शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

वाळूमाफियांची मुजोरी

By admin | Updated: January 15, 2016 03:03 IST

सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणारे वाळूमाफियांचे हल्ले ही चिंतेची बाब आहे. दररोज कुठे ना कुठे हल्ले होत आहेत. बुधवारी सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर

सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणारे वाळूमाफियांचे हल्ले ही चिंतेची बाब आहे. दररोज कुठे ना कुठे हल्ले होत आहेत. बुधवारी सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर झालेला हल्ला ही ताजी घटना आहे. वाळूसारख्या गौणखनिजाची मागणी आणि महत्त्व वरचेवर वाढतच आहे. त्यामुळे त्याची तस्करीही वाढू लागली आहे. ती रोखणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटना देशभर घडत आहेत. महसुली आणि पोलीस अधिकाऱ्यांचे मुडदे पाडल्याच्या घटना घडत आहेत. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. राज्यातील एकही जिल्हा असा नाही की जिथे महसुली कर्मचाऱ्यांवर वाळूमाफियांचे हल्ले झाले नाहीत. विशेषत: अलीकडच्या घटनांमध्ये बीड, पुणे, अकोला, हिंगोली, सांगलीच्या घटनांचा समावेश आहे. बुधवारी सोलापूरचे जिल्हाधिकारी मुंडे यांनी बेकायदा वाळू वाहतूक करणारी वाहने अडविली असता त्यांच्या अंगावरही गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. जिल्हाधिकाऱ्यांवरच जीवघेणा हल्ला होत असेल तर तलाठी अन् तहसीलदारांचे काय होत असेल याची कल्पना येते. राज्यातील विविध वाळू उपशातून सरकारला सुमारे दीड हजार कोटींचा महसूल मिळत असल्यामुळे सरकारी तिजोरीला तो एक मोठा हातभारच समजला जातो. एकदा का वाळूचा ठेका घेतला की नैसर्गिक साधनसंपत्तीचा किती उपसा केला याचे मोजमापच नसल्याने वाळूच्या व्यवसायाला सोन्याची खाण समजले जाऊ लागले. त्यातूनच या नैसर्गिक संपतीला ओरबाडण्यासाठी वाळूचे टेंडर भरण्यावरून ठेकेदारांचे मुडदे पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. केंद्र सरकारच्या पर्यावरण धोरणामुळे राज्य सरकारांना मनसोक्तपणे वाळूउपसा करण्यास मर्यादा आल्या असल्या तरी वर्षाला १५०० कोटीचा महसूल तिजोरीत जमा करणाऱ्या या उत्पन्नावर पाणी सोडण्यास राज्य शासन तयार नाही. वाळूचे ठेके लिलावास उशीर झाला तर वाळूची चोरी रोखणे आवाक्याबाहेर जाते. वाळू आणि ठेके याच्या जवळपासही सर्वसामान्यांना जाता येत नाही. पाण्यासारखा पैसा मिळवून देणाऱ्या या व्यवसायात येणाऱ्यांची स्पर्धा वाढली. आणि त्याला गुन्हेगारीचाही स्पर्श झाला. जिल्हाधिकारी मुंडे यांच्यावर गाडी घालण्याचा प्रकारही त्याच मानसिकतेचा भाग होता. नुकताच मंत्रिमंडळाने अशा गुन्हेगारांसाठी दहशतवादी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याचा अंमल अद्याप सुरू झालेला नाही. प्रत्यक्ष कायद्याचा अंमल सुरु झाल्याशिवाय आणि सरकार त्याची कशी प्रभावीपणे अंमलबजावणी करते यावरच महसुली कर्मचाऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे.