शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

सजा झालीच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 05:02 IST

डहाणूलगतच्या सागरात ४० विद्यार्थ्यांनी भरलेली लाँच बुडून तीन विद्यार्थिनी प्राणास मुकल्या. ही दुर्घटना असली तरी तिला कारणीभूत असलेले लाँचचे मालक, वाहक, खलाशी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत

डहाणूलगतच्या सागरात ४० विद्यार्थ्यांनी भरलेली लाँच बुडून तीन विद्यार्थिनी प्राणास मुकल्या. ही दुर्घटना असली तरी तिला कारणीभूत असलेले लाँचचे मालक, वाहक, खलाशी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. तशाच स्वरूपाचे गुन्हे बंदर खात्याचे, मेरिटाइम बोर्डाचे, सागरी पोलीस दलाचे आणि महसूलचे संबंधित अधिकारी यांच्याविरुद्धही दाखल झाले पाहिजेत; आणि हे सर्व खटले जलदगती न्यायालयात चालवून त्यांना कठोर सजाही झाली पाहिजे. सागरी पोलिसांच्या स्पीड बोटी नादुरुस्त होत्या. परिणामी त्या वापरता आल्या नाहीत. त्यामुळे बचावकार्य उशिरा सुरू झाले. त्याची किंमत तीन विद्यार्थिनींना जीव देऊन मोजावी लागली. या बोटी सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी कोणाची होती? कुणी हलगर्जी केली? याचा सखोल तपास व्हायला हवा. महसूलची यंत्रणा पूर्वी ठाणे जिल्हा असताना दुर्घटनास्थळी पोहोचण्यासाठी जेवढा वेळ घ्यायची तेवढाच वेळ तिने पालघर जिल्हा झाल्यानंतरही पालघरहून घटनास्थळी येण्यासाठी घेतला. यालाही जबाबदार जे कुणी असतील त्यांच्याविरुद्धसुद्धा कायद्याचा फास आवळला पाहिजे. बोटी मिळाल्यात; पण त्यांच्या वापरासाठी लागणारे डिझेल, पेट्रोल, चालक, देखभालीसाठी तंत्रज्ञ यांचा पत्ताच नाही. त्यासाठी आर्थिक तरतूद नाही. आवश्यक ते परवाने आणि सुरक्षात्मक यंत्रणा, सुविधा आहेत की नाही याची खातरजमा कुणी करीत नाही, हे सारेच भयानक आहे. मुंबईवरील हल्ला झाल्यानंतरही ही बेफिकिरीची स्थिती कायम आहे. मुंबईवरील हल्ल्यानंतर मुंबई परिसरातील सर्वच टोलनाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले. परंतु नव्या मुंबईतून आरडीएक्सचा साठा सुरत आणि अहमदाबादमध्ये गेला तो ठाणे, भिवंडी, वाडामार्गे हे कळाल्यावर तेथील टोलनाक्यांवरील फूटेज तपासणीसाठी मागविले असता कळाले की, या फूटेजचे रेकॉर्डिंग करणारी, ते साठवणारी, ते हवे तेव्हा उपलब्ध करून देणारी ‘मास्टर कंट्रोल रूम’च साकारली गेलेली नव्हती. अशी बेफिकिरी याही बाबतीत दाखविली गेली आहे. त्याचे मोल तीन विद्यार्थिनींना आपला जीव देऊन मोजावे लागले आहे. सेल्फी काढताना बोट कलंडून दुर्घटना घडल्याचे चालकाचे म्हणणे आहे. मुलांनी अशा ठिकाणी जबाबदारीने वागले पाहिजे. पालकांनीही त्यांना तशी जाणीव करून द्यायला हवी. कमला मिल दुर्घटनेनंतर बेकायदा हॉटेलवर कारवाई करण्यात आली. मोजोज्, वन अबव्हच्या मालकांना बेड्या ठोकल्या गेल्या. दबावापोटी ही वेगवान कारवाई करण्यात आली. तसाच वेग डहाणू बोटीच्या दुर्घटनेविषयीदेखील हवा. तरच अशा दुर्घटना भविष्यात टाळू शकू.