शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उक्ती उत्साहाची कृती स्मार्ट हवी

By admin | Updated: June 30, 2016 05:47 IST

शहरीकरणाकडे संकट नव्हे तर संधी म्हणून पाहिले पाहिजे, हा पंतप्रधांनाचा संदेश महत्त्वाचा आहे.

शहरीकरणाकडे संकट नव्हे तर संधी म्हणून पाहिले पाहिजे, हा पंतप्रधांनाचा संदेश महत्त्वाचा आहे. स्थलांतराच्या प्रश्नावर आणि प्रांतीय संकुचितपणातून वेगवेगळे वाद निर्माण करणाऱ्यांनाही त्यांनी दिलेला हा इशारा आहे. स्मार्टनेस म्हणजे काय? भारतीय जनता पक्ष आणि विशेषत: नरेंद्र मोदी यांची हीच खरी ताकद कशी आहे, याचे प्रत्यंतर पुण्यात स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात आले. राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी हा कार्यक्रम गाजला. महापौरांना व्यासपीठावर स्थान मिळणार की नाही, येथपासून ते भाजपाने संपूर्ण कार्यक्रम हायजॅक केल्याचे आक्षेप घेतले गेले. शेवटी भाजपा वगळता सर्व इतर पक्षांनी अगदी त्यांचा मित्रपक्ष म्हणविणाऱ्या शिवसेनेनेही बहिष्कार टाकला. तरीही या कार्यक्रमाने संपूर्ण देशात चांगला संदेश गेला, हे विशेष. पंतप्रधानांचे भाषण म्हणजे वास्तव स्वीकारण्याचा दिलेला धडाच होता. गेल्या कित्येक वर्षांपासून शहरीकरणाचा वेग वाढत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. मात्र, त्यांना भिडण्यापेक्षा ‘गावाकडे चला’चे ढोल वाजविले जातात. त्यामुळे शहरे अनिर्बंध वाढली; पण नियोजन झाले नाही. येथून पुढच्या काळात शहरे वाढणार आहेत. कारण गरिबी पचविण्याची ताकद शहरांमध्येच आहे. त्यामुळे शहरीकरणाकडे संकट नव्हे तर संधी म्हणून पाहिले पाहिजे, हा पंतप्रधांनाचा संदेश मोलाचा आहे. स्थलांतराच्या प्रश्नावर आणि प्रांतीय संकुचितपणातून वेगवेगळे वाद निर्माण करणाऱ्यांनाही दिलेला हा इशाराच आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी या निमित्ताने आपल्या सरकारची विकासावरची भूमिकाही स्पष्ट केली. येथून पुढच्या काळात विकासाचे निर्णय दिल्लीवरून नव्हे, तर स्थानिक पातळीवरच घेतले जातील. फुकट देण्याची भूमिका सोडून दिली जाईल, हे पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. वास्तविक संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारने जवाहरलाल नेहरू शहर पुनर्निर्माण योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. त्यातून काही कामे झालीही; परंतु जनसामान्यांपर्यंत ती पोहोचली नाहीत. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पासाठी अद्याप निधी मिळण्यास सुरुवातही झाली नसताना त्याचा फार मोठा गवगवा करण्यात भाजपाने यश मिळविले आहे. पण, खरा धोका येथेच आहे. अगदी पुण्याचेच उदाहरण द्यायचे तर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पुण्याचा अगदी कायापालट होईल, हे चित्र कागदावर अगदी छान दिसते आहे. माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठीच्या अनेक योजना आहेत. बस कधी येणार हे मोबाईल अ‍ॅपवर समजणार, कचरागाड्यांना जीपीएस बसणार. हे सगळे खरे मानले तरी मुळात जर पायाभूत सुविधाच नसतील तर या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे का? बसची संख्याच पुरेशी नसल्यास मोबाईल अ‍ॅप करणार काय? कचरा जिरविण्यासाठी प्रकल्पच नसतील तर कचरागाड्यांना जीपीएस बसवून उपयोग काय? पुण्यातील १४ प्रकल्प स्मार्ट सिटीमध्ये घेण्यात आले आहेत. मात्र, त्यातील बहुतांश प्रकल्पांचे सर्वेक्षणही झाले नाही. देशपातळीवरील कार्यक्रम असल्याने घाईगडबडीत उरकला गेला हे मान्य असले तरी त्यावर गांभीर्याने विचार होणार का? देशातील सुधारणांची सुरुवात पुण्यातूनच होण्याची परंपरा आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पुण्याची निवड केल्याचे व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. त्याचबरोबर सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासाचा पक्ष म्हणून एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. पंतप्रधानांनीही स्मार्ट सिटी हे जन आंदोलन बनावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु, उद्घाटनाच्या कार्यक्रमावरच सर्व पक्षांनी बहिष्कारास्त्र उगारले. निवडणुकांच्या तोंडावर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्या स्थानिक नेतृत्वानेच आवाहन मानले नाही. लोकांचा सहभाग मिळवायचा तर राजकीय सहमतीही घडविणे आवश्यक आहे. या प्रकल्पाच्याच नव्हे तर विकासाच्या या पद्धतीच्या मॉडेलची यशस्विता पुण्याच्या मापदंडावरच मोजली जाणार आहे. त्यामुळे उद्घाटन भव्य-दिव्य झाले तरी प्रत्यक्ष कामातही तेवढाच स्मार्टनेस दाखविला जावा, हीच पुणेकरांची माफक अपेक्षा आहे. - विजय बाविस्कर