शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अन्वयार्थ : देव-धर्मासाठी इतका पैसा येतो; पण, तो नेमका जातो कोठे?

By सुधीर लंके | Updated: December 13, 2023 07:42 IST

राज्यात गावोगावी मंदिरे आहेत. भाविक मोठ्या श्रद्धेने तेथील दानपेटीत पैसे टाकतात. पण, त्याच्या हिशेबाचे काय? हा पैसा 'सुरक्षित' आहे का?

सुधीर लंके निवासी संपादक, लोकमत, अहमदनगर

अयोध्येत पुढील महिन्यात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. यानिमित्त देशात गावोगाव व पाच लाख मंदिरांत रामजन्मभूमीची माती व अक्षता स्थापित केल्या जाणार आहेत. राम मंदिराकडे देशाची अस्मिता म्हणून पाहिले जातेय; पण गावोगाव जी मंदिरे आहेत त्यांची अवस्था काय आहे? महाराष्ट्राची कुलस्वामिनी व शिवरायांचे दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानीचा गाभारा सुरक्षित नाही हे नुकतेच समोर आले, धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी गत जून-जुलै महिन्यात समितीमार्फत देवस्थानच्या तिजोरीत असणाऱ्या दागिन्यांची मोजदाद केली. त्या तिजोरीत हिरे आहेत; पण त्याची नोंद देवस्थानच्या दप्तरात नाही, खजिन्यातील काही कपाटांना कुलपे नाहीत. जुन्या नोंदी व नवीन मोजणीत तफावत आढळली. तुळजाभवानीचा मुकुटच गायब झाल्याचा आरोप होता; पण फेरतपासणीत तो सापडला म्हणे! 

तुळजाभवानी मंदिरात १९९१ नंतर आठ कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा हिंदू जनजागरण समितीचा आरोप आहे. त्यामुळे या समितीने मंदिराकडे असलेले सोने वितळविण्यास विरोध केला आहे. न्यायालयानेही सोने वितळविण्यास स्थगिती दिली आहे. अगोदर भ्रष्टाचार किती झाला हे निश्चित करून दोषींवर कारवाई करा. नंतरच दागिन्यांबाबत निर्णय घ्या, असे समितीचे म्हणणे आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूरची अंबाबाई व जोतिबासह तीन हजार मंदिरांचे व्यवस्थापन पाहते. या समितीवरही अनियमिततेचे आरोप झाले, आता बाळूमामांच्या मेंढरांचा घोटाळा समोर आला. बाळूमामांचे कोल्हापूर जिल्ह्यात भूदरगड तालुक्यात आदमापूर येथे मंदिर आहे. या देवस्थानकडे ३० हजार मेंढ्या, बकऱ्या आहेत त्यांचे १८ कळप आहेत, ज्याला बग्गी म्हणतात, हे बग्गे बाळूमामाची मेंढरं म्हणून गावोगावी फिरतात. लोक त्यांना भरभरून दान देतात; पण देवस्थान या देणगीचा हिशेब ठेवत नसल्याचे धर्मादाय आयुक्तालयाच्या चौकशीत आढळले, येथे खासगी विश्वस्त मंडळ आहे; पण या देवस्थानवरही आता प्रशासक आला, गंमत पाहा, या प्रशासकाच्या पाच महिन्यांच्या कालावधीत (एप्रिल ते ऑगस्ट २०२३) देवस्थानला १३ कोटींचे उत्पन्न मिळाले. २००३ साली हा ट्रस्ट स्थापन झाला. पाच महिन्यांत तेरा कोटी, तर वीस वर्षांत किती पैसे आले असतील याचा अंदाज बांधा.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या तालुक्याच्या ठिकाणी श्रीरामाचे मंदिर आहे. या मंदिराची देखभाल करण्यासाठी देवस्थानला ३१ एकरचा भूखंड इनाम मिळाला, विश्वस्तांनी हा भूखंड चक्क परमिट रूमसाठी दिला. त्या पैशावर श्रीरामाची दिवाबत्ती सुरू आहे. २०१८ साली विधिमंडळात हा प्रश्न गाजला.

परमिट रूम बंद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितले; पण आजही हे राममंदिर मद्यपींच्या विळख्यात आहे. याच जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करताना मूर्तीखाली तब्बल दोन किलो सोने पुरल्याचेही उदाहरण घडले. हे पुरलेले सोने व  त्यापोटी पंडिताला दिलेली देणगी हे सारेच संशयास्पद, हेही प्रकरण विधिमंडळात गाजले. या प्रकरणात तर जिल्हा न्यायाधीश आरोपी आहेत. कारण ते या देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्यांच्या उपस्थितीतच सोने पुरण्याचा ठराव झाला. 

हिंदूच नव्हे, सर्वच धर्मातील प्रार्थना स्थळांभोवती संपत्तीचे वाद दिसतात. बीड जिल्ह्यात मुस्लीम दग्र्याच्या हजारो एकर जमिनी वैयक्तिकरीत्या हडप करण्याचा प्रयत्न झाला, याप्रकरणीही गुन्हे दाखल आहेत. वक्फ बोर्डाच्या जमिनींचा गैरवापर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत, ख्रिश्चन मिशनरीज व चर्चच्या अनेक जमिनी बळकावल्या व बेकायदेशीरपणे विकल्या गेल्या आहेत, चर्चमध्ये जो पैसा जमा होतो त्यावरूनही वाद आहेत. कुठल्याही धर्माची प्रार्थनास्थळे ही सरकारच्या ताब्यात असो वा खासगी विश्वस्तांच्या, तेथे अनेक ठिकाणी भाविकांच्या पैशांची लूट सुरू आहे. अयोध्येत श्रीरामांची प्रतिष्ठापना होईल; पण माणसांमध्ये नैतिकता कधी स्थापित होईल हे महत्त्वाचे.