शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिवसेनेला उर्जेची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 16:33 IST

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची राज्यस्तरीय जनआशीर्वाद यात्रा खान्देशातून सुरु होत आहे

मिलिंद कुलकर्णीयुवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची राज्यस्तरीय जनआशीर्वाद यात्रा खान्देशातून सुरु होत आहे. खान्देश हा शिवसेनेचा कधीही बालेकिल्ला राहिलेला नाही; परंतु सेना आणि ठाकरे कुटुंबाचा खान्देशशी ऋणानुबंध जुना आहे. प्रबोधनकार ठाकरे आणि जळगावच्या ‘बातमीदार’च्या नानासाहेब नेहेते कुुटुंबियांचा ऋणानुबंध होता. प्रबोधनकार हे ‘बातमीदार’मध्ये नियमित स्तंभलेखन करीत असत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद नानासाहेबांच्या सुपूत्राकडे दिले होते. बाळासाहेब ठाकरेदेखील अनेकदा खान्देशात येऊन गेले. जळगावात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी सुरेशदादा जैन यांनी बाळासाहेबांना बोलावले होते. त्यावेळी झोपडपट्टीवासीयांसाठी सुरेशदादांनी उभारलेली घरकुले पाहून भारावलेल्या बाळासाहेबांनी पहिल्या युती सरकारच्या काळात शिवशाही गृहनिर्माण प्रकल्पाची जबाबदारी सुरेशदादा जैन यांच्यावर सोपविली. भुसावळात विधानसभेची उमेदवारी तत्कालीन जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांना जाहीर झाली होती, परंतु, बाळासाहेबांच्या जाहीर सभेत दायमा यांनी तत्कालीन तालुकाप्रमुख दिलीप भोळे यांचे नाव उमेदवारीसाठी सुचविले आणि बाळासाहेबांनी दिलदारीने ते स्विकारले. भोळे सलग दोनदा आमदार झाले. शिवसैनिक, पदाधिकारी आणि बाळासाहेब यांच्यातील स्रेह, ऋणानुबंध आणि विश्वासाचे हे मोठे उदाहरण होते. संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख अशी उत्तम संघटनबांधणी सेनेत आहे. हरिभाऊ महाजन, गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, सुरेशदादा जैन, आर.ओ.पाटील, किशोर पाटील, प्रा.चंद्रकांत सोनवणे, प्रा.शरद पाटील, रामकृष्ण पाटील असे आमदार सेनेकडून निवडून आले आहेत. काही नंतर सेनेतून बाहेर पडले, पण प्रभाव राखू शकले नाही.खान्देशचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यात सेनेचे संघटन चांगले आहे. राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे उपनेतेदेखील आहेत. प्रा.चंद्रकांत सोनवणे व किशोर पाटील हे आणखी दोन आमदार आहेत. काही पालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायतींवर सेनेचे वर्चस्व आहे. मात्र धुळे, नंदुरबारची तशी स्थिती नाही. धुळे हा एकीकडे सेनेचा बालेकिल्ला होता. मात्र अंतर्गत राजकारणामुळे ताकद क्षीण झाली. महापालिकेवर असलेले वर्चस्व गमावले गेले. नंदुरबारात काँग्रेसशी आघाडी करुन सेनेने पालिकेत सत्तास्थान मिळविले. पण उर्वरित ठिकाणी ताकद नसल्याची स्थिती आहे.विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने विचार केला तर जळगाव जिल्ह्यात जळगाव ग्रामीण, पाचोरा आणि चोपडा हे मतदारसंघ विद्यमान आमदारांचे असल्याने भाजपसोबत युती करताना त्यात काही बदल संभवत नाही. जळगावात सुरेशदादा जैन, एरंडोलमध्ये चिमणराव पाटील, मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील हे गेल्यावेळी पराभूत झाले असले तरी त्यांची मतदारसंघावर पकड आहे. भाजपकडून हे मतदारसंघ मिळविण्यासाठी सेनेला जोरकस प्रयत्न करावे लागणार आहेत. चाळीसगाव आणि भुसावळमध्ये सेनेची ताकद असताना चुकीचे उमेदवार दिले गेल्याने मोठा फटका बसला. त्याठिकाणी आता सेनेला दावा करणेही अवघड बनले आहे. जामनेर आणि रावेरमध्ये कामगिरी फारशी समाधानकारक नाही.धुळ्यात प्रा.शरद पाटील हे ग्रामीण मतदारसंघाऐवजी धुळे शहरात इच्छुक आहेत. पण ही जागा गेल्यावेळी भाजपने जिंकली असल्याने सेनेला ती परत मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. तर ग्रामीणमध्ये पक्षाला उमेदवार शोधावा लागणार आहे. साक्री, शिरपूर, शिंदखेड्यात पक्षाचे पदाधिकारी सक्रीय असले तरी संघटन मजबूत नाही आणि निवडणुकीत विजयाचे गणित जमून येण्यासारखी स्थिती नाही.नंदुरबारात डॉ.विक्रांत मोरे, आमशा पाडवी यांच्यासारखे जिल्हाप्रमुख प्रभावी आहेत, पण संघटन कार्य फारसे नसल्याने विधानसभा निवडणुकीत पक्षाचा एखादा उमेदवार पाच आकडी संख्या गाठतो, हा इतिहास आहे. त्यामुळे संघटनात्मक नव्याने बांधणी करण्याची आवश्यकता आहे.आदित्य ठाकरे हे नव्या दमाचे, दृष्टीचे आणि विचारांचे युवा नेते आहेत. त्यांच्या यात्रेचा फायदा सेनेला होईलच, शिवाय जनमानसामध्ये या तरुण नेतृत्वाविषयी आशा निर्माण होण्यास मदत होईल.

टॅग्स :Jalgaonजळगाव