शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

शशी थरुरांचे चुकले काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 01:06 IST

हिंदू पाकिस्तान हा शब्द प्रथम भाजपच्या अरुण शौरींनी व नंतर त्याच पक्षाच्या राम जेठमलानी या दोन माजी मंत्र्यांनी वापरला. आता तो काँग्रेसच्या शशी थरुर यांनी वापरला एवढेच.

हिंदू पाकिस्तान हा शब्द प्रथम भाजपच्या अरुण शौरींनी व नंतर त्याच पक्षाच्या राम जेठमलानी या दोन माजी मंत्र्यांनी वापरला. आता तो काँग्रेसच्या शशी थरुर यांनी वापरला एवढेच. पाकिस्तान हा स्वत:ला मुस्लीम राष्ट्र म्हणविणारा देश आहे. संघ आणि त्याच्या परिवारातले लोक जेव्हा हिंदू राष्ट्र म्हणतात तेव्हा त्यांच्याही मनात भारताला हे ‘हिंदूंचे राष्ट्र’ बनविण्याचाच विचार असतो.(शशी थरुर यांनी या दोन्ही विचारातील धर्मराष्ट्राचा मुद्दा अधोरेखित केला आहे एवढेच). भारतातील कोणत्याही अल्पसंख्य वर्गाला सुखासमाधानाने जगू न देण्याचा विडा उचललेल्या संघ परिवाराने त्याला एका धर्माचे राष्टÑ बनविण्याचा विडा उचलला आहे. तो इरादा ‘पाकिस्तान हे मुस्लीम राष्टÑ’ बनविण्याच्या मुस्लीम लीगच्या जुन्या इराद्याहून फक्त धर्माच्या नावाबाबत वेगळा आहे. त्यासाठी संसदेत थरुर आणि राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने एवढा गदारोळ उठविण्याचे कारण नाही. प्रत्यक्षात भारताला ‘हिंदू राष्टÑ’ म्हणायला पं. नेहरूंएवढेच सरदार पटेलही राजी नव्हते. बी.एम. बिर्ला या कोलकत्याच्या उद्योगपतीला लिहिलेल्या पत्रात पटेलांनी ‘भारताला हिंदू राष्टÑ म्हटले तर काश्मीरचे काय, पंजाबचे काय, अतिपूर्वेकडील राज्यांचे आणि केरळचे काय’ असा प्रश्न विचारला होता. साऱ्या वर्गांना सोबत घेऊन राष्टÑ पुढे न्यायचे तर त्यात सर्वधर्मसमभाव राखणेच आवश्यक आहे असे ते त्या पत्रात म्हणाले आहेत. आजच्या जगातली ९३ राष्टÑे स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारी आहेत. त्यात युरोप व आफ्रिकेसह, आशियातील बहुसंख्य देशांचा समावेश आहे. त्यातील अनेक देशात ख्रिश्चनांची बहुसंख्या आहे. तरीही ती राष्ट्रे स्वत:ला ख्रिस्ती राष्टÑ म्हणवत नाहीत. उलट कोणताही कायदा ख्रिस्ती धर्माच्या प्रभावापासून मुक्त राहिला पाहिजे याची ते डोळ्यात तेल घालून खबरदारी घेतात. इंग्लंडचे स्वत:चे चर्च आहे आणि इंग्लंडची राणी त्याची प्रमुख आहे. तरीही इंग्लंड हे सेक्युलर राष्टÑ आहे. जगातील कोणताही देश आता एकधर्मी, एकभाषी वा एका संस्कृतीचा राहिला नाही. नाही म्हणायला पाकिस्तान, अफगाणिस्तान, सिरिया व सौदी अरेबिया ही राष्ट्रे स्वत:ला मुस्लीम राष्टÑे म्हणवितात. त्यात ज्यू धर्माच्या इस्रायलचाही समावेश आहे. पण अशी राष्टÑे बोटावर मोजता यावी एवढी थोडी आहेत. भारतात अल्पसंख्याकांची संख्या २० टक्क्यांहून अधिक आहे. प्रत्यक्षात ती २६ कोटींहून मोठी आहे. ही संख्या अमेरिका, रशिया व जपानहूनही मोठी आहे. तिचे वेगळे अस्तित्व नाकारून तिला ‘हिंदू राष्टÑ’ म्हणायला लावणे हाच मुळात एक धार्मिक अन्याय आहे. ‘तुम्ही जेव्हा भारताला हिंदू राष्टÑ बनविण्याची भाषा बोलता तेव्हा तुम्हाला भारताला हिंदू पाकिस्तान बनवायचे असते’ ही शशी थरुर यांची भाषा यासंदर्भात समजून घेतली पाहिजे. एकधर्मी देशांची कल्पना आता इतिहासजमा झाली आहे. तिला वर्तमानात स्थान नाही. मात्र वर्तमान मागे नेऊन त्यावर इतिहास लादायचा ज्यांचा प्रतिगामी प्रयत्न आहे त्यांना या बदलाशी काही देणेघेणे नाही. ते अजूनही वेदांच्या, उपनिषदांच्या, मनुस्मृतीच्या आणि रामायण व महाभारताच्या काळात वावरतात. त्याच काळाचे गोडवे गातात. त्यांना देशांच्या स्वातंत्र्यलढ्याशी कर्तव्य नसते व आताच्या संवैधानिक भारताविषयीही त्यांना आस्था नसते. अशी माणसे शशी थरुरांवर रागावणारच. ‘मोदींना मत न देणाºयांनी पाकिस्तानात चालते व्हावे’, ‘गाईचे रक्षक नाहीत ते देशद्रोही आहेत’ किंवा ‘या देशात राहायचे असेल तर आम्ही सांगू तीच भाषा तुम्ही बोलली पाहिजे’ असे म्हणणारे तथाकथित देशभक्त देशात आता फार आहेत. त्यांच्या एकारलेपणाला खंबीर उत्तर देण्याचे व तुम्हाला या देशाचा हिंदू पाकिस्तान बनवायचा आहे काय असा प्रश्न शशी थरुरांनी विचारला असेल तर त्यांचे साºया जाणकारांनी अभिनंदनच केले पाहिजे. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि त्याचे तसे असणे घटनेला मान्य आहे. मात्र धर्मनिरपेक्षतेचे मूल्यच ज्यांना मान्य नाही ते अजूनही हिंदूराष्ट्राची भाषा बोलतात व तसे राष्ट्र अस्तित्वात आणण्याची इच्छा बाळगतात. तात्पर्य, हा दोन मूल्यांमधील संघर्ष आहे व त्याकडे कमालीच्या डोळसपणे पाहणे गरजेचे आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणHinduहिंदूPakistanपाकिस्तान