शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यसेवेच्या अमृतमहोत्सवात सामाजिक धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 03:10 IST

सांगली जिल्ह्यातील औदुंबरच्या साहित्य संमेलनाने यंदा अमृतमहोत्सव साजरा केला. त्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्टÑ संकटात असताना साहित्यिक गप्प आहेत

सांगली जिल्ह्यातील औदुंबरच्या साहित्य संमेलनाने यंदा अमृतमहोत्सव साजरा केला. त्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्टÑ संकटात असताना साहित्यिक गप्प आहेत, असा सवाल करत साहित्यिकांना तर सुनावलेच, पण मराठी माणसाच्या भल्यासाठी जातीपातीच्या राजकीय भिंती पाडण्याचा सल्लाही दिला.सांगली जिल्ह्यातील औदुंबर कृष्णा नदीच्या डोहासाठी जसे प्रसिद्ध आहे, तसे सदानंद मंडळाच्या साहित्य संमेलनासाठीही सर्वदूर परिचित आहे.औदुंबरला कृष्णेचा खोल डोह आहे. बहुतांश राजकीय मंडळींचे पक्षांतर्गत मतभेद याच डोहात बुडवले जातात! येथील कृष्णाकाठावरील दत्तमंदिरात निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडून मतभेद बुडविल्याच्या घोषणा नित्यनियमाने केल्या जातात. औदुंबर ज्या गावाचा भाग आहे, त्या अंकलखोपला यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील या दोन दिग्गजांचे मनोमीलन झाले होते. अगदी तसेच मनोमीलन येथील साहित्य संमेलनातही तमाम सारस्वतांचे होते. कारण कोणताही वादविवाद न झडता या संमेलनाच्या अध्यक्षांची निवड एकमताने होते.हिरवेगार मळे असणाºया, प्रसन्नतेचा अनुभव देणाºया या भागात सृजनाचा मळा फुलवण्यासाठी म. भा. भोसले (गुरुजी), ग. न. जोशी, किशोर सामंत, प्रभाकर सामंत, ह. न. जोशी तथा कवी सुधांशू यांनी १९३९ मध्ये साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली. सदानंद सामंत या मित्राच्या स्मृती जपण्यासाठी त्याच्या नावाने सदानंद साहित्य मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून दरवर्षी संक्रांतीला संमेलन घेण्याची प्रथा सुरू केली. ‘दत्त दिगंबर दैवत माझे’ यासारखी भक्तिगीते लिहिणाºया कवी सुधांशूंनी ती कसोशीने जपली. अलीकडे मौज प्रकाशनशी संबंधित मातब्बर लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी ती आणखी समृद्ध केली.महामहोपाध्याय द. वा. पोतदार यांनी या संमेलनाचे पहिले अध्यक्षपद भूषविले. वि. स. खांडेकर, अनंत काणेकर, दुर्गा भागवत, नारायण सुर्वे, गो. नी. दांडेकर, पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, नामदेव ढसाळ, ना. धों. महानोर, शांता शेळके, अरुण साधू, अनिल अवचट, विजया राजाध्यक्ष, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर अशा भिन्न-भिन्न प्रकृतीच्या मान्यवरांनी येथे साहित्यविचार मांडले.यंदा या साहित्यसेवेचा अमृतमहोत्सव. त्यामुळे तीन दिवस अक्षरफुलांचा जागर झाला. विशेष म्हणजे यंदा संमेलनाध्यक्षांची निवड न करता समारोपासाठी अध्यक्ष म्हणून महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले. ठाकरे यांनी विचारमंचावर येण्यापूर्वीच ‘मी एकदा सुरुवात केली, तर मंचावर कोण आहे, हे न पाहता बोलणार’, असे स्पष्ट करत थेट साहित्यिकांनाच धडे दिले. आज महाराष्टÑ संकटात असताना साहित्यिक गप्प आहेत. महाराष्टÑासह मुंबईवर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू असून, साहित्यिक लिहीत का नाहीत? कोठे गेले भूमिका घेणारे साहित्यिक? महाराष्टÑात जे घडत आहे, त्यावर का बोलत नाहीत?, असा रोकडा सवाल त्यांनी केला. केवळ साहित्य संमेलने भरवून उपयोग नाही, तर लोकांच्या हाती साहित्य दिले पाहिजे, इतिहासातून धडेही घेतले पाहिजेत, लोकांना समजावून सांगितले पाहिजे, असे बजावत मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा मुद्दा त्यांनी पुन्हा छेडला. मराठी माणूस टिकला तरच मराठी भाषा टिकेल, हे सांगायला ते विसरले नाहीत.मराठी अस्मितेचा प्रश्न असताना राजकीय पक्ष आणि जातीपातीच्या भिंती पाडल्या पाहिजेत, असा सामाजिक हुंकार त्यांच्या भाषणातून उमटला.- श्रीनिवास नागे

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे