शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

Raj Thackeray: ...तरच मनसेच्या झेंड्यावरची शिवमुद्रा शोभेल, राज ठाकरेंना 'लाभेल'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 10:18 IST

शिवसेनाप्रमुखांना हिटलरचे आकर्षण होते. राज यांनाही ते असू शकते. मात्र राज यांना याचा विसर पडला की, विश्वबंधुत्व, विश्वकल्याणाची अपेक्षा ठेवून राजमुद्रेत ‘विश्ववंदिता’ या शब्दाचे प्रयोजन केले आहे.

राज कपूर हे आपल्या चित्रपटाकरिता भव्यदिव्य सेट उभारायचे, स्टारकास्ट घ्यायचे. त्यामुळे त्यांना रुपेरी पडद्यावरील ‘शोमन’ असे संबोधिले जात होते. महाराष्ट्रातील राज ठाकरे हे पक्षाचे अधिवेशन घेतील, मोर्चा काढतील किंवा फोटोबायोग्राफी प्रकाशित करतील, तरी तो भव्यदिव्य असतो. त्यामुळे राजकारणातील राज हेही एका अर्थाने ‘शोमन’ आहेत.

भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी, पाकिस्तानी नागरिकांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी काढलेला मोर्चा हाही असाच राज यांच्या शोमनशिपचा पुरावा होता. लोकसभा निवडणुकीकडे पाठ फिरवल्यावर व विधानसभा निवडणुकीत एकुलत्या एक आमदारापलीकडे हाती काही न लागल्यानंतर आता महापालिका निवडणुकांकरिता मनसेने पक्षाचे पहिले अधिवेशन अलीकडेच आयोजित केले. यापूर्वी बिहार, उत्तर प्रदेश येथून येणाऱ्या लोंढ्यांविरोधात वातावरण तापवून मराठीच्या मुद्द्यावर मनसेने राजकीय पोळी भाजली. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपला अर्धचंद्र देत शरद पवार यांची करंगळी धरून सत्तेचा सोपान गाठला. आता हिंदुत्वाचे अवकाश आपल्याला मोकळे झाल्याचा भाजपच्या चाणक्यांचा सल्ला ऐकून मनसेने आपला झेंडा बदलला. बांगलादेशी, पाकिस्तानी यांच्या विरोधात षड्डू ठोकले.

अधिवेशनात बोलताना राज यांनी केंद्र सरकारच्या सीएए व एनआरसीविरोधात निघणाऱ्या मोर्चांना मोर्चाने उत्तर दिले जाईल, असे जाहीर केले. त्यानंतर, मनसेच्या नेत्यांनी आपला मोर्चा सीएएच्या समर्थनार्थ नसून घुसखोरांविरोधात असल्याची सारवासारव केली. राज यांनी मोर्चात बोलताना केलेली दगडाला दगडाने व तलवारीला तलवारीने उत्तर देण्याची भाषा ही शाहीनबाग, नागपाडा वगैरे ठिकाणी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणारी होती. केंद्रात सत्तेवर आल्यावर देशासमोरील आर्थिक प्रश्न सोडवण्यात फारसे यश न आलेल्या भाजप सरकारने दिल्ली विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा हिरिरीने मांडला. येणाऱ्या पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांत हिंदुत्वाचे अस्त्र भाजप वापरणार, असे संकेत सध्या मिळत आहेत. सीएए, एनआरसी किंवा राम मंदिर या कुठल्याच मुद्द्यांवर समोरून जहाल प्रतिसाद येत नसल्याने हिंदुत्वाची भट्टी कशी पेटवायची, असा प्रश्न भाजपला पडला आहे. अशा वेळी तलवारीला तलवारीने उत्तर देणारा एखादा भिडू लाभला, तर भाजपला अपेक्षित ठिणगी पडू शकते, असे त्या पक्षातील काही नेत्यांना वाटत आहे. मात्र, भाजपसारख्या देशाची सत्ता ताब्यात असलेला पक्ष जर हिंदुत्वाच्या गर्जना करणार असेल, तर मनसेने हिंदुत्वाच्या नावाने केलेले म्यांव म्यांव कोण कशाला ऐकेल व मनसेला या मुद्द्यावर कशाला मतदान करील, अशी शंका वाटते. भाजपला हिंदुत्वाच्या अवकाशात भागीदार नको, हे शिवसेनेच्या लक्षात येताच त्यांनी त्यांची साथ सोडली.

कुठल्याही ‘भाई’चा ‘बारक्या’ हा कधीच भाई होत नाही. त्यामुळे मनसेचा आपल्या राजकीय फायद्याकरिता वापर करायचा, हा भाजपचा हेतू लपून राहिलेला नाही. समजा, हिंदुत्वाचा मुद्दा चालला नाही व सत्तेकरिता पुन्हा मित्रपक्षाची गरज लागली, तर संख्याबळावर भाजप शिवसेनेला जवळ करील की मनसेला, याचाही शांतपणे विचार करण्याची गरज आहे. काही महिन्यांपूर्वी राज यांच्या पाठीमागे कोहिनूर खरेदीसंबंधी लागलेला (की लावला गेलेला) ईडीच्या चौकशीचा ससेमिरा अचानक बंद झालेला आहे. मनसेची बदललेली भूमिका व ईडीची बंद झालेली फाइल, याचा अन्योन्यसंबंध असल्याचे सर्वसामान्यांच्या मनात घोळत राहिल्यावाचून राहत नाही. राज यांनी नाशिकमध्ये सत्ता असताना काही चांगली कामे केली. राज्यात बेकायदा टोलवसुलीला वेसण घालण्याकरिता आंदोलन केल्याने काही बेकायदा टोलनाके बंद झाले. राजकारणात सध्या राज यांच्याकरिता कठीण काळ आहे. अशा वेळी त्यांनी सावधपणे बाळासाहेबांच्या समाजकारणाचा वसा सांभाळला, तर लोकांच्या मनातील त्यांचे स्थान प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाईल आणि शिवमुद्रेचा स्वीकार सार्थ ठरेल. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे