शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

शेख हसिना यांनी खरंच कमाल केली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 06:50 IST

गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२४ मध्ये बांगलादेशाला अविकसित देशांंच्या श्रेणीतून काढून विकसनशील देशांच्या श्रेणीत घेण्याचे सूतोवाच केले

विजय दर्डा

गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२४ मध्ये बांगलादेशाला अविकसित देशांंच्या श्रेणीतून काढून विकसनशील देशांच्या श्रेणीत घेण्याचे सूतोवाच केले, तेव्हा संपूर्ण जगात शेख हसिना यांची चर्चा होऊ लागली. त्याच वेळी बांगलादेशात संसदीय निवडणूक झाली व शेख हसिना यांचा अवामी लीग पक्ष प्रचंड बहुमताने विजयी झाला. सत्ता शेख हसिना यांच्याकडेच कायम राहिली. त्या २००९ पासून सत्तेवर असून, या महिन्यात त्या बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून चौथ्यांना पदभार स्वीकारतील.

ताज्या निवडणुकीत मोठे गैरप्रकार केल्याचे अनेक आरोपही शेख हसिना यांच्यावर झाले. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी या प्रमुख विरोधी पक्षाने तर निवडणुकीचे संपूर्ण निकाल अमान्य करून नव्याने निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. परंतु शेख हसिना या बांगलादेशच्या लोकप्रिय नेत्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यांचे पिता शेख मुजीबुर्रेहमान यांच्यामुळेच बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र जन्माला आले. पूर्वी तो पूर्व पाकिस्तान होता. नंतर लष्कराने उठाव करून सत्ता काबिज केली व त्यात शेख मुजीबुर्रेहमान, त्यांच्या पत्नी व तीन मुलांची हत्या करण्यात आली. त्या हत्याकांडातून शेख हसिना बचावल्या होत्या. सुरुवातीला अनेक अडचणी येऊनही त्यांनी हार मानली नाही व त्या एक बलाढ्य नेत्या म्हणून उदयाला आल्या. १९८१ पासून शेख त्या अवामी लीगचे नेतृत्व करत आहेत.

कोणी कितीही टीका केली, तरी त्यांनी आपल्या देशाला वेगवान विकासाच्या मार्गावर आणले, हे नाकारता येणार नाही. त्या प्रथम सत्तेवर आल्यापासून बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर वर्षाला सहा टक्के राहिला आहे. त्यांच्या राजवटीत देशाचे दरडोई उत्पन्न तिपटीने वाढले आहे. सध्या दरडोई वार्षिक उत्पन्न १.२१ लाख रुपये आहे. अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत बांगलादेश आता जवळजवळ स्वयंपूर्ण झाला आहे. गरिबी झपाट्याने कमी होत आहे. तेथील कापड उद्योगाचा विकासदर सुमारे १५ टक्के आहे. तयार कपड्यांच्या उत्पादनात बांगलादेशचा जगात दुसरा क्रमांक लागतो. चीन पहिल्या स्थानावर आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेबाबतही बांगलादेशाने जोरदार झेप घेतली आहे. दक्षिण आशियात बँकेचे डिजिटल व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाण सरासरी २८ टक्के आहे, पण बांगलादेशात मात्र हे प्रमाण ३४ टक्क्यांहून अधिक आहे.

एक विकासाभिमुख नेता म्हणूनच नव्हे, तर धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीतही शेख हसिना यांनी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. एक काळ असा होता की, बांगलादेशात धार्मिक कट्टरपंथी जोरात होते व ‘इस्लामिक स्टेट’नेही बस्तान बसविण्यास तेथे सुरुवात केली होती. २०१६ मध्ये तेथील होली आर्टिझन बेकरीवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर, शेख हसिना यांनी कट्टरपंथींना वठणीवर आणण्याचा विडा उचलला. तेव्हापासून शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे व आणखी शेकडो तुरुंगात आहेत. शेख हसिना यांच्या दृढनिश्चयी धोरणांमुळेच हे शक्य झाले, हे निर्विवाद. आज बांगलादेशात सर्वच धर्माच्या लोकांना सुरक्षित वाटते. याबद्दल जगभर बांगलादेशाचे कौतुक होत आहे. दहशतवादविरोधी लढ्यात शेख हसिना यांनी संपूर्ण जगाच्या हातात हात मिळविला आहे.मी बांगलादेशातील अनेक संपादकांशी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर चर्चा करत असतो. त्यांनी सांगितले की, खालिदा झिया यांच्यासह अनेक पंतप्रधानांवरही भ्रष्टाचाराचे आरोप होत आले. त्या सर्वांनी देशातील पैसा बाहेर नेला आणि विकास मात्र केला नाही. शेख हसिना यांच्याकडून देशाला मोठ्या अपेक्षा आहेत. मी त्यांना असेही विचारले की, बांगलादेश हे एक मुस्लीम राष्ट्र आहे, तरी तेथे महिला राज्य करतात. याचे कारण काय? यावर संपादकांचे उत्तर होते की, प्रश्न पुरुष किंवा महिलेचा नाही. कोणाकडे किती क्षमता आहे याचा आहे आणि शेख हसिना यांच्याकडे पंतप्रधान होण्यासाठी पुरेपूर क्षमता आहे.

भारताशी शेख हसिना यांचे जिव्हाळ्याचे भावनिक नाते आहे. बांगलादेश मुक्ती संग्रामात त्यांच्या वडिलांपाठी भारत खंबीरपणे उभा राहिला होता, ते ऋण शेख हसिना विसरलेल्या नाहीत. त्या भारत समर्थक मानल्या जातात. परंतु गेल्या काही वर्षांत चीन बांगलादेशात घट्ट पाय रोवू पाहात आहे, ही भारताच्या दृष्टीने नक्कीच चिंतेची बाब आहे. गेल्या वर्षी ढाका शेअर बाजाराचे २५ टक्के भागभांडवल खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले, तेव्हा भारताने खूप प्रयत्न करूनही चढी बोली लावून चीनने ते भागभांडवल विकत घेतले. मला असे वाटते की, भारताने त्या वेळी थोडे अधिक पैसे खर्च करून हा सौदा पदरी पाडून घ्यायला हवा होता. कारण बांगलादेश हा भारताचा सख्खा शेजारी आहे व तेथे आपण घट्ट पाय रोवायलाच हवेत.आंतरराष्ट्रीय राजकारण केवळ भावनांवर चालत नाही. बांगलादेशला आपण स्वातंत्र्य मिळवून दिले, म्हणून तो कायम भारतालाच चिकटून राहील, अशी अपेक्षा ठेवणेही चुकीचे आहे. हा शेजारी देश आपल्यापासून दूर जाऊ न देणे भारताच्या दृष्टीने गरजेचे आहे. त्यासाठी बांगलादेशाला काय हवे, त्याकडे आपण लक्ष द्यायला हवे. नेटाने प्रयत्न केले, तर हे काम कठीण नक्कीच नाही.(लेखक लोकमत समुह आणि एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन आहेत)

टॅग्स :BangladeshबांगलादेशElectionनिवडणूक