शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 04:27 IST

१९९० च्या दशकापासून इंटरनेट आणि सन २००० नंतर सोशल मीडिया व स्मार्टफोनचा प्रचंड प्रसार झाल्यामुळे, बातम्या पसरविणे फारच सोपे झाले आहे.

- डॉ. दीपक शिकारपूर १९९० च्या दशकापासून इंटरनेट आणि सन २००० नंतर सोशल मीडिया व स्मार्टफोनचा प्रचंड प्रसार झाल्यामुळे, बातम्या पसरविणे फारच सोपे झाले आहे. स्मार्टफोनमधील सोशल संवादमाध्यमे, टीव्ही/वृत्तपत्रे इ. पेक्षा सहज प्राप्त होणारी, कमी खर्चाची आणि हाताळायला सोपी असल्याने, जगभरातील अधिकाधिक स्मार्टफोनधारक बातम्या मिळविण्यासाठी त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. सोशल मीडियाचा राजकारण आणि राजकारण्यांशी दररोजचाच संबंध असला, तरी निवडणुका जाहीर झाल्या की, त्याचा खरा चेहरा आणि परिणाम जाणवतो. सतत बदलत्या राजकारणाला समजून घेताना सोशल मीडियाला वगळून पुढे जाता येत नाही.सोशल मीडिया हाताळणारी कोणीही व्यक्ती जगाच्या एखाद्या कोपऱ्यात बसून काहीही पोस्ट लिहून फक्त काही मिनिटांतच जगप्रसिद्ध होऊ शकते... या माध्यमातून फार लवकर आपलेपण साधता येते; तितकीच पटकन कटुतादेखील हे माध्यम निर्माण करू शकते. हे माध्यम जेवढे ज्ञान देते, तेवढेच अज्ञान पेरते. या माध्यमाने माणसांचे आपलेपण तपासण्याची नवी पद्धत जन्माला घातलेली आहे. पूर्वी गाव, तालुका, जिल्हा किंवा जातीवरून स्नेहबंध लावण्याचा प्रयत्न केला जात होता. आता फेसबुकच्या म्युच्युअल फ्रेंडलिस्टवरून नातीगोती ठरतात. समज अन गैरसमज शीघ्र गतीने वाढविण्यात या माध्यमाचा मोठा वाटा आहे. कुठल्याही संस्थेचे वा सरकारी यंत्रणेचे नियंत्रण नसलेले हे माध्यम आहे. एका बाजूने हे माध्यम व्यक्तिगत आहे आणि समूहाचेही आहे. दुसºया बाजूने नियंत्रणअभावी हे माध्यम कुणाचेच नाही. त्यामुळेच या माध्यमाची विश्वासार्हता संशयास्पद आहे .हे माध्यम संपर्कात राहण्यासाठी सोपे सुटसुटीत आहे. कुठेही बसून फोन वा तत्सम उपकरणाद्वारे या माध्यमामुळे नेता अन् कार्यकर्ता यात संवाद घडू शकतो. सोशल मीडियावर असलेले मित्र अन फॉलोअर्स ही आजच्या नेत्याची राजकीय शक्ती मोजण्याचे एक नवीन साधन झाले आहे. या माध्यमावर बरेचदा अनेक लोक एकमेकांशी एकमेकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवलेले असतात. त्यामुळे हे माध्यम माणसांना संख्यात्मक बाजूने एकत्र करत असले, तरी त्यात सत्यता मात्र फारशी नाही. हे माध्यम कल निर्माण करण्यात कमालीचे यशस्वी झालेले आहे, पण या माध्यमावर एकाच वेळी परस्परविरोधी कलही निर्माण होत असतात. त्यामुळे या माध्यमाने जन्माला घातलेले अन् वाढविलेले पक्ष असोत वा नेते, त्यांची विश्वासार्हता ही संशयास्पद असते.आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात वर्तमानात रमते. तिला इतिहास महत्त्वाचा वाटत नाही. कारण वर्तमान आपल्या हातात असतो. इतिहास नाकारणाºया काळाचे आव्हान आपल्या समोर आहे. ते आव्हान वाढवण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. तरुण पिढी हे सर्व राजकीय पक्षाचे मोठे लक्ष्य आहे. त्यामुळे सोशल मीडियावर येऊन आपला चाहता वर्ग तयार करण्यासाठी जिवाचा आटापिटा सुरू असतो़ हे माध्यम गतिशील असल्याने, त्याची परिणामकारकता तितकीच गतिशील आहे. ज्या गतीने ते एखाद्याला उंचीवर घेऊन जाते, त्याहून जास्त गतीने खालीही खेचते. निवडणुकांच्या आधी आणि निकाल जाहीर होण्यापूर्वी सोशल मीडियावरील बातम्यांना (आणि अफवांना) फारच महत्त्व प्राप्त होते. आजच्या राजकारणाचा गाभा अन आवाका घडविण्यात या माध्यमाचा मोठा वाटा आहे. सोशल मीडिया हे जागतिकीकरणानंतरच्या सध्याच्या गतिमान युगाचे प्रतिबिंब आहे.(संगणक साक्षरता प्रसारक)

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया