शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

बांधाच्या पलीकडे पाहणारे नेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 04:14 IST

Sharad Pawar Birthday : शरद पवार यांनी वीसेक वर्षांपूर्वी सांगितले की, मराठवाड्याचे वाळवंट होते आहे. गेल्या दशकातल्या लागोपाठच्या दुष्काळांनी ते सिद्ध झाले. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलणारे, धोक्याचा इशारा देणारे ते पहिले राजकारणी.

- कृषिरत्न विजय अण्णा बोराडे(विश्वस्त, मराठवाडा शेती साहाय्य मंडळ, औरंगाबाद) शरद पवार यांनी वीसेक वर्षांपूर्वी सांगितले की, मराठवाड्याचे वाळवंट होते आहे. गेल्या दशकातल्या लागोपाठच्या दुष्काळांनी ते सिद्ध झाले. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलणारे, धोक्याचा इशारा देणारे ते पहिले राजकारणी. शेतीचा पतपुरवठा वाढला, पेरणीपासून भांडवल मिळाले, तरच शेतकऱ्याला खरा आधार मिळेल हे त्यांनीच सांगितले. मंत्री असताना त्यांनी फलोत्पादन अभियानाला नवी ऊर्जा दिली. महाराष्ट्राला पहिल्या वर्षी १६० कोटी दिल्यानंतर हे खर्च कराल तर दुप्पट पैसे देईन, असे जाहीरपणे सांगितले, पण आपली यंत्रणा ते करू शकली नाही.डॉ.मनमोहन सिंग सरकारची शेतकऱ्यांना ७१ हजार कोटींची कर्जमाफी, हे पवार यांचे कृषिमंत्री म्हणून चर्चेत राहिलेले सर्वांत मोठे योगदान. खरे तर त्यापेक्षा अधिक मोठे योगदान, आयातीसाठी ओळखला जाणारा भारत शेतमालाचा सर्वांत मोठा निर्यातदार बनला हे आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यावेळी शेतकऱ्यांना लाभार्थी बनविण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. शेती कर्जाविषयीचा पुलोद सरकारच्या काळात त्यांनी बंडिंगच्या कर्जाचे ९ कोटी रुपयांचे व्याज माफ करून सुरुवात केली होती. मात्र वारंवार कर्जमाफी हा शेती व शेतकरी संकटातून बाहेर काढण्याचा कायमस्वरूपी उपाय नाही, हे त्यांनी वारंवार बोलून दाखविले.शेतीवरचा बोजा कमी करायला पाहिजे. दोन किंवा तीन भाऊ असतील, तर एकानेच शेती सांभाळायची, इतरांनी दुसरा काहीतरी उद्योग करून शेतीवरचा आर्थिक ताण कमी होईल, हे पवार  सांगत आले. पवारच बघा, कसं शेतीच्या विरोधात बोलतात, अशी टीका त्यांच्यावर झाली.१९९०-९१ मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी रोहयोखाली १०० टक्के अनुदानाची फलोत्पादन योजना आणली, कोरडवाहू फळबागांचा नवा अध्याय लिहिला गेला. तेव्हाही त्यांच्यावर टीका झाली. अलीकडे त्यांनी शेतीची सगळी कामे रोहयोमधून करायला पाहिजेत, असे सांगितले. तेव्हाही टीका झाली, पण टीकाकारांनी मजुरांच्या टंचाईवर उपाय मात्र सांगितले नाहीत. कृषिपंपाची मीटरवर वीजबिलाची पद्धत त्यांनी बंद केल्याला ४० वर्षे झाली. अश्वशक्तीच्या प्रमाणात वीजबिल देण्याचा त्यांचा प्रयोग अनोखा होता. त्याचप्रमाणे, अनुदानावर शेततळ्यांच्या योजनेमुळे कोरडवाहू शेतीला जणू जीवदान मिळाले. महत्त्वाचे म्हणजे, शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांना पाणी लीटरमध्ये मोजण्याची सवय लागली. थेंबाथेंबाचा हिशेब मांडला जाऊ लागला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण