शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

शेंड्यावरचे शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:32 IST

मोर्चे व आंदोलन करणा-यांनी ग्राहक आणि शेतकरी जगला पाहिजे, याचा विचार करून धोरण ठरवण्यासाठी पुढे आले पाहिजे. शेतक-यांसाठी स्थापन केलेल्या संस्था जगल्या पाहिजेत आणि त्यामध्ये पारदर्शीपणा आला पाहिजे, यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.

मोर्चे व आंदोलन करणा-यांनी ग्राहक आणि शेतकरी जगला पाहिजे, याचा विचार करून धोरण ठरवण्यासाठी पुढे आले पाहिजे. शेतक-यांसाठी स्थापन केलेल्या संस्था जगल्या पाहिजेत आणि त्यामध्ये पारदर्शीपणा आला पाहिजे, यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.शेतमालाचे भाव पडले की शेतकºयांचा एल्गार आणि भाव वाढले की ग्राहकांचे मोर्चे ही आता राजकीय पक्षाची हत्यारे झाली आहेत आणि ती सोयीनुसार वापरली जात आहेत. यात ना शेतक-यांचे कधी भले झाले ना कधी ग्राहकांना त्याचा फायदा झाला. उसाचा दर वाढवून दिला तेव्हा साखरेचेही दर वाढले. तेव्हा साखर न खाल्ल्याने मरत नाही हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खणखणीत उत्तर अनेकांच्या जिव्हारी लागले असेल. पण व्यवहार बघायला गेले तर चुकीचे काहीच नाही, असे वाटते.आज शेतकºयांच्या दुधाला भाव नाही. भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला जात आहे. अशा वेळी कोणताही राजकीय पक्ष यासाठी मोर्चा काढताना दिसत नाही. कांद्याचे भाव वाढवून द्या म्हणून शेतक-यांच्या मोर्चात सामील होणारेच महागाई कमी करा म्हणून निघणाºया मोर्चात सामील होतात, किंबहुना मोर्चाचे नेतृत्वच करतात. अशा दुतोंडी राजकारणामुळे धड शेतकºयांचे भले होईना, ना ग्राहकांना रास्त भावात माल मिळेना. शेतकºयांच्या नावाने स्थापन झालेल्या बाजार समित्या व सहकारी संस्थांमध्ये शेतकºयांचीच अडवणूक होत आहे. त्यामुळे शेतकरी हा नावालाच शेतकरी असतो. तो एक पीक काढणे वा शेतीच्या फायदा-तोट्याचा फारसा विचार करताना दिसत नाही. शेतकºयांना व्यापारी डोके अजून दिलेलेच नाही. केवळ वरवरचे दिसणारे जग याला भुलून तो पिकांची लागवड करतो. यंदा कांद्याला भाव आला की, सरसकट सगळे शेतकरी कांद्याच्या लागवडीकडे वळतात. त्यामुळे इतर पिकांकडे दुर्लक्ष होते आणि नेमके कांद्याचे भाव गडगडतात, तर ज्याची उपलब्धता नाही त्याचे भाव वाढतात. शेतीमालाचे भाव कधी वाढतात तर कधी कमी होतात, याचा शेतकरी कधी अभ्यास करीत नाही किंवा पिकांची नोंदणी करीत नाही. त्यामुळे राज्यात वा देशात कोणत्या पिकाची किती उपलब्धता आहे, याचा अंदाज येत नाही.दोन वर्षांपूर्वी तुरीला मिळालेला हमीभाव, यामुळे राज्यभर तुरीच्या लागवडीखालील क्षेत्र वाढले आणि राज्यभर तुरीचा लोचा झाला. त्यानंतर तुरीला वैतागून यंदा शेतकºयांनी उडीद, सोयाबीनची लागवड केली. त्याचीही गत तुरीसारखीच झाली. खरिपाच्या अखेरीस अगदी आॅक्टोबरपर्यंत सुरू असलेल्या पावसाने रब्बीच्या पेरण्या लांबल्या आणि शेतकºयांनी अल्पकाळात येणारा भाजीपाला लावून तेवढीच साय खाण्याचा प्रयत्न केला. असे करणाºया शेतकºयांची संख्या वाढल्याने भाजीपाल्याची सध्या माती झाल्याचे आपण पाहत आहोत. हुरळल्या मेंढ्यासारखी शेतकºयांची गत आहे. केवळ चांगला शेंडा मारण्याच्या नादात शेतकºयांच्या पदरी निराशा येत आहे. यासाठी मोर्चे आणि आंदोलन करणाºयांनी ग्राहक आणि शेतकरी जगला पाहिजे, याचा विचार करून धोरणे ठरवण्यासाठी पुढे आले पाहिजे. शेतकºयांसाठी स्थापन केलेल्या संस्था जगल्या पाहिजेत आणि त्यामध्ये पारदर्शीपणा आला पाहिजे, यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी