शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांची मुजोरी

By admin | Updated: January 15, 2016 03:03 IST

सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणारे वाळूमाफियांचे हल्ले ही चिंतेची बाब आहे. दररोज कुठे ना कुठे हल्ले होत आहेत. बुधवारी सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर

सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणारे वाळूमाफियांचे हल्ले ही चिंतेची बाब आहे. दररोज कुठे ना कुठे हल्ले होत आहेत. बुधवारी सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर झालेला हल्ला ही ताजी घटना आहे. वाळूसारख्या गौणखनिजाची मागणी आणि महत्त्व वरचेवर वाढतच आहे. त्यामुळे त्याची तस्करीही वाढू लागली आहे. ती रोखणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटना देशभर घडत आहेत. महसुली आणि पोलीस अधिकाऱ्यांचे मुडदे पाडल्याच्या घटना घडत आहेत. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. राज्यातील एकही जिल्हा असा नाही की जिथे महसुली कर्मचाऱ्यांवर वाळूमाफियांचे हल्ले झाले नाहीत. विशेषत: अलीकडच्या घटनांमध्ये बीड, पुणे, अकोला, हिंगोली, सांगलीच्या घटनांचा समावेश आहे. बुधवारी सोलापूरचे जिल्हाधिकारी मुंडे यांनी बेकायदा वाळू वाहतूक करणारी वाहने अडविली असता त्यांच्या अंगावरही गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. जिल्हाधिकाऱ्यांवरच जीवघेणा हल्ला होत असेल तर तलाठी अन् तहसीलदारांचे काय होत असेल याची कल्पना येते. राज्यातील विविध वाळू उपशातून सरकारला सुमारे दीड हजार कोटींचा महसूल मिळत असल्यामुळे सरकारी तिजोरीला तो एक मोठा हातभारच समजला जातो. एकदा का वाळूचा ठेका घेतला की नैसर्गिक साधनसंपत्तीचा किती उपसा केला याचे मोजमापच नसल्याने वाळूच्या व्यवसायाला सोन्याची खाण समजले जाऊ लागले. त्यातूनच या नैसर्गिक संपतीला ओरबाडण्यासाठी वाळूचे टेंडर भरण्यावरून ठेकेदारांचे मुडदे पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. केंद्र सरकारच्या पर्यावरण धोरणामुळे राज्य सरकारांना मनसोक्तपणे वाळूउपसा करण्यास मर्यादा आल्या असल्या तरी वर्षाला १५०० कोटीचा महसूल तिजोरीत जमा करणाऱ्या या उत्पन्नावर पाणी सोडण्यास राज्य शासन तयार नाही. वाळूचे ठेके लिलावास उशीर झाला तर वाळूची चोरी रोखणे आवाक्याबाहेर जाते. वाळू आणि ठेके याच्या जवळपासही सर्वसामान्यांना जाता येत नाही. पाण्यासारखा पैसा मिळवून देणाऱ्या या व्यवसायात येणाऱ्यांची स्पर्धा वाढली. आणि त्याला गुन्हेगारीचाही स्पर्श झाला. जिल्हाधिकारी मुंडे यांच्यावर गाडी घालण्याचा प्रकारही त्याच मानसिकतेचा भाग होता. नुकताच मंत्रिमंडळाने अशा गुन्हेगारांसाठी दहशतवादी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याचा अंमल अद्याप सुरू झालेला नाही. प्रत्यक्ष कायद्याचा अंमल सुरु झाल्याशिवाय आणि सरकार त्याची कशी प्रभावीपणे अंमलबजावणी करते यावरच महसुली कर्मचाऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे.