शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

पाप आणि पुण्य

By admin | Updated: July 2, 2014 08:46 IST

पाप-पुण्याचे परिणाम या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भोगून पूर्ण करावे लागतात आणि जर पूर्ण झाले नाहीत, तर पुढच्या जन्मातही ते भोगावे लागतात.

अध्यात्मब्रह्मलीन क्षीरसागरमहाराजपाप-पुण्याचे परिणाम या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भोगून पूर्ण करावे लागतात आणि जर पूर्ण झाले नाहीत, तर पुढच्या जन्मातही ते भोगावे लागतात. पापाची व पुण्याची आपापसांत वजावट होऊन उरलेले पाप किंवा पुण्य भोगावे लागते, अशी एक चुकीची समजूत सामान्यांमध्ये असलेली दिसून येते. पाप-पुण्याची बेरीज वजाबाकी कधीच होत नाही.संशय व दारिद्र्य हे ज्या ठिकाणी वास करीत असतील, त्याला पाप समजावे आणि संतुष्ट होणे व सदा सुखी राहणे याला पुण्य समजावे. अशाच पद्धतीने सर्वांनी आचरण करावे. पापाचे क्षालन झाल्यावरच मानवाच्या जीवनात पुण्याची वाढ होते व जीवनात शांती-समाधान निर्माण होते. असे समाधान जेव्हा जीवनात प्राप्त होते, तेव्हाच आयुष्यवर्धन होते.प्रत्येक मनुष्यात दोन प्रवृत्ती वास करीत असतात. एक सात्त्विक वृत्ती व दुसरी राक्षसी वृत्ती. पाप कर्मामुळे व्यक्तीचे विचार व वृत्ती पाप कर्माकडेच वळतात. सुधारण्याची शक्यता फारच कमी राहते. मनुष्याला जन्मातच पाप-पुण्याची कल्पना येते. मानवाचा जन्म मिळाल्यावर नीती-नियमांनुसार वागावे व योग्य धर्माचरण करावे. देवाच्या दृष्टीने सर्व लोक समान आहेत. देवाचा न्याय कधीच चुकत नाही. जो पुण्य कर्म करील, त्याला चांगल्या कुळात जन्म मिळेल. पाप कर्मे केलेल्यांनाही जन्म मिळतो, पण तो फक्त दु:ख भोगण्यासाठीच असतो आणि हेच नेमके सामान्य लोकांना समजत नाही. देवाच्या दृष्टिकोनातून जरी सर्व सारखेच असले, तरी जन्म मिळताना पाप-पुण्याचा, पात्रतेचा विचार झालेला असतो. कोणत्याही कुळात का असेना, मनुष्यजन्म मिळाल्याबद्दल देवाचे आपण आभारच मानावयास हवेत. काही लोकांची कल्पना असते, की त्यांचा जन्म हा केवळ मागील जन्मांची पापे फेडण्याकरिता झालेला आहे, म्हणून ते उद्धाराचा कोणताही प्रयत्न न करता, चाकोरीबद्ध जीवन जगत असतात. मानवाकडून चुका होतात, काही वेळा नकळत मोठे अपराधही घडतात. काहींच्या मनात पश्चात्तापाची भावना असते; परंतु योग्य परिमार्जन होत नाही म्हणून एक प्रकारची बोच असते. अशा वेळेस धर्मग्रंथांचे वाचन केल्याने फायदा होतो. कोणत्याही धर्माचे धर्मग्रंथ याच तत्त्वांवर आधारित असतात. धर्मग्रंथांचा अंतिम उद्देश, लोकांना नीतिनियमाप्रमाणे वागण्यास शिकविणे, जर चुका झाल्या असतील, तर पापक्षालनाचा मार्ग दाखविणे हाच असतो. आपल्याकडून जराशीही चूक झाली, तर श्रीगुरूंचे अथवा देवाचे नामस्मरण करा. सतत नामस्मरणाची सवय लागल्यावर हातून पापकर्मे घडत नाहीत.