शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

मुस्कटदाबीवर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:44 IST

प्रसिद्धी माध्यमांची गळचेपी करण्यात व खऱ्या बातम्या देण्याच्या त्यांच्या कार्यात अडथळे आणण्यात भारताचा क्रमांक मोठा व त्याची जगात बदनामी करणारा आहे.

प्रसिद्धी माध्यमांची गळचेपी करण्यात व खऱ्या बातम्या देण्याच्या त्यांच्या कार्यात अडथळे आणण्यात भारताचा क्रमांक मोठा व त्याची जगात बदनामी करणारा आहे. जगातल्या ३९ देशात आजही हुकूमशाही आहे. उर्वरित जगात लोकशाही असणाºया वा मर्यादित लोकशाही असणाºया देशांची संख्या मोठी आहे. माध्यमांचे स्वातंत्र्य, नागरिकांचे मतस्वातंत्र्य व अभिव्यक्तीचा अधिकार ही लोकशाहीला प्राणभूत असणारी मूल्ये आहेत. ती प्रदान करणाºया देशात भारत १३८ व्या तर पाकिस्तान १३९ व्या क्रमांकावर आहे. जागतिक सर्वेक्षणांनी जाहीर केलेली ही आकडेवारी भारतीय लोकशाहीविषयीचा संशय उत्पन्न करणारी आहे. पाकिस्तानात निवडणुका होत असल्या आणि त्यात नामधारी सरकार निवडले जात असले तरी त्या देशाची खरी सत्ता लष्करशहांच्या हातात आहे. आत्ताच्या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिके इन्साफ या पक्षाला मोठा विजय मिळाला असला तरी त्या विजयामागे लष्करशहांचा हात असल्याचा आक्षेप जगात घेतला जात आहे. भारतात लोकशाही आहे, घटना आहे, न्यायालयाची स्वायत्तता आहे आणि तरीही त्याचा क्रमांक या क्रमवारीत पाकिस्तानहून केवळ एकने मागे असणे हा आपल्या लोकशाही अधिकाराचा मुळातून फेरविचार करायला लावणारा विषय आहे. जो पक्ष सत्तेवर असेल त्याला अनुकूल ठरणाºया बातम्या द्यायच्या, त्याला आवडेल तसे लिखाण करायचे आणि त्याला न आवडणाºया बातम्या दडपायच्या किंवा त्यांना रंगवून जनतेपुढे न्यायचे असा प्रकार भारतात होतो ही बाब आता सर्वज्ञात आहे. गेल्या चार वर्षात अनेक बड्या व नामवंत पत्रकारांना त्यांच्या मालकांकरवी काढले गेले व घरचा रस्ता दाखविला गेला. ही बाबही सर्वविदित आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या सूचनेवरून वा संकेतावरून आणखी तीन पत्रकारांना त्यांच्या एकाच माहितीने नुकतेच काढून टाकण्याचा घेतलेला निर्णय या वास्तवाची साक्ष पटविणारा व सरकारने, माध्यमाच्या मालकांकरवी, वृत्तस्वातंत्र्याची चालविलेली गळचेपी सांगणारा आहे. या प्रकरणात काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभेत वाचा फोडली तेव्हा ‘त्यांना काढणारे त्यांचे मालक आहेत, आम्ही नाही’ असा कमालीचा हास्यास्पद खुलासा सरकारने केला. आश्चर्य याचे की ज्या वाहिनीने ही कारवाई केली तिचे व ज्या पत्रकारांना काढून टाकण्यात आले त्याची नावे संसदेच्या पटलावर येणार नाहीत याची काळजीही सरकारने सभापतींच्या मार्फत घेतली. देशातली प्रकाश माध्यमे कोणत्या उद्योगपतींच्या ताब्यात आहेत आणि तो उद्योगपती कसा सरकारधार्जिणा आहे हे यापूर्वी अनेकवार प्रकाशित झाले आहे. ‘आम्ही सांगू तेच ऐकवा किंवा छापा’ असा ज्या सरकारचा खाक्या असतो त्याला लोकशाही सरकार म्हणत नाहीत. प्रत्यक्ष इंग्रजांच्या काळातही लो. टिळकांचा ‘केसरी’, गांधीजींचा ‘यंग इंडिया’ किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा ‘मूकनायक’ ही पत्रे सरकारवर टीकेचे आसूड ओढत होती. मौ.आझादांचे अल हिलाल व अल हिजाब तर सरकारचे रक्तच काढत होते. इंग्रज सरकारने या पत्रांवर प्रसंगी बंदी आणली. त्यांना दंड ठोठावले, पण त्यातल्या लेखक व पत्रकारांना काढून टाकण्याची सक्ती त्याही सरकारने केली नाही. आणीबाणीच्या काळात वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हिरावले गेले पण पत्रकारांना कामावरून काढा असे तेव्हाच्या सरकारनेही मालकांना बजावले नाही. आज तसे होत असेल तर ही लोकशाहींच्या बुरख्याआडची हुकूमशाही आणि मनस्वातंत्र्याच्या झेंड्याखाली चाललेली दडपशाही आहे असेच म्हटले पाहिजे. आपण तसे म्हटले नाही तरी या क्षेत्रात जगाने भारताला १३८ वा क्रमांक देऊन त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सरकार विरोधकांना गप्प बसवू शकेल पण जगाचे तोंड त्यालाही बंद करता येणार नाही, हे उघड आहे.