शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

संथ प्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 00:21 IST

जलशास्त्र अभियांत्रिकीमध्ये पाण्याचा प्रवाह मुख्यत: दोन भागांत विभागला जातो. एक म्हणजे संथ प्रवाह ज्याला लॅमिनार फ्लो असे म्हणतात. दुसरा प्रवाह म्हणजे प्रक्षुब्ध प्रवाह ज्याला टरबुलंट फ्लो असे म्हणतात. संथ प्रवाह म्हणजे तो लयबद्ध पद्धतीने वाहतो.

प्रा. डॉ. संदीप ताटेवारजलशास्त्र अभियांत्रिकीमध्ये पाण्याचा प्रवाह मुख्यत: दोन भागांत विभागला जातो. एक म्हणजे संथ प्रवाह ज्याला लॅमिनार फ्लो असे म्हणतात. दुसरा प्रवाह म्हणजे प्रक्षुब्ध प्रवाह ज्याला टरबुलंट फ्लो असे म्हणतात. संथ प्रवाह म्हणजे तो लयबद्ध पद्धतीने वाहतो. पाण्याचा प्रत्येक कण एकामागून एक संथगतीने वाहतो. एका थरातील कण दुसºया थरात जात नाही. थर एकमेकांना समांतर वाहतात. पाण्याचे कण एकमेकांवर आदळत नाहीत. त्यामुळे या प्रवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाण्याच्या शक्तीचा -हास फारच कमी होतो. याविरुद्ध प्रक्षुब्ध प्रवाहामध्ये पाणी खळखळाट करीत बेधुंद वाहते. पाण्याचा प्रत्येक कण वाटेल त्या दिशेने धावतो व एका थरातून दुस-या थरात जातो. थर एकमेकांना समांतर वाहत नाही. पाण्याचे कण एकमेकांवर आदळतात व टक्कर होऊन वेगाने एकमेकांपासून वेगळे होतात. त्यामुळे या प्रवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाण्याच्या शक्तीचा -हास जास्त होतो. आपल्या जीवनाचेसुद्धा असेच असते. समाजात काही लोक असतात की ते आपले जीवन शांतपणे, सरळ मार्गाने, दुस-यांना धक्के न देता, दुस-यांशी भांडण-तंटा न करता, दुसºयांना प्रेम, जिव्हाळा, आनंद देत जगत असतात. त्यांच्या शक्तीचा पाण्याच्या संथ प्रवाहाप्रमाणे कमी प्रमाणात -हास होतो. विश्वाला मार्गदर्शन करणारे संत महात्मे, थोर समाजसेवक, जीवनात यशाची उत्तुंग भरारी मारणारे व्यक्ती व विज्ञान जगात नावलौकिक असलेले शास्त्रज्ञ अशा महान व्यक्ती या प्रकारात मोडतात. याविरुद्ध समाजात मोठ्या प्रमाणात लोक असतात की ते सरळ मार्गाने प्रवास करीत नाही. प्रत्येक वेळेस आडमार्गाचा वापर करायचा प्रयत्न करतात, दुस-यांचे पाय ओढून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या शक्तीचा पाण्याच्या प्रक्षुब्ध प्रवाहाप्रमाणे जास्त प्रमाणात -हास होतो. त्यांची मानसिक शक्ती टिकून राहत नाही. भरपूर संपत्ती व धन असते, पण बहुदा मन:शांती नसते. त्यामुळे त्यांच्याकडून विध्वंसक गोष्टी घडून येतात. अत्याचारी, भ्रष्टाचारी, व्यभिचारी, दुर्जन अशा व्यक्ती या प्रकारात मोडतात. म्हणूनच जीवन हे संथ प्रवाहाप्रमाणे आनंद घेत दुस-याला आनंद देत जगायला पाहिजे. शेवटी विकल्प हे आपल्या जवळच असतात, मात्र योग्य वेळी योग्य विकल्प जो निवडतो तोच यश संपादन करीत असतो, तोच परमानंद प्राप्त करून स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त करतो. 

टॅग्स :Waterपाणी