शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

गोफण ब्रिगेड !

By admin | Updated: April 21, 2017 01:34 IST

वर्षभरापूर्वी सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात बंडखोरांचा कथित म्होरक्या बुऱ्हान वणी ठार झाल्यापासून काश्मीर खोऱ्यातील युवकांनी दगडफेकीचे अस्र उपसले आहे

वर्षभरापूर्वी सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात बंडखोरांचा कथित म्होरक्या बुऱ्हान वणी ठार झाल्यापासून काश्मीर खोऱ्यातील युवकांनी दगडफेकीचे अस्र उपसले आहे. सुरक्षा दलांनी एखाद्या भागात बंडखोरांना शोधण्यासाठी कारवाई सुरू केली की युवकांचा मोठा जमाव जमतो व तुफान दगडफेक सुरू करतो. गेल्या वर्षभरात अशा दगडफेकीच्या तब्बल ४११ घटना घडल्या असून, त्यात सुरक्षा दलांचे शेकडो जवान जखमी झाले आहेत. या दगडफेकीचा प्रतिकार कसा करायचा हा सुरक्षा दलांसाठी डोकेदुखीचा विषय झाला आहे. हिंसक नागरी जमावावर थेट बंदुका चालविता येत नसल्याने पेलेट गन्सचा वापर केला गेला. परंतु या पेलेट गनचे छर्रेे लागून असंख्य तरुणांच्या डोळ्यांना इजा झाली व अनेकांना दृष्टी गमवावी लागली. यातून जनक्षोभ आणखी वाढला. पेलेट गनला पर्याय सुचविण्यासाठी केंद्र सरकारने एक समितीही नेमली. या समितीच्या सूचनेनुसार आता रबरी गोळ्यांच्या बंदुका वापरण्याचे ठरविले आहे. काश्मीरसारख्या संवेदनशील भागातील या समस्येवर असे विचारमंथन सुरू असताना एक अनपेक्षित सूचना पुढे आली आहे. मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील लाखपूर या दुर्गम गावातील प्रेम सिंग नावाच्या आदिवासी युवकाने केलेली ही सूचना वरकरणी अनोखी वाटत असली तरी थोडा विचार केल्यावर ती व्यवहार्य नसल्याचे दिसून येते. ग्रामीण भागांमध्ये सुगीच्या हंगामात शेतांवर येणारे पक्ष्यांचे थवे उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोफण या पारंपरिक कौशल्याचा उपयोग करून काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या जमावांचा बंदोबस्त करण्यासाठी ‘गोफण बटालियन’ स्थापन करावी, अशी या प्रेमसिंगची सूचना आहे. एका राष्ट्रीय वृत्तसंस्थेने स्थानिक नेत्यांच्या मतमतांतरासह ही बातमी प्रसृत केल्याने गुरुवारी तो एक चर्चेचा विषय झाला. परंतु ‘गोफण ब्रिगेड’ हा पर्याय व्यवहार्य नाही. पहिली गोष्ट म्हणजे गोफण हे अचूक नेम धरून लक्ष्यवेध करण्याचे साधन नाही. शेतांवरही गोफण फिरविली जाते ती पाखरे मारण्यासाठी नव्हे, तर उडविण्यासाठी. शिवाय गोफण फिरविण्यासाठी सभोवतालच्या भागाहून उंच असे मचाण लागते. दंगलसदृश परिस्थितीत ते शक्य नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलीस आणि सुरक्षा दलांनी बळाचा वापर करण्याचे काही नियम ठरलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी कोणती साधने कधी वापरावीत याचीही बंधने आहेत. निदर्शक दगड मारतात, म्हणून सुरक्षा दलांनीही त्यांना दगडानेच प्रत्युत्तर देणे यात बसू शकत नाही.