शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

पाप आणि पुण्य

By admin | Updated: July 2, 2014 08:46 IST

पाप-पुण्याचे परिणाम या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भोगून पूर्ण करावे लागतात आणि जर पूर्ण झाले नाहीत, तर पुढच्या जन्मातही ते भोगावे लागतात.

अध्यात्मब्रह्मलीन क्षीरसागरमहाराजपाप-पुण्याचे परिणाम या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भोगून पूर्ण करावे लागतात आणि जर पूर्ण झाले नाहीत, तर पुढच्या जन्मातही ते भोगावे लागतात. पापाची व पुण्याची आपापसांत वजावट होऊन उरलेले पाप किंवा पुण्य भोगावे लागते, अशी एक चुकीची समजूत सामान्यांमध्ये असलेली दिसून येते. पाप-पुण्याची बेरीज वजाबाकी कधीच होत नाही.संशय व दारिद्र्य हे ज्या ठिकाणी वास करीत असतील, त्याला पाप समजावे आणि संतुष्ट होणे व सदा सुखी राहणे याला पुण्य समजावे. अशाच पद्धतीने सर्वांनी आचरण करावे. पापाचे क्षालन झाल्यावरच मानवाच्या जीवनात पुण्याची वाढ होते व जीवनात शांती-समाधान निर्माण होते. असे समाधान जेव्हा जीवनात प्राप्त होते, तेव्हाच आयुष्यवर्धन होते.प्रत्येक मनुष्यात दोन प्रवृत्ती वास करीत असतात. एक सात्त्विक वृत्ती व दुसरी राक्षसी वृत्ती. पाप कर्मामुळे व्यक्तीचे विचार व वृत्ती पाप कर्माकडेच वळतात. सुधारण्याची शक्यता फारच कमी राहते. मनुष्याला जन्मातच पाप-पुण्याची कल्पना येते. मानवाचा जन्म मिळाल्यावर नीती-नियमांनुसार वागावे व योग्य धर्माचरण करावे. देवाच्या दृष्टीने सर्व लोक समान आहेत. देवाचा न्याय कधीच चुकत नाही. जो पुण्य कर्म करील, त्याला चांगल्या कुळात जन्म मिळेल. पाप कर्मे केलेल्यांनाही जन्म मिळतो, पण तो फक्त दु:ख भोगण्यासाठीच असतो आणि हेच नेमके सामान्य लोकांना समजत नाही. देवाच्या दृष्टिकोनातून जरी सर्व सारखेच असले, तरी जन्म मिळताना पाप-पुण्याचा, पात्रतेचा विचार झालेला असतो. कोणत्याही कुळात का असेना, मनुष्यजन्म मिळाल्याबद्दल देवाचे आपण आभारच मानावयास हवेत. काही लोकांची कल्पना असते, की त्यांचा जन्म हा केवळ मागील जन्मांची पापे फेडण्याकरिता झालेला आहे, म्हणून ते उद्धाराचा कोणताही प्रयत्न न करता, चाकोरीबद्ध जीवन जगत असतात. मानवाकडून चुका होतात, काही वेळा नकळत मोठे अपराधही घडतात. काहींच्या मनात पश्चात्तापाची भावना असते; परंतु योग्य परिमार्जन होत नाही म्हणून एक प्रकारची बोच असते. अशा वेळेस धर्मग्रंथांचे वाचन केल्याने फायदा होतो. कोणत्याही धर्माचे धर्मग्रंथ याच तत्त्वांवर आधारित असतात. धर्मग्रंथांचा अंतिम उद्देश, लोकांना नीतिनियमाप्रमाणे वागण्यास शिकविणे, जर चुका झाल्या असतील, तर पापक्षालनाचा मार्ग दाखविणे हाच असतो. आपल्याकडून जराशीही चूक झाली, तर श्रीगुरूंचे अथवा देवाचे नामस्मरण करा. सतत नामस्मरणाची सवय लागल्यावर हातून पापकर्मे घडत नाहीत.