शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

अप्रिय पण दूरगामी निर्णयांची हिंमत दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 02:41 IST

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सुमारे चार लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोजाखाली दबलेले सरकार आपला ‘मॅग्नेटिक’ अर्थसंकल्प सादर करेलच.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सुमारे चार लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोजाखाली दबलेले सरकार आपला ‘मॅग्नेटिक’ अर्थसंकल्प सादर करेलच. नव्या जोमाने कामाला लागलेले वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पेटा-यातून काय काय निघते या बाबत उत्सुकता आहे. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’द्वारे कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार सध्या होत आहेत. ‘वन ट्रिलियन एकॉनॉमी’कडे साध्य करण्याचा राज्यकर्त्यांचा निर्धार आहे. प्रचंड औद्योगिक गुंतवणुकीतून उद्या मोठा रोजगार निर्माण होऊन राज्य संपन्न होईलही पण वाढता प्रशासकीय आस्थापना खर्च, अव्यवहार्य योजनांवरील कोट्यवधींचा अनाठायी व्यय, अधिकाºयांची आणि सत्ताधा-यांची कंत्राटदारधार्जिणी मानसिकता याला आवर घालत नाही तोवर सरकारचा आर्थिक डोलारा सावरणार नाही.अनेक महामंडळे अशी आहेत की त्यातील कर्मचारी बिनाकामाने नुसते पोसले जात आहेत. ज्या उद्देशाने ती सुरू करण्यात आली होती त्यावर १०-१५ टक्केच निधी ‘सत्कारणी’ लागतो आणि ८०-८५ टक्के निधी हा निव्वळ आस्थापनेवर खर्ची होतो. ही महामंडळे बंद करून वा काहींचे एकत्रीकरण करण्याचे सूतोवाच सध्याच्या राज्यकर्त्यांनी केले पण प्रत्यक्षात काहीही झाले नाही. असंघटित कामगारांसाठीची मंडळे आणि योजना एकाच छताखाली आणण्यास माथाडी कामगारांच्या नेत्यांनी विरोध करताच कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लगेच माघार घेतली. प्रसंगी जनतेला अप्रिय वाटतील पण राज्याच्या व्यापक हिताचे आणि पुढे चालून जनहित साधतील असे निर्णय घेण्याची हिंमत आणि क्षमता राज्यकर्त्यांनी दाखविली पाहिजे. विनापयोगी शासकीय मालमत्ता (जमिनी आदी) विकून वा त्यांचा व्यावसायिक वापर करून मोठा पैसा उभारण्याचे संकेत मुनगंटीवार यांनी मागे केले होते. मात्र, काहीही झाले नाही. या मालमत्तांच्या योग्य वापरातून राज्याच्या तिजोरीला हातभार लागू शकेल हा विचार मांडण्यात गैर काय आहे? राज्याचे आर्थिक वास्तव जनतेला सांगायचे की लोकानुनयी वागतबोलत राहायचे हे एकदा ठरवा. तसे केले नाही तर ती राज्याची आणि तुमची स्वत:चीही फसवणूक असेल. सध्याच्या सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती आणि देखभालीवर कोट्यवधींचा खर्च येणार आहे. नवीन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी ७५ हजार कोटी रुपयांची गरज आहे. अशावेळी निदान मोठ्या धरणांच्या खासगीकरणाचा विचार करायला हवा आणि ते करताना शेती, पिण्याच्या पाण्याची दरवाढ होणार नाही ही हमी सरकारने द्यायला हवी. जगातील अनेक देशांनी आज हे सूत्र स्वीकारले आहे. आघाडी सरकारच्या काळात हा विचार झाला होता. लोकानुनयी निर्णयांच्या नादी लागलेली सरकारे कठोर निर्णयाची वेळ आली की डगमगतात. सरकारी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग हा द्यावाच लागेल. त्याचा आर्थिक बोजाही सहन करावा लागणार आहे.मात्र, एकीकडे बेरोजगारांची प्रचंड संख्या असताना सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याचे काय कारण? सर्वांना असे हो हो म्हणत जाल तर कसे होईल? राज्यकर्त्यांनी प्रसंगी नाही म्हणायलादेखील शिकले पाहिजे. नाणारची रिफायनरी असो की नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग दोन्हींना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत आहे. तसे होऊ नये म्हणून महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत राजकीय आणि सामाजिक मतैक्य आधी साधले जावे. विकासाला विरोधाची भूमिका शिवसेनेने सोडली तर मराठी माणसांचे भलेच होईल.- यदु जोशी

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस