शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

संथ प्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 00:21 IST

जलशास्त्र अभियांत्रिकीमध्ये पाण्याचा प्रवाह मुख्यत: दोन भागांत विभागला जातो. एक म्हणजे संथ प्रवाह ज्याला लॅमिनार फ्लो असे म्हणतात. दुसरा प्रवाह म्हणजे प्रक्षुब्ध प्रवाह ज्याला टरबुलंट फ्लो असे म्हणतात. संथ प्रवाह म्हणजे तो लयबद्ध पद्धतीने वाहतो.

प्रा. डॉ. संदीप ताटेवारजलशास्त्र अभियांत्रिकीमध्ये पाण्याचा प्रवाह मुख्यत: दोन भागांत विभागला जातो. एक म्हणजे संथ प्रवाह ज्याला लॅमिनार फ्लो असे म्हणतात. दुसरा प्रवाह म्हणजे प्रक्षुब्ध प्रवाह ज्याला टरबुलंट फ्लो असे म्हणतात. संथ प्रवाह म्हणजे तो लयबद्ध पद्धतीने वाहतो. पाण्याचा प्रत्येक कण एकामागून एक संथगतीने वाहतो. एका थरातील कण दुसºया थरात जात नाही. थर एकमेकांना समांतर वाहतात. पाण्याचे कण एकमेकांवर आदळत नाहीत. त्यामुळे या प्रवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाण्याच्या शक्तीचा -हास फारच कमी होतो. याविरुद्ध प्रक्षुब्ध प्रवाहामध्ये पाणी खळखळाट करीत बेधुंद वाहते. पाण्याचा प्रत्येक कण वाटेल त्या दिशेने धावतो व एका थरातून दुस-या थरात जातो. थर एकमेकांना समांतर वाहत नाही. पाण्याचे कण एकमेकांवर आदळतात व टक्कर होऊन वेगाने एकमेकांपासून वेगळे होतात. त्यामुळे या प्रवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाण्याच्या शक्तीचा -हास जास्त होतो. आपल्या जीवनाचेसुद्धा असेच असते. समाजात काही लोक असतात की ते आपले जीवन शांतपणे, सरळ मार्गाने, दुस-यांना धक्के न देता, दुस-यांशी भांडण-तंटा न करता, दुसºयांना प्रेम, जिव्हाळा, आनंद देत जगत असतात. त्यांच्या शक्तीचा पाण्याच्या संथ प्रवाहाप्रमाणे कमी प्रमाणात -हास होतो. विश्वाला मार्गदर्शन करणारे संत महात्मे, थोर समाजसेवक, जीवनात यशाची उत्तुंग भरारी मारणारे व्यक्ती व विज्ञान जगात नावलौकिक असलेले शास्त्रज्ञ अशा महान व्यक्ती या प्रकारात मोडतात. याविरुद्ध समाजात मोठ्या प्रमाणात लोक असतात की ते सरळ मार्गाने प्रवास करीत नाही. प्रत्येक वेळेस आडमार्गाचा वापर करायचा प्रयत्न करतात, दुस-यांचे पाय ओढून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या शक्तीचा पाण्याच्या प्रक्षुब्ध प्रवाहाप्रमाणे जास्त प्रमाणात -हास होतो. त्यांची मानसिक शक्ती टिकून राहत नाही. भरपूर संपत्ती व धन असते, पण बहुदा मन:शांती नसते. त्यामुळे त्यांच्याकडून विध्वंसक गोष्टी घडून येतात. अत्याचारी, भ्रष्टाचारी, व्यभिचारी, दुर्जन अशा व्यक्ती या प्रकारात मोडतात. म्हणूनच जीवन हे संथ प्रवाहाप्रमाणे आनंद घेत दुस-याला आनंद देत जगायला पाहिजे. शेवटी विकल्प हे आपल्या जवळच असतात, मात्र योग्य वेळी योग्य विकल्प जो निवडतो तोच यश संपादन करीत असतो, तोच परमानंद प्राप्त करून स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त करतो. 

टॅग्स :Waterपाणी