शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सोशल इंजिनिअरिंग

By admin | Updated: May 14, 2016 01:39 IST

कोणताही राजकीय पक्ष एखादा धर्म किंवा जातीविशेषच्या पाठिंब्यावर वाढू शकत नाही. त्यामुळे डॉ. आंबेडकरांनी आपला राजकीय पक्ष अधिक व्यापक आणि सर्वांच्या हिताचा विचार करणारा ठरावा

कोणताही राजकीय पक्ष एखादा धर्म किंवा जातीविशेषच्या पाठिंब्यावर वाढू शकत नाही. त्यामुळे डॉ. आंबेडकरांनी आपला राजकीय पक्ष अधिक व्यापक आणि सर्वांच्या हिताचा विचार करणारा ठरावा म्हणून शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियामध्ये रूपांतरित केले. या महामानवाने राजकारण कसं सर्वंकष असावं, यासाठीचा मार्गच ‘रिपाइं’च्या स्थापनेतून आखून दिला. डॉ. आंबेडकरांच्या या राजकारणातील मार्गाला आता सोशल इंजिनिअरिंग म्हटले जात असले तरी याचे श्रेय बाबासाहेबांकडेच कायमचे राहणार आहे. बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी सन २००७च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वी केला होता. त्या निवडणुकीत मायावतींनी स्टान्स बदलून दलितांबरोबर ब्राह्मणांचाही विश्वास संपादन केला होता. त्याचेच फलित म्हणून त्या बहुमताने विजयी झाल्या. आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमिन (एआयएमआयएम) पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार असदुद्दिन ओवेसी यांनीही आता सोशल इंजिनिअरिंगचे महत्त्व ओळखले आहे. केवळ मुस्लिमांच्या हिताचे राजकारण केल्यामुळे पक्षाचा प्रसार आणि वाढ होणार नाही, हे त्यांना पुरते कळून चुकले आहे. त्यामुळे आक्रमक भाषणे करण्यापेक्षा त्यांनी मुस्लिमेतर जाती-जमातीच्या हिताचे प्रश्न उपस्थित करण्याकडे कल ठेवला आहे. ‘एमआयएम’चे संघटन मजबूत करण्यासाठी ओवेसी यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. सोलापुरातही ते येऊन गेले. ओवेसी काय बोलणार, हे ऐकण्यासाठी मुस्लिमेतरांनीही मोठी गर्दी केली होती; पण त्यांनी परिपक्वपणे भाषण केले. महाराष्ट्रातील धनगर समाज गेल्या अनेक वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी झगडत आहे. अनेक राजकीय पक्षांनी केवळ आश्वासने देऊन त्यांची बोळवण केली; पण ठोस निर्णय होताना दिसून येत नाही. हाच मुद्दा घेऊन ओवेसी यांनी यापुढे धनगरांच्या न्याय्यहक्कांसाठी झगडणार असल्याची ग्वाही दिली. दलितांसाठी अशीच घोषणा करून त्यांनाही खूश करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात सध्या कोणत्या मोठ्या निवडणुका नसल्या तरी अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. त्यामुळेच ओवेसींनी ही सोशल इंजिनिअरिंगची भूमिका घेतली असली तरी, त्यांच्या आणि ‘एमआयएम’च्या राजकारणाला व्यापकता आणणारी ही भूमिका आहे. या नव्या भूमिकेची प्रशंसा करायला हवी.