शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

बर्फ वितळू लागला!

By admin | Updated: November 4, 2015 04:29 IST

न्यायपालिका आणि संसद-सरकार यांच्या दरम्यान गेल्या महिन्याच्या पंधरा तारखेस सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या एका निवाड्यामुळे जे संघर्षाचे वातावरण निर्माण झाले, ते निवळू

न्यायपालिका आणि संसद-सरकार यांच्या दरम्यान गेल्या महिन्याच्या पंधरा तारखेस सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या एका निवाड्यामुळे जे संघर्षाचे वातावरण निर्माण झाले, ते निवळू लागले असावे असे दिसते. देशभरातील उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालय यातील न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी सध्याची कॉलेजियमची पद्धत मोडीत काढून राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या मार्फत या नेमणुका व्हाव्यात असा कायदा आणि तदनुषंगिक घटना दुरुस्ती संसदेने संमत केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने संबंधित कायदा आणि घटना दुरुस्ती अवैध घोषित केली. या निर्णयाच्या विरोधात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अत्यंत कडवट टीकादेखील केली होती. परंतु ज्या खंडपीठाने संसदेचे निर्णय खारीज केले आणि कॉलेजियमची पद्धतच यापुढेही सुरु राहील असा निर्णय दिला, त्या खंडपीठाच्या पाचही न्यायमूर्तींनी न्यायाधीशांच्या नेमणुकांमध्ये पारदर्शकता असावी या मुद्याच्या बाजूने कौल दिला होता. त्यासाठी देशातील विधिज्ञांना एक आवाहन करुन पारदर्शकता आणण्यासाठी नेमके काय करता येईल याविषयीच्या सूचना पाचारण केल्या होत्या. त्याचबरोबर मंगळवारी म्हणजे काल न्या. जगजितसिंग केहर यांच्या अघ्यक्षतेखाली एका खंडपीठाने तशी सुनावणीही केली. यावेळी खंडपीठाने चार मुद्यांवर भर दिला. पारदर्शकता, न्यायाधीशपदी नियुक्ती होण्यासाठीची पात्रता, संभाव्य उमेदवारांच्या विरोधातील तक्रारींच्या सुनावणीसाठीची यंत्रणा आणि कॉलेजियमसाठी स्थायी स्वरुपाच्या सचिवालयाची निर्मिती. खंडपीठाने हे चार मुद्दे विषद केल्यानंतर सरकारच्या वतीने बोलताना महाभिवक्ता मुकुल रोहटगी यांनी न्यायाधीशांच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता आत्यंतिक महत्वाची असल्याचे सांगून एखाद्या व्यक्तीची निवड करण्यामागील वा न करण्यामागीलही कारणे नोंदविली गेली पाहिजेत असा आग्रह धरला. न्यायालयाने केलेल्या आवाहनानुसार विधिज्ञांकरवी प्रचंड मोठ्या प्रमाणात सूचनांचा खच पडला असून उद्यापासून त्यांचा विचार करण्यासाठी नियमित सुनावणी केली जाणार आहे. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग की कॉलेजियम या वादात देशभरातील न्यायाधीशांची अनेक पदे तशीच रिक्त पडून आहेत. या नियुक्त्यांचा मार्ग लवकर मोकळा व्हावा म्हणून याबाबतीत आपण लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे असेही न्या. केहर यांनी म्हटले आहे. सरकारने याबाबत अकारण प्रतिष्ठेचा प्रश्न न बनविता न्यायालयीन निवाडा स्वीकारणे व आता न्यायालयानेही एक पाऊल मागे घेणे सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने शुभलक्षणच होय.