शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

सजा झालीच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 05:02 IST

डहाणूलगतच्या सागरात ४० विद्यार्थ्यांनी भरलेली लाँच बुडून तीन विद्यार्थिनी प्राणास मुकल्या. ही दुर्घटना असली तरी तिला कारणीभूत असलेले लाँचचे मालक, वाहक, खलाशी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत

डहाणूलगतच्या सागरात ४० विद्यार्थ्यांनी भरलेली लाँच बुडून तीन विद्यार्थिनी प्राणास मुकल्या. ही दुर्घटना असली तरी तिला कारणीभूत असलेले लाँचचे मालक, वाहक, खलाशी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. तशाच स्वरूपाचे गुन्हे बंदर खात्याचे, मेरिटाइम बोर्डाचे, सागरी पोलीस दलाचे आणि महसूलचे संबंधित अधिकारी यांच्याविरुद्धही दाखल झाले पाहिजेत; आणि हे सर्व खटले जलदगती न्यायालयात चालवून त्यांना कठोर सजाही झाली पाहिजे. सागरी पोलिसांच्या स्पीड बोटी नादुरुस्त होत्या. परिणामी त्या वापरता आल्या नाहीत. त्यामुळे बचावकार्य उशिरा सुरू झाले. त्याची किंमत तीन विद्यार्थिनींना जीव देऊन मोजावी लागली. या बोटी सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी कोणाची होती? कुणी हलगर्जी केली? याचा सखोल तपास व्हायला हवा. महसूलची यंत्रणा पूर्वी ठाणे जिल्हा असताना दुर्घटनास्थळी पोहोचण्यासाठी जेवढा वेळ घ्यायची तेवढाच वेळ तिने पालघर जिल्हा झाल्यानंतरही पालघरहून घटनास्थळी येण्यासाठी घेतला. यालाही जबाबदार जे कुणी असतील त्यांच्याविरुद्धसुद्धा कायद्याचा फास आवळला पाहिजे. बोटी मिळाल्यात; पण त्यांच्या वापरासाठी लागणारे डिझेल, पेट्रोल, चालक, देखभालीसाठी तंत्रज्ञ यांचा पत्ताच नाही. त्यासाठी आर्थिक तरतूद नाही. आवश्यक ते परवाने आणि सुरक्षात्मक यंत्रणा, सुविधा आहेत की नाही याची खातरजमा कुणी करीत नाही, हे सारेच भयानक आहे. मुंबईवरील हल्ला झाल्यानंतरही ही बेफिकिरीची स्थिती कायम आहे. मुंबईवरील हल्ल्यानंतर मुंबई परिसरातील सर्वच टोलनाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले. परंतु नव्या मुंबईतून आरडीएक्सचा साठा सुरत आणि अहमदाबादमध्ये गेला तो ठाणे, भिवंडी, वाडामार्गे हे कळाल्यावर तेथील टोलनाक्यांवरील फूटेज तपासणीसाठी मागविले असता कळाले की, या फूटेजचे रेकॉर्डिंग करणारी, ते साठवणारी, ते हवे तेव्हा उपलब्ध करून देणारी ‘मास्टर कंट्रोल रूम’च साकारली गेलेली नव्हती. अशी बेफिकिरी याही बाबतीत दाखविली गेली आहे. त्याचे मोल तीन विद्यार्थिनींना आपला जीव देऊन मोजावे लागले आहे. सेल्फी काढताना बोट कलंडून दुर्घटना घडल्याचे चालकाचे म्हणणे आहे. मुलांनी अशा ठिकाणी जबाबदारीने वागले पाहिजे. पालकांनीही त्यांना तशी जाणीव करून द्यायला हवी. कमला मिल दुर्घटनेनंतर बेकायदा हॉटेलवर कारवाई करण्यात आली. मोजोज्, वन अबव्हच्या मालकांना बेड्या ठोकल्या गेल्या. दबावापोटी ही वेगवान कारवाई करण्यात आली. तसाच वेग डहाणू बोटीच्या दुर्घटनेविषयीदेखील हवा. तरच अशा दुर्घटना भविष्यात टाळू शकू.