शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्री - कोहली यांची आता खरी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 06:30 IST

श्रीलंकेचा सोपा पेपर यशस्वीपणे सोडवल्यानंतर आता कोहली - शास्त्री यांची खडतर परीक्षा आफ्रिका, इंग्लंड व आॅस्टेÑलिया या ‘केंद्रां’वर होईल.

- रोहित नाईकश्रीलंकेचा सोपा पेपर यशस्वीपणे सोडवल्यानंतर आता कोहली - शास्त्री यांची खडतर परीक्षा आफ्रिका, इंग्लंड व आॅस्टेÑलिया या ‘केंद्रां’वर होईल.टीम इंडियाने अपेक्षित ‘विराट’ कामगिरी करताना श्रीलंकेला त्यांच्याच भूमीमध्ये लोळवले. विशेष म्हणजे ३ कसोटी सामन्यांची मालिका ३-० अशी निर्विवादपणे जिंकून भारतीय संघाने परदेशात पहिल्यांदाच ‘क्लीनस्वीप’ नोंदवला. तरी ही मालिका भारतीय संघापेक्षा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी मोठी कसोटी होती. कारण, या मालिकेपूर्वीच माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी कोहलीशी संबंध बिघडल्याच्या कारणावरून राजीनामा दिल्यानंतर शास्त्री यांची झालेली अपेक्षित निवड. त्यानंतर शास्त्री यांनी आपल्या पसंतीचा सहयोगी स्टाफ निवडण्यावर दिलेला भर, याकडे पाहता कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष होते. कारण, दोघांनीही आपआपल्या पसंतीच्या व्यक्तीची निवड करण्यावर भर दिला होता. परंतु, या मालिकेतून या दोघांनीही स्वत:ला सिद्ध करतानाच आपला निर्णय किती अचूक होता हेदेखील दाखवून दिले.कोहली आणि शास्त्री यांच्यासह संघातील खेळाडूंनी मिळालेली संधी साध्य करताना आपली उपयुक्तता सिद्ध केली. यामध्ये सर्वात आघाडीवर आहे तो हार्दिक पांड्या. आयपीएलमध्ये क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतल्यानंतर या युवा खेळाडूने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये अचंबित करणारी फलंदाजी करून भारतीयांची मने जिंकली. मात्र, तरीही कसोटी मालिकेसाठी झालेली त्याची निवड अनेकांना खुपली. हार्दिकने मात्र आपल्या पहिल्याच मालिकेत शतक झळकावतानाच शानदार अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करून सर्वांना शांत केले. त्याच्या जोरावर अखेरचा कसोटी सामना भारताने सहजपणे जिंकला.त्याचबरोबर, गेल्या काही मालिकांपासून फॉर्म गमावलेल्या शिखर धवनने लंकेविरुद्ध दोन शतके झळकावून पुन्हा एका ‘गब्बर’ प्रदर्शन केले. मुरली विजयसारख्या कसलेल्या सलामीवीराची उणीव भरून काढतानाच त्याने आता पुढील मालिकेसाठी विजय की धवन असा पेच निवडकर्त्यांपुढे आणि कर्णधार - प्रशिक्षकांपुढे निर्माण केला आहे. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, कोहली, लोकेश राहुल यांनीही फलंदाजीमध्ये चांगले योगदान दिले. गोलंदाजीमध्ये नेहमीप्रमाणे रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा या स्टार जोडीने लंकेची दाणादाण उडवली. विशेष म्हणजे तिसºया कसोटीत बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागलेल्या जडेजाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या युवा कुलदीप यादवने ६ बळी घेत छाप पाडली. यावरून भारताची बेंच स्टेÑंथही लक्षात येते. तसेच, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्या जोडीला हार्दिक पांड्या या त्रिकूटाने अचूक मारा करून यजमानांना बेजार केले. एकूणच ही मालिका श्रीलंकेसाठी पूर्णपणे निराशाजनक ठरली. माहेला जयवर्धने आणि कुमार संगाकारा यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर लंकेचा संघ खूपच कमजोर भासू लागला आहे. भारताविरुद्धच्या मालिकेआधी घरच्या मैदानावर तुलनेत दुबळ्या असलेल्या झिम्बाब्वेविरुद्ध लंकेला झुंजावे लागल्याने त्यांचा टीम इंडियाविरुद्ध पराभव निश्चित मानला जात होता. परंतु, इतका दारुण पराभव नक्कीच अपेक्षित नव्हता.तरी कर्णधार म्हणून विराट कोहलीची खरी परीक्षा अजून सुरू व्हायची बाकी आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका भारतापुढे नवे आव्हान असून लंकेतील यश कर्णधार म्हणून कोहलीला नक्कीच आत्मविश्वास वाढवून देईल. तसेच, त्यानंतर इंग्लंड दौराही असल्याने मागील इंग्लंड दौºयात झालेली वाताहत या वेळी होणार नाही यासाठी कोहलीला खूप मेहनत घ्यावी लागेल. विशेष म्हणजे लंकेतील मर्यादित षटकांच्या मालिकेत विश्रांती देण्यात आलेला आश्विन इंग्लंड दौºयाच्या तयारीसाठी आतापासूनच लागला असून, यादरम्यान तो कौंटी क्रिकेट खेळायला इंग्लंडला रवाना होणार आहे. तसेच इंग्लंडनंतर खडतर असा आॅस्टेÑलिया दौराही परीक्षा पाहणार आहे. त्यामुळे श्रीलंकेचा सोपा पेपर यशस्वीपणे सोडविल्यानंतर आता कोहली - शास्त्री यांची खडतर परीक्षा आफ्रिका, इंग्लंड व आॅस्टेÑलिया या ‘केंद्रां’वर होईल.