणी, चौकांचा विकास अशी कामे या उद्योगसमूहाने स्वत:हून हाती घेऊन वेळेत लोकार्पण केली.- मिलिंद कुलकर्णी

milind.kulkarni@lokmat.com