शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अप्रिय पण दूरगामी निर्णयांची हिंमत दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 02:41 IST

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सुमारे चार लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोजाखाली दबलेले सरकार आपला ‘मॅग्नेटिक’ अर्थसंकल्प सादर करेलच.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सुमारे चार लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोजाखाली दबलेले सरकार आपला ‘मॅग्नेटिक’ अर्थसंकल्प सादर करेलच. नव्या जोमाने कामाला लागलेले वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पेटा-यातून काय काय निघते या बाबत उत्सुकता आहे. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’द्वारे कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार सध्या होत आहेत. ‘वन ट्रिलियन एकॉनॉमी’कडे साध्य करण्याचा राज्यकर्त्यांचा निर्धार आहे. प्रचंड औद्योगिक गुंतवणुकीतून उद्या मोठा रोजगार निर्माण होऊन राज्य संपन्न होईलही पण वाढता प्रशासकीय आस्थापना खर्च, अव्यवहार्य योजनांवरील कोट्यवधींचा अनाठायी व्यय, अधिकाºयांची आणि सत्ताधा-यांची कंत्राटदारधार्जिणी मानसिकता याला आवर घालत नाही तोवर सरकारचा आर्थिक डोलारा सावरणार नाही.अनेक महामंडळे अशी आहेत की त्यातील कर्मचारी बिनाकामाने नुसते पोसले जात आहेत. ज्या उद्देशाने ती सुरू करण्यात आली होती त्यावर १०-१५ टक्केच निधी ‘सत्कारणी’ लागतो आणि ८०-८५ टक्के निधी हा निव्वळ आस्थापनेवर खर्ची होतो. ही महामंडळे बंद करून वा काहींचे एकत्रीकरण करण्याचे सूतोवाच सध्याच्या राज्यकर्त्यांनी केले पण प्रत्यक्षात काहीही झाले नाही. असंघटित कामगारांसाठीची मंडळे आणि योजना एकाच छताखाली आणण्यास माथाडी कामगारांच्या नेत्यांनी विरोध करताच कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लगेच माघार घेतली. प्रसंगी जनतेला अप्रिय वाटतील पण राज्याच्या व्यापक हिताचे आणि पुढे चालून जनहित साधतील असे निर्णय घेण्याची हिंमत आणि क्षमता राज्यकर्त्यांनी दाखविली पाहिजे. विनापयोगी शासकीय मालमत्ता (जमिनी आदी) विकून वा त्यांचा व्यावसायिक वापर करून मोठा पैसा उभारण्याचे संकेत मुनगंटीवार यांनी मागे केले होते. मात्र, काहीही झाले नाही. या मालमत्तांच्या योग्य वापरातून राज्याच्या तिजोरीला हातभार लागू शकेल हा विचार मांडण्यात गैर काय आहे? राज्याचे आर्थिक वास्तव जनतेला सांगायचे की लोकानुनयी वागतबोलत राहायचे हे एकदा ठरवा. तसे केले नाही तर ती राज्याची आणि तुमची स्वत:चीही फसवणूक असेल. सध्याच्या सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती आणि देखभालीवर कोट्यवधींचा खर्च येणार आहे. नवीन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी ७५ हजार कोटी रुपयांची गरज आहे. अशावेळी निदान मोठ्या धरणांच्या खासगीकरणाचा विचार करायला हवा आणि ते करताना शेती, पिण्याच्या पाण्याची दरवाढ होणार नाही ही हमी सरकारने द्यायला हवी. जगातील अनेक देशांनी आज हे सूत्र स्वीकारले आहे. आघाडी सरकारच्या काळात हा विचार झाला होता. लोकानुनयी निर्णयांच्या नादी लागलेली सरकारे कठोर निर्णयाची वेळ आली की डगमगतात. सरकारी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग हा द्यावाच लागेल. त्याचा आर्थिक बोजाही सहन करावा लागणार आहे.मात्र, एकीकडे बेरोजगारांची प्रचंड संख्या असताना सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याचे काय कारण? सर्वांना असे हो हो म्हणत जाल तर कसे होईल? राज्यकर्त्यांनी प्रसंगी नाही म्हणायलादेखील शिकले पाहिजे. नाणारची रिफायनरी असो की नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग दोन्हींना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत आहे. तसे होऊ नये म्हणून महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत राजकीय आणि सामाजिक मतैक्य आधी साधले जावे. विकासाला विरोधाची भूमिका शिवसेनेने सोडली तर मराठी माणसांचे भलेच होईल.- यदु जोशी

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस