शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट’ रेल्वेसाठी

By admin | Updated: June 15, 2015 00:37 IST

भारतीय रेल्वेचा अजागळ कारभार सुधरविण्याच्या दृष्टिकोनातून शिफारशी सुचविण्यासाठी नेमण्यात आलेल्या देवरॉय समितीचा अहवाल अखेर सरकारला सादर झाला आहे.

भारतीय रेल्वेचा अजागळ कारभार सुधरविण्याच्या दृष्टिकोनातून शिफारशी सुचविण्यासाठी नेमण्यात आलेल्या देवरॉय समितीचा अहवाल अखेर सरकारला सादर झाला आहे. समितीचे अध्यक्ष विवेक देवरॉय ‘सेंटर फॉर पॉलिसी सिसर्च’मध्ये प्राध्यापक असून, ‘नीती’ आयोगाचे सदस्यही आहेत. समितीने केलेल्या काही शिफारशींबाबत मतभेद होऊ शकतात; पण काही शिफारशी वाखाणण्याजोग्या आणि व्यवहार्य आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांना ज्या गोष्टीची सर्वाधिक भीती वाटते, त्या खासगीकरणावर समितीने फुली मारली असली तरी रेल्वेच्या ‘कॉर्पोरेटायझेशन’ची मात्र जोरदार शिफारस केली आहे. रेल्वे कर्मचारी संघटनांना ही शिफारस मान्य होणार नाही, हे उघड आहे. बाबा आदमच्या जमान्यापासून जे जसे चालत आले आहे, ते तसेच चालत राहू द्यावे हाच त्यांचा आग्रह असतो. तथापि, रेल्वेचे उद्दिष्ट नागरिकांना उत्तम दर्जाची वाहतूक सेवा पुरविण्याचे आहे, मूठभर कर्मचाऱ्यांचे लाड पुरविण्यासाठी नाही! रेल्वेचे व्यापारीकरण करून, प्रवासी डबे, मालवाहतुकीच्या वाघिणी, इंजिन इत्यादि गोष्टींच्या उत्पादनामध्ये खासगी क्षेत्राला वाव द्यावा, अशी समिंतीची शिफारस आहे. त्याशिवाय इस्पितळे, खानपान, पोलीस दल, शाळा, बांधकाम आदि क्षेत्रातून रेल्वेने बाहेर पडावे, असेही समितीने सुचविले आहे. ‘आऊटसोर्सिंग’ हा खुल्या अर्थव्यवस्थेतील परवलीचा शब्द झाला असताना, प्रत्येक गोष्ट आम्हीच करू हा अट्टहास अनाठायी आहे. महत्त्वाचे म्हणजे उत्पादन प्रक्रियेत खासगी क्षेत्राला आमंत्रित करण्याची शिफारस करताना, रेल्वेने आपले उत्पादन उपक्रम बंद करण्याची शिफारस समितीने केलेली नाही. उलट ‘इंडियन रेल्वे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ची स्थापना करून खासगी कंपन्यांशी बाजारात स्पर्धा करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. रेल्वेच्या स्वायत्ततेला कुठल्याही प्रकारे धक्का पोहचेल अशी कोणतीही शिफारस केली नसल्याचे समितीने स्पष्ट केले असले तरी, रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची प्रथा मोडीत काढण्याची शिफारस मात्र करण्यात आली आहे. मोदी सरकारची भूमिकाच या शिफारशीमधून व्यक्त झाली असल्याने ती मान्य होण्याची दाट शक्यता दिसते. आजवरचा इतिहास लक्षात घेता, देवरॉय समितीच्या शिफारशींबाबत एकमत होणे दुरापास्तच असले तरी रेल्वेचा अजागळ कारभार दुरुस्त करण्याची नितांत गरज आहे, या मुद्द्यावर तरी दुमत होण्याचे कारण नाही.