शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तो राजहंस एक

By admin | Updated: December 22, 2016 00:12 IST

महाकाव्यातील रुपकांचे अनुबंध हे अतिशय गमतीशीर असतात. शतकांचाच नव्हे तर सहस्त्र वर्षाच्या मर्यादा ओलांडूनही त्या काव्यातील

महाकाव्यातील रुपकांचे अनुबंध हे अतिशय गमतीशीर असतात. शतकांचाच नव्हे तर सहस्त्र वर्षाच्या मर्यादा ओलांडूनही त्या काव्यातील रुपके एकमेकांना जोडली जातात. संस्कृत महाकाव्यात श्रीहर्षाचे नैवद्धीयचडित हे महाकाव्य महाभारताच्या वनपर्वातील नल-दमयंतीच्या उप आख्यानावरून श्रीहर्षाने इ.स. ११९३ ते ११९५ या कालावधीत लिहिले.नलदमयंतीच्या प्रेमाची सुंदर कथा राजहंसाच्या संदेशवहनातून कवीने रंगवली आहे. त्यातील एक प्रसंग फार महत्वाचा आहे. तो असा की, नल हा निषध देशाचा अत्यंत पराक्रमी, देखणा आणि पुण्यश्लोक राजा. त्याने विदर्भकन्या दमयंतीला पाहिलेले नसते. पण तिचे गुण आणि रुप याच्या श्रवणानेच तो तिच्यावर अनुरक्त होतो. तिच्या विचाराने तो अस्वस्थ होतो आणि तिचाच विचार करीत नगराच्या एका उद्यानात हिंडत असताना त्यातील एका विस्तीर्ण सरोवरात काही राजहंस पक्षी विहार करीत असतात. त्यात एक सुवर्ण राजहंस त्याला दिसतो. नल त्या राजहंसाला पकडतो. तेव्हा तो राजहंस सांगतो, ‘राजा मला पकडू नकोस. माझी परिस्थिती लक्षात घे. माझी वृद्ध आई घरी आहे. पत्नी सात दिवसांची बाळंतीण आहे. मला मारलेस तर त्यांची अवस्था काय होईल? माझी पिले माझ्या ध्यास घेऊन प्राण सोडतील. तू मला सोड. मनुष्यवाणीने आपली व्यथा मांडणाऱ्या त्या राजहंसाचे नलाला मोठे आश्चर्य वाटते. त्या राजहंसाला तो सोडतो आणि तोच राजहंस नलदमयंतीच्या प्रेम संदेशाचे एकमेकांकडे वहन करतो.श्रीहर्षाने ही कथा महाकाव्यातून अद्भुत प्रेमाने रंगविली आहे. श्रीहर्षाने मुक्त केलेला तो राजहंस साहित्यसृष्टीत पुन्हा कधी दिसला नाही. तो उपेक्षितच राहिला. स्वत:चे राजहंसपण विसरला. स्वत:चे गुण आणि सौंदर्यही विसरला. तोच राजहंस जवळजवळ नऊशे वर्षांनी पुन्हा ग.दि.माडगुळकरांना दिसला, तोही एका बदकाच्या पिलाबरोबर विहार करताना आणि सहज शब्द बाहेर पडले.‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख।होते कुरुप वेडे पिलू तळ्यात एक।।पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणैक।त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक।।तो नलदमयंती महाकाव्यातील राजहंस गदिमांच्या राजहंसाच्या रुपाने पुन्हा सारस्वताला गवसला. या राजहंसाच्या स्थितीमधील एक मोठे रुपक ग.दि.माडगुळकरांना सांगायचे आहे. आजही समाजात असे गुणवान, कर्तृत्ववान, देखणे राजहंस आहेत आणि आपल्या गुणसौंदर्याला विसरून त्यालाच कुरुपता म्हणून कवटाळत आहेत. त्यांनी आत्मनिर्भरता हरवली आहे. त्यांच्या देखणेपणाचा केवळ समाजाला नाही तर त्यांनाही विसर पडला आहे. त्यांचे गुण आणि देखणेपण समाजापुढे येऊन राजहंस म्हणून त्यांना प्रतिष्ठा मिळणे हीच सामाजिक मूल्यांना शोधणारी एक आदर्शदायी घटना ठरेल. - डॉ. रामचंद्र देखणे