शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

Editorial: सवंग लोकप्रियतेचा शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 05:05 IST

Mahavitaran: कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्याचे महसुली उत्पन्न कमालीचे घटले आहे. जीएसटीबाबत केंद्राने हात आखडता घेतला आहे. महावितरण काही गेल्या एक-दोन दिवसात तोट्यात आलेले नाही.

वाढीव वीजबिल माफ केले जाणार नाही वा त्यात आता आणखी कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे जाहीर करून ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील लाखो वीजग्राहकांना दिवाळीनंतर फटाका लावला आहे.  सवंग लोकप्रियतेतून ग्राहकांना दिलेला हा शॉक आहे. कारण, आधी राऊत यांनीच सवलतींचे आश्वासन सातत्याने दिले होते. दिवाळीपूर्वी गोड बातमी देऊ, असेही म्हटले होते. ‘तुमच्या दारात वीजबिल टाकणारी महावितरण कंपनी आधीच मोठ्या तोट्यात आहे, त्यामुळे सवलत वगैरे देता येणार नाही’ हे राऊत आधीदेखील सांगू शकले असते; पण आजकालचे सत्ताधारी लष्कर-ए-होयबा होत चालले आहेत. सत्ताकारण करताना नाही म्हणण्याचे नैतिक बळ बाळगणे आणि ते योग्य ठिकाणी वापरणे हे चांगल्या सत्ताधाऱ्यांचे लक्षण असते. लोकांच्या दबावाला बळी पडत त्यांच्या हो मध्ये हो मिसळणे यातून टाळ्या मिळू शकतील; पण प्रश्न पैशांचा आहे, पैशांचे सोंग करता येत नाही. त्यासाठी राज्याची तिजोरी भक्कम असावी लागते; ती आज नाही. 

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्याचे महसुली उत्पन्न कमालीचे घटले आहे. जीएसटीबाबत केंद्राने हात आखडता घेतला आहे. महावितरण काही गेल्या एक-दोन दिवसात तोट्यात आलेले नाही. वस्तूत: महावितरणची घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक आदी वीजग्राहकांकडे  सहा हजार कोटी रुपयांहून अधिकची थकबाकी आहे. मार्चच्या सुरुवातीला चालू थकबाकी २५०० कोटी रुपयांच्या घरात होती. लॉकडाऊनमधील तीन महिन्यांच्या काळात वाढीव बिले आकारल्या गेल्याने असंतोष निर्माण झाला आणि त्या असंतोषाची दखल घेत सरकारने या बिलांमध्ये सवलत देण्याचे आश्वासन दिले. त्यातून एप्रिल, मे आणि जूनची बिले माफ केली जाणार अशी आशा निर्माण झाल्याने अनेकांनी वीजबिलेच भरली नाहीत. त्यामुळे पूर्ण बिल भरणाऱ्या ग्राहकांना बिलात दोन टक्के सवलत देण्याच्या निर्णयाचा फार फायदा झाला नाही.

वीजग्राहकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बैठका घेत आशा दाखविली. आज ना उद्या बिल माफ होईलच अशी आशा ऊर्जा मंत्र्यांच्या आश्वासनानेही वाढली होती. त्या ऐवजी लोकांना सगळे फुकट देता येणार नाही, बिल भरावेच लागेल असे सुरुवातीलाच सांगितले असते तर आज राऊत हे टीकेचे लक्ष्य बनले नसते, विरोधकांना सरकारवर टीकेची संधी मिळाली नसती आणि महावितरणच्या थकबाकीचा डोंगरही वाढला नसता. वाढीव वीजबिले येण्याचे एक प्रमुख कारण हे वाढलेले वीजदर हेदेखील आहे हे ग्राहकांना पटवून देण्यात सरकार कमी पडले.  बिल न भरल्यास वीज कनेक्शन कापण्याची कारवाई केली जाते; पण कोरोनाचा संकटकाळ लक्षात घेता त्यालाही स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे बिल भरले नाही तरी कनेक्शन कापले जाणार नसल्याने लोकांचीही हिंमत वाढली. परिणामत: चालू थकबाकीचा आकडा सहा हजार कोटींच्या पार गेला. वीजबिलात सवलतीचे गाजर दाखविण्याऐवजी राज्य सरकारची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेता बिल माफ करता येणार नाही, असे सरकारने ठणकावून सांगायला हवे होते. केंद्र सरकारने आर्थिक मदत दिली नाही म्हणून वीजबिलात सवलत देता आली नाही हा ऊर्जा मंत्र्यांचा कांगावा अतार्किक आहे.

१०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा राऊत यांनी मंत्री झाल्यानंतर काहीच दिवसात केली होती. मात्र, आता त्यांनीच अशी मोफत वीज देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा आणखी एक यू-टर्न. वीज मंडळातील कंपन्या आणि होल्डिंग कंपनीतील संचालकांच्या त्यांनी केलेल्या राजकीय नियुक्त्याही वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. शेवटी त्या त्यांना रद्द कराव्या लागल्या. वीज आणि यू-टर्न हे महाराष्ट्राला नवीन नाही. एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडवायला निघालेल्या शिवसेना-भाजप युतीनेच पुढे त्यांची सत्ता आल्यानंतर त्याचे पुनरुज्जीवन केले होते. शेतकऱ्यांना वीजबिल माफ करण्याच्या घोषणेवर घूमजाव करताना ती घोषणा एक ‘प्रिंटिंग मिस्टेक’ होती अशी भूमिका तेव्हाच्या आघाडी सरकारने घेतली होती. आता वीजबिल सवलत आणि १०० युनिटपर्यंतच्या मोफत विजेची घोषणाही हवेत विरली आहे. विजेचे स्वतंत्र असे अर्थकारण आहे, इतर विभागांच्या फुटपट्ट्या तिथे लागू होत नाहीत, ते अर्थकारण मंत्र्यांनी आधी जाणून घेत नंतर घोषणा केल्या तर त्यांच्यावर घूमजावची पाळी येणार नाही.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज