शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

संथ प्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 00:21 IST

जलशास्त्र अभियांत्रिकीमध्ये पाण्याचा प्रवाह मुख्यत: दोन भागांत विभागला जातो. एक म्हणजे संथ प्रवाह ज्याला लॅमिनार फ्लो असे म्हणतात. दुसरा प्रवाह म्हणजे प्रक्षुब्ध प्रवाह ज्याला टरबुलंट फ्लो असे म्हणतात. संथ प्रवाह म्हणजे तो लयबद्ध पद्धतीने वाहतो.

प्रा. डॉ. संदीप ताटेवारजलशास्त्र अभियांत्रिकीमध्ये पाण्याचा प्रवाह मुख्यत: दोन भागांत विभागला जातो. एक म्हणजे संथ प्रवाह ज्याला लॅमिनार फ्लो असे म्हणतात. दुसरा प्रवाह म्हणजे प्रक्षुब्ध प्रवाह ज्याला टरबुलंट फ्लो असे म्हणतात. संथ प्रवाह म्हणजे तो लयबद्ध पद्धतीने वाहतो. पाण्याचा प्रत्येक कण एकामागून एक संथगतीने वाहतो. एका थरातील कण दुसºया थरात जात नाही. थर एकमेकांना समांतर वाहतात. पाण्याचे कण एकमेकांवर आदळत नाहीत. त्यामुळे या प्रवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाण्याच्या शक्तीचा -हास फारच कमी होतो. याविरुद्ध प्रक्षुब्ध प्रवाहामध्ये पाणी खळखळाट करीत बेधुंद वाहते. पाण्याचा प्रत्येक कण वाटेल त्या दिशेने धावतो व एका थरातून दुस-या थरात जातो. थर एकमेकांना समांतर वाहत नाही. पाण्याचे कण एकमेकांवर आदळतात व टक्कर होऊन वेगाने एकमेकांपासून वेगळे होतात. त्यामुळे या प्रवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाण्याच्या शक्तीचा -हास जास्त होतो. आपल्या जीवनाचेसुद्धा असेच असते. समाजात काही लोक असतात की ते आपले जीवन शांतपणे, सरळ मार्गाने, दुस-यांना धक्के न देता, दुस-यांशी भांडण-तंटा न करता, दुसºयांना प्रेम, जिव्हाळा, आनंद देत जगत असतात. त्यांच्या शक्तीचा पाण्याच्या संथ प्रवाहाप्रमाणे कमी प्रमाणात -हास होतो. विश्वाला मार्गदर्शन करणारे संत महात्मे, थोर समाजसेवक, जीवनात यशाची उत्तुंग भरारी मारणारे व्यक्ती व विज्ञान जगात नावलौकिक असलेले शास्त्रज्ञ अशा महान व्यक्ती या प्रकारात मोडतात. याविरुद्ध समाजात मोठ्या प्रमाणात लोक असतात की ते सरळ मार्गाने प्रवास करीत नाही. प्रत्येक वेळेस आडमार्गाचा वापर करायचा प्रयत्न करतात, दुस-यांचे पाय ओढून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या शक्तीचा पाण्याच्या प्रक्षुब्ध प्रवाहाप्रमाणे जास्त प्रमाणात -हास होतो. त्यांची मानसिक शक्ती टिकून राहत नाही. भरपूर संपत्ती व धन असते, पण बहुदा मन:शांती नसते. त्यामुळे त्यांच्याकडून विध्वंसक गोष्टी घडून येतात. अत्याचारी, भ्रष्टाचारी, व्यभिचारी, दुर्जन अशा व्यक्ती या प्रकारात मोडतात. म्हणूनच जीवन हे संथ प्रवाहाप्रमाणे आनंद घेत दुस-याला आनंद देत जगायला पाहिजे. शेवटी विकल्प हे आपल्या जवळच असतात, मात्र योग्य वेळी योग्य विकल्प जो निवडतो तोच यश संपादन करीत असतो, तोच परमानंद प्राप्त करून स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त करतो. 

टॅग्स :Waterपाणी