शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...

By shrimant mane | Updated: May 8, 2025 05:25 IST

भारताने पाकिस्तानला दिलेल्या चोख प्रत्युत्तराशी वरील नावे जोडली गेली आहेत. त्यातल्या थेट, खणखणीत प्रतिकात्मकतेने भारत दोन पावले पुढे गेला आहे!

-श्रीमंत माने,  संपादक, लोकमत, नागपूर

मोहिमेचे नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ अन् तिची माहिती दिली कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी. बुधवारी भल्या पहाटे व नंतर सकाळी या तीन नावांनी दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर महिलांच्या भावविश्वात गुंफले गेले. त्याचा संबंध महिलांना मिळालेल्या कर्तबगारीच्या संधीशीदेखील आहे. भारत व पाकिस्तानमध्ये मुख्य फरक काय, तर पाकिस्तानच्या राजकारणात लष्कर आहे आणि भारतात तसे नाही. पाकिस्तानची दुसरी कमकुवत बाजू म्हणजे भारतासारखे तिथल्या संरक्षण दलांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान नाही. तिथल्या आर्मीत लेडी कॅडेट कोर्सच मुळी २००६ मध्ये सुरू झाला. तेव्हाच एअरफोर्समध्ये पायलटच्या संधी खुल्या झाल्या. तथापि, आर्मी, नेव्हीत अजूनही युद्धाच्या आघाडीवर महिला नाहीत. भारतात मात्र स्थलसेना, वायुसेना व नाैसेनेत पुरुषांच्या बरोबरीने महिलांना संधी देण्याच्या धोरणाला दोन दशके उलटून गेली आहेत. शरद पवार केंद्रीय संरक्षणमंत्री असताना १९९२ मध्ये हे क्रांतिकारी पाऊल उचलले गेले. नंतर न्यायाचा तराजू सांभाळणाऱ्या न्यायदेवतेनेही त्यावर शिक्कामोर्तब केले.

आता महिला अधिकारी केवळ पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढतातच असे नाही, तर त्या दोन पावले पुढेही गेल्या आहेत. गुजरातमधील कर्नल सोफिया कुरेशी त्यांच्या कुटुंबातील लष्करी सेवेचा वारसा चालवतात. काही वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय तुकडीचे नेतृत्व त्यांनी केले, तर अति उंचावर चेतक, चित्ता ही अत्याधुनिक हेलिकाॅप्टर्स चालविण्यात विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा हातखंडा आहे. या दोघींची नावेही त्यांच्या कर्तृत्वाला साजेशी आहेत. ‘सोफिया’ या मूळ ग्रीक नावाचा अर्थ बुद्धी किंवा ज्ञान आणि ‘व्योमिका’  म्हणजे साक्षात आकाशकन्याच.

युद्ध ही केवळ शस्त्रांची लढाई नसते. ते अनेकदा प्रतीकांवरही लढले जाते. त्यातून संदेशही द्यायचा असतो. ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाने असाच संदेश दिला आहे. पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी महिला व मुलांवर शस्त्र उचलत नसल्याचा साळसूदपणा दाखवताना केवळ पुरुष टिपले. डोळ्यादेखत साैभाग्य संपवले जातानाच्या यातना भोगलेल्या अभागिनींना सांगितले गेले की, ‘जा आणि आम्ही काय केले ते पंतप्रधान मोदींना सांगा’. या प्रसंगातूनच ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव पुढे आले. ते नाव खुद्द नरेंद्र मोदींनी सुचवल्याचे सांगितले जाते. असो. लष्करी कारवायांचे नामकरण हा इतिहासाचा एक रंजक कोपरा आहे. ही नावे रणनीती, संस्कृती आणि प्रेरणा यांचा मेळ साधतात. राष्ट्रीय अभिमानही वाढवतात. आक्रमण, बचाव किंवा शांतता मोहिमेला नाव यासाठी द्यायचे की, गुप्तता पाळतानाही तिला विशिष्ट ओळख मिळावी. मोहीम फत्ते करणाऱ्यांना हुरूप यावा. भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल आणि गुप्तचर संस्था मिळून ही साधी, अर्थपूर्ण व सहज लक्षात राहणारी नावे ठरवतात. कारवाईची रणनीती, भौगोलिक व सांस्कृतिक संदर्भ किंवा प्रेरणादायी संकल्पनेशी ती नावे जोडलेली असतात.

कारगिलमधून घुसखोरांना सीमेपलीकडे पिटाळण्यासाठी १९९९ मध्ये राबविलेले ‘ऑपरेशन विजय’ हे नाव यशाचे, विजयाचे प्रतीक होते. सियाचीन हिमनदीवर नियंत्रणासाठी ‘ऑपरेशन मेघदूत’ हे संदेशवहनाचे प्रतीक कालिदासांच्या काव्यातून घेण्यात आले होते. ते उंच आणि बर्फाळ प्रदेशाशी सुसंगतही होते. १३ डिसेंबर २००१ च्या संसदेवरील भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देताना शाैर्य व धैर्याचे प्रतीक म्हणून ‘ऑपरेशन पराक्रम’ राबविण्यात आले. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर कब्जा केलेल्या दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी १९८४ मध्ये राबविलेल्या ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’मधील निळा रंग शीख धर्माशी, तर स्टार शब्द मंदिराच्या पावित्र्याशी संबंधित होता. २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या मोहिमेला ‘सूर्योदय’ असे नाव देण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या रूपाने कुंकू हसले अन् आपण दोन पावले पुढे गेलो.shrimant.mane@lokmat.com

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान