शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

फडतूस नौटंकी करणाऱ्यांना परग्रहावर पाठवून द्यावे का?

By संदीप प्रधान | Updated: May 18, 2022 07:56 IST

‘मला शिव्या द्या; पण माझ्याबद्दलच बोला’, असा हट्ट धरणाऱ्यांनी वात आणलाय! नसत्या मुद्द्यांभोवती चर्चा फिरत राहिली, की सरकारच्या पथ्यावरच पडते!

- संदीप प्रधान

महाराष्ट्राच्याराजकारणातील सर्वपक्षीय किमान १७ ते २० नेत्यांची, प्रवक्त्यांची यादी तयार केली आहे... त्यांना समजा, महिनाभर परग्रहावर पाठवून दिले जेथून त्यांना कुठल्याही उपकरणाच्याद्वारे माध्यमांशी संपर्क साधता येणार नाही तर सध्याचा कमअस्सल प्रश्नांवरून सुरू असलेला गलका निश्चित कमी होईल. भोंगे, हनुमान चालिसा, हिजाब, पाथरवट कविता, ताजमहालचे बंद दरवाजे,  या व अशा अनेक फुटकळ मुद्द्यांवरून सध्या वाक्युद्ध खेळले जात आहे. देशासमोर व महाराष्ट्रासमोर वेगवेगळ्या जटिल प्रश्नांची मालिका आहे. अन्नधान्य, भाजीपाल्याची महागाई गगनाला भिडली आहे. इंधनांच्या दराने सर्वसामान्य माणसाला जेरीस आणले आहे. महाराष्ट्रात दीर्घ काळानंतर पुन्हा लोडशेडिंगचे चटके बसू लागले आहेत. कोरोनानंतर निर्माण झालेली बेरोजगारी अजून दूर झालेली नाही. लोडशेडिंगला राज्य सरकार जबाबदार असल्याचा दावा राज्यातील विरोधी पक्षाचे नेते करतात, तर राज्यातील सत्ताधारी हे केंद्र सरकारचे पाप असल्याचे सांगतात. दोघेही आपापल्या परीने अर्धसत्य सांगत असतात. 

आपणही आता हळूहळू संपूर्ण सत्य जाणून घेण्याची सवय सोडली आहे. कोरोनामुळे अनेक उद्योगधंद्यांची गणिते बदलली तशी ती इलेक्ट्रॉनिक माध्यमांचीही बदलली. बातम्या देणाऱ्या वाहिन्यांना जाहिरातीच्या उत्पन्नाकरिता स्पर्धा करावी लागते ती भपकेबाज, सासू-सुनांच्या कुटिल डावांनी भरलेल्या सिरियल्स दाखवणाऱ्या वाहिन्यांशी. यापूर्वी बऱ्याच वाहिन्या बातमीमागची बातमी, बातम्यांचे कंगोरे उलगडून दाखवणाऱ्या चर्चांवर भर देत. कोरोना काळापासून बहुतांश वाहिन्यांनी केवळ घटना दाखवणे (हॅपनिंग) याला प्राधान्य दिले आहे. एखादा नेता आज भाषण देणार आहे तर सकाळपासून त्याच्यामागे कॅमेरे सोडले जातात. घटना नाट्यपूर्ण पद्धतीने दाखवण्यामुळे प्रेक्षक वाहिनीला खिळून राहतो. त्यामुळे घटनेची चिकित्सा संपली. वृत्तपत्रे थोड्याफार प्रमाणात ती करतात. मात्र वाहिन्यांचा प्रभाव वृत्तपत्रांवरही पडतो. दिसतेय तेच सत्य असे अनेकांना वाटू लागते. 

- राज्यातल्या या खेळात वर म्हटलेले १७ ते २० प्रभावी चेहरे आहेत. ही मंडळी रोज घटना घडवण्याच्या खेळात वाहिन्यांना साहाय्यभूत ठरतात किंवा काही वेळा वाहिनीचे प्रतिनिधी अमुक एका नेत्याने काय केले तर अधिक दर्शक आकर्षित होतील, ते करवून घेतात. यामुळे सामान्य बकुबाच्या काही मंडळींनी टीव्हीचा पडदा दिवस दिवसभर व्यापलेला दिसतो. केतकी चितळे किंवा कंगना रनाैत ही त्याची ताजी उदाहरणे आहेत.

कोरोना काळात आपण सारेच चार भिंतीत कोंडले गेले होतो. अगदी शेजारच्या घरातही डोकावण्याची सोय नव्हती.  सोशल मीडिया हाच आपला सांगाती झाला होता. त्याच काळात ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवर गर्दी वाढली. त्या एकाकी संकटात सोशल मीडियाने आपल्याला आधार दिला. फेसबुक असो की इन्स्टाग्राम येथे एखाद्या अभिनेत्रीच्या छायाचित्रावर किंवा एखाद्याच्या पोस्टवर तुम्ही रेंगाळलात तर त्याच व्यक्तीचे छायाचित्र, पोस्ट तुम्हाला दिसत राहते. युट्यूबवरही तेच होते. हळूहळू तुमची मनोभूमिका आर्टिफिशअल इंटलिजन्समुळे समजली की, तुमच्या आवडीनिवडीच्या माणसांच्या कम्युनिटीमध्ये तुम्ही ओढले जाता. त्यातून लिबरल-सेक्युलर, कट्टर उजवे वगैरे वैचारिक, जातीय, धार्मिक मंडळींचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार झाले. त्यावर दिवसभर बरेचदा एकांगी चर्चा होतात. तेच तेच ऐकले की, तेच खरे वाटायला लागते. एकांगी मांडणी करणाऱ्यांना सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. सम्यक व तौलनिक मांडणी करणाऱ्यांना फारसे लाईक्स मिळत नाहीत. शिवराळ भाषेत हल्ला चढवणाऱ्यांची अगदी विरोधकही दखल घेतात. त्यामुळे ‘‘मला शिव्या द्या; पण माझ्याबद्दलच बोला’’ हे इप्सित साध्य होते. 

न सुटणाऱ्या मूलगामी प्रश्नांची चर्चा न होणे हे कुठल्याही सरकारच्या पथ्यावर पडणारे असते. माध्यमांसमोर कमअस्सल मुद्द्यांवरून नौटंकी करणाऱ्यांना परग्रहावर धाडून तरी परिस्थिती सुधारते का, ते पाहायला काय हरकत आहे? sandeep.pradhan@lokmat.com

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र