शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

शेंड्यावरचे शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:32 IST

मोर्चे व आंदोलन करणा-यांनी ग्राहक आणि शेतकरी जगला पाहिजे, याचा विचार करून धोरण ठरवण्यासाठी पुढे आले पाहिजे. शेतक-यांसाठी स्थापन केलेल्या संस्था जगल्या पाहिजेत आणि त्यामध्ये पारदर्शीपणा आला पाहिजे, यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.

मोर्चे व आंदोलन करणा-यांनी ग्राहक आणि शेतकरी जगला पाहिजे, याचा विचार करून धोरण ठरवण्यासाठी पुढे आले पाहिजे. शेतक-यांसाठी स्थापन केलेल्या संस्था जगल्या पाहिजेत आणि त्यामध्ये पारदर्शीपणा आला पाहिजे, यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.शेतमालाचे भाव पडले की शेतकºयांचा एल्गार आणि भाव वाढले की ग्राहकांचे मोर्चे ही आता राजकीय पक्षाची हत्यारे झाली आहेत आणि ती सोयीनुसार वापरली जात आहेत. यात ना शेतक-यांचे कधी भले झाले ना कधी ग्राहकांना त्याचा फायदा झाला. उसाचा दर वाढवून दिला तेव्हा साखरेचेही दर वाढले. तेव्हा साखर न खाल्ल्याने मरत नाही हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खणखणीत उत्तर अनेकांच्या जिव्हारी लागले असेल. पण व्यवहार बघायला गेले तर चुकीचे काहीच नाही, असे वाटते.आज शेतकºयांच्या दुधाला भाव नाही. भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला जात आहे. अशा वेळी कोणताही राजकीय पक्ष यासाठी मोर्चा काढताना दिसत नाही. कांद्याचे भाव वाढवून द्या म्हणून शेतक-यांच्या मोर्चात सामील होणारेच महागाई कमी करा म्हणून निघणाºया मोर्चात सामील होतात, किंबहुना मोर्चाचे नेतृत्वच करतात. अशा दुतोंडी राजकारणामुळे धड शेतकºयांचे भले होईना, ना ग्राहकांना रास्त भावात माल मिळेना. शेतकºयांच्या नावाने स्थापन झालेल्या बाजार समित्या व सहकारी संस्थांमध्ये शेतकºयांचीच अडवणूक होत आहे. त्यामुळे शेतकरी हा नावालाच शेतकरी असतो. तो एक पीक काढणे वा शेतीच्या फायदा-तोट्याचा फारसा विचार करताना दिसत नाही. शेतकºयांना व्यापारी डोके अजून दिलेलेच नाही. केवळ वरवरचे दिसणारे जग याला भुलून तो पिकांची लागवड करतो. यंदा कांद्याला भाव आला की, सरसकट सगळे शेतकरी कांद्याच्या लागवडीकडे वळतात. त्यामुळे इतर पिकांकडे दुर्लक्ष होते आणि नेमके कांद्याचे भाव गडगडतात, तर ज्याची उपलब्धता नाही त्याचे भाव वाढतात. शेतीमालाचे भाव कधी वाढतात तर कधी कमी होतात, याचा शेतकरी कधी अभ्यास करीत नाही किंवा पिकांची नोंदणी करीत नाही. त्यामुळे राज्यात वा देशात कोणत्या पिकाची किती उपलब्धता आहे, याचा अंदाज येत नाही.दोन वर्षांपूर्वी तुरीला मिळालेला हमीभाव, यामुळे राज्यभर तुरीच्या लागवडीखालील क्षेत्र वाढले आणि राज्यभर तुरीचा लोचा झाला. त्यानंतर तुरीला वैतागून यंदा शेतकºयांनी उडीद, सोयाबीनची लागवड केली. त्याचीही गत तुरीसारखीच झाली. खरिपाच्या अखेरीस अगदी आॅक्टोबरपर्यंत सुरू असलेल्या पावसाने रब्बीच्या पेरण्या लांबल्या आणि शेतकºयांनी अल्पकाळात येणारा भाजीपाला लावून तेवढीच साय खाण्याचा प्रयत्न केला. असे करणाºया शेतकºयांची संख्या वाढल्याने भाजीपाल्याची सध्या माती झाल्याचे आपण पाहत आहोत. हुरळल्या मेंढ्यासारखी शेतकºयांची गत आहे. केवळ चांगला शेंडा मारण्याच्या नादात शेतकºयांच्या पदरी निराशा येत आहे. यासाठी मोर्चे आणि आंदोलन करणाºयांनी ग्राहक आणि शेतकरी जगला पाहिजे, याचा विचार करून धोरणे ठरवण्यासाठी पुढे आले पाहिजे. शेतकºयांसाठी स्थापन केलेल्या संस्था जगल्या पाहिजेत आणि त्यामध्ये पारदर्शीपणा आला पाहिजे, यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी