शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

चमकोगिरीमुळे आंदोलने भरकटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 12:47 IST

मिलिंद कुलकर्णी आंदोलन हा शब्दच मुळी मानवी भावभावना प्रकट करणारा आहे. या आयुधाचा वापर प्रत्येक देशात होत असतो. ...

मिलिंद कुलकर्णी आंदोलन हा शब्दच मुळी मानवी भावभावना प्रकट करणारा आहे. या आयुधाचा वापर प्रत्येक देशात होत असतो. स्वातंत्र्यचळवळीत त्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. आपल्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराविषयी आवाज उठविणे, प्रतिकार करण्याचे आंदोलन हे माध्यम आहे. महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, नेल्सन मंडेला यांनी या आयुधाला नैतिक अधिष्ठान प्राप्त करुन दिले. आंदोलनांचे देखील प्रकार आहेत. गांधीजींनी त्या आयुधाचा समर्पकपणे वापर केला. सत्याग्रह, सविनय कायदेभंग अशा आंदोलनातून त्यांनी ब्रिटिश सरकारविरुध्दचा रोष जसा प्रकट केला तशीच अन्याय, अत्याचाराविषयी जनभावना तयार होईल, हेदेखील आवर्जून बघितले. आंदोलन हिंसक होऊ लागले तर गांधीजींनी ते मागेदेखील घेतल्याची उदाहरणे आहेत. वृक्षांना वाचविण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांचे चिपको आंदोलन असो की, अलीकडे अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरुध्द केलेले आंदोलन असो, त्यात जनसहभाग महत्त्वाचा ठरला. आंदोलनाचे कारण हे खूप महत्त्वाचे असते. गांधीजींनी स्वातंत्र्यचळवळीविषयी जागृती निर्माण करीत असताना विदेशी कपड्यांची होळी, मिठाचे आंदोलन असे मुद्दे घेऊन जनतेच्या मनात स्फुल्लींग पेटविले. नेल्सन मंडेला यांनी वांशिक विद्वेषाविरुध्द आंदोलन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीव्यवस्थेविरुध्द आंदोलन करताना चवदार तळे, काळाराम मंदिराच्या प्रसंगात जनसामान्यांमधील असंतोष, अन्यायाच्या भावनेचे प्रकटीकरण केले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांच्या प्रवेशासाठी सानेगुरुजींनी आंदोलन केले. आंदोलनाचे विषय संवेदनशील, जनतेच्यादृष्टीने महत्त्वाचे असले तर त्याला जनसमर्थन मिळाल्याशिवाय राहत नाही. आंदोलनाची नेमकी वेळ, काळ निवडणे जसे महत्त्वाचे असते तसे ते थांबविणे, मागे घेण्याची वेळदेखील महत्त्वाची असते. वेगवेगळे विषय घेऊन सरकारला धारेवर धरणाºया अण्णा हजारे यांच्या धरसोडीच्या भूमिकेवर टीका झाली होती. टोल नाक्याविरोधात आंदोलन अर्धवट सोडल्याची टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर झाली होती. त्यामुळे आंदोलनाची अखेरदेखील महत्त्वाची असते. स्वातंत्र्योत्तर काळात संघटनकौशल्य असलेल्या संघटना, पक्षांनी केलेली आंदोलने गाजली. महाराष्टÑाचा विचार केला तर मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनाचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्या आंदोलनामुळे विस्थापित आदिवासींना घरे, जमिनी मिळाल्या. सरदार सरोवर धरण रोखले गेले नाही, पण आदिवासींसाठी त्या अद्याप झगडत आहेत. शरद जोशी यांचे शेतकरी आंदोलन ऐतिहासिक ठरले. कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पक्ष या सारख्या संघटनावर भर देणाºया पक्षांमध्ये आंदोलनाचे सातत्य आणि चिकाटी वाखाणण्यासारखी आहे. देशव्यापी आंदोलन प्रत्येक जिल्हाठिकाणी होणारच, भले चार कार्यकर्ते का असेना, पण आंदोलन होणारच. अलिकडे मात्र आंदोलनांमध्ये चमकोगिरीला महत्त्व प्राप्त झाले आहे. विषय बाजूला पडून नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा प्रभावी ठरत आहे. त्यातून आंदोलनाविषयी तारतम्याचे भान राहत नाही. भाजपचे अलिकडचे दूधविषयक आंदोलन टीकेचा विषय ठरले. दूध व दुधाची भुकटी याला सरकारने अनुदान द्यावे, यामागणीसाठी हे आंदोलन होते. नंदुरबारात एकही शासकीय डेअरी नाही. त्यामुळे तेथे सरकारकडून दूध विकत घेण्याचा आणि मागणीप्रमाणे अनुदानाचा विषय उद्भवत नाही. तरीही तेथे आंदोलन झाले. जळगावात जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी जिल्हा दूध संघासमोर आंदोलन केले. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे अध्यक्ष असलेल्या या संघाचे संचालकपद भोळे यांच्याकडे आहे. मागणी सरकारशी संबंधित असताना दूध संघासमोर आंदोलनाचे प्रयोजन कळले नाही. माध्यमात आंदोलनस्थळ चर्चेचा विषय ठरले. कळसाध्याय ठरला तो चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याने दूध आंदोलन मागे पडून चव्हाणांविरोधात प्रतिआंदोलन सुरु झाले. मोबाईल, कॅमेरा समोर असल्यावर भल्याभल्यांची जीभ, वर्तन घसरताना सगळ्यांनी पाहिलेले आहे. अशा वर्तनाने ते टीकेचे धनी ठरले आहेत. एवढे भान बाळगले तरी आंदोलनाचा मूळ हेतू साधला जाईल.
टॅग्स :Jalgaonजळगाव