शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

बर्फ वितळू लागला!

By admin | Updated: November 4, 2015 04:29 IST

न्यायपालिका आणि संसद-सरकार यांच्या दरम्यान गेल्या महिन्याच्या पंधरा तारखेस सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या एका निवाड्यामुळे जे संघर्षाचे वातावरण निर्माण झाले, ते निवळू

न्यायपालिका आणि संसद-सरकार यांच्या दरम्यान गेल्या महिन्याच्या पंधरा तारखेस सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या एका निवाड्यामुळे जे संघर्षाचे वातावरण निर्माण झाले, ते निवळू लागले असावे असे दिसते. देशभरातील उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालय यातील न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी सध्याची कॉलेजियमची पद्धत मोडीत काढून राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या मार्फत या नेमणुका व्हाव्यात असा कायदा आणि तदनुषंगिक घटना दुरुस्ती संसदेने संमत केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने संबंधित कायदा आणि घटना दुरुस्ती अवैध घोषित केली. या निर्णयाच्या विरोधात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अत्यंत कडवट टीकादेखील केली होती. परंतु ज्या खंडपीठाने संसदेचे निर्णय खारीज केले आणि कॉलेजियमची पद्धतच यापुढेही सुरु राहील असा निर्णय दिला, त्या खंडपीठाच्या पाचही न्यायमूर्तींनी न्यायाधीशांच्या नेमणुकांमध्ये पारदर्शकता असावी या मुद्याच्या बाजूने कौल दिला होता. त्यासाठी देशातील विधिज्ञांना एक आवाहन करुन पारदर्शकता आणण्यासाठी नेमके काय करता येईल याविषयीच्या सूचना पाचारण केल्या होत्या. त्याचबरोबर मंगळवारी म्हणजे काल न्या. जगजितसिंग केहर यांच्या अघ्यक्षतेखाली एका खंडपीठाने तशी सुनावणीही केली. यावेळी खंडपीठाने चार मुद्यांवर भर दिला. पारदर्शकता, न्यायाधीशपदी नियुक्ती होण्यासाठीची पात्रता, संभाव्य उमेदवारांच्या विरोधातील तक्रारींच्या सुनावणीसाठीची यंत्रणा आणि कॉलेजियमसाठी स्थायी स्वरुपाच्या सचिवालयाची निर्मिती. खंडपीठाने हे चार मुद्दे विषद केल्यानंतर सरकारच्या वतीने बोलताना महाभिवक्ता मुकुल रोहटगी यांनी न्यायाधीशांच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता आत्यंतिक महत्वाची असल्याचे सांगून एखाद्या व्यक्तीची निवड करण्यामागील वा न करण्यामागीलही कारणे नोंदविली गेली पाहिजेत असा आग्रह धरला. न्यायालयाने केलेल्या आवाहनानुसार विधिज्ञांकरवी प्रचंड मोठ्या प्रमाणात सूचनांचा खच पडला असून उद्यापासून त्यांचा विचार करण्यासाठी नियमित सुनावणी केली जाणार आहे. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग की कॉलेजियम या वादात देशभरातील न्यायाधीशांची अनेक पदे तशीच रिक्त पडून आहेत. या नियुक्त्यांचा मार्ग लवकर मोकळा व्हावा म्हणून याबाबतीत आपण लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे असेही न्या. केहर यांनी म्हटले आहे. सरकारने याबाबत अकारण प्रतिष्ठेचा प्रश्न न बनविता न्यायालयीन निवाडा स्वीकारणे व आता न्यायालयानेही एक पाऊल मागे घेणे सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने शुभलक्षणच होय.