शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

बांधाच्या पलीकडे पाहणारे नेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 04:14 IST

Sharad Pawar Birthday : शरद पवार यांनी वीसेक वर्षांपूर्वी सांगितले की, मराठवाड्याचे वाळवंट होते आहे. गेल्या दशकातल्या लागोपाठच्या दुष्काळांनी ते सिद्ध झाले. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलणारे, धोक्याचा इशारा देणारे ते पहिले राजकारणी.

- कृषिरत्न विजय अण्णा बोराडे(विश्वस्त, मराठवाडा शेती साहाय्य मंडळ, औरंगाबाद) शरद पवार यांनी वीसेक वर्षांपूर्वी सांगितले की, मराठवाड्याचे वाळवंट होते आहे. गेल्या दशकातल्या लागोपाठच्या दुष्काळांनी ते सिद्ध झाले. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलणारे, धोक्याचा इशारा देणारे ते पहिले राजकारणी. शेतीचा पतपुरवठा वाढला, पेरणीपासून भांडवल मिळाले, तरच शेतकऱ्याला खरा आधार मिळेल हे त्यांनीच सांगितले. मंत्री असताना त्यांनी फलोत्पादन अभियानाला नवी ऊर्जा दिली. महाराष्ट्राला पहिल्या वर्षी १६० कोटी दिल्यानंतर हे खर्च कराल तर दुप्पट पैसे देईन, असे जाहीरपणे सांगितले, पण आपली यंत्रणा ते करू शकली नाही.डॉ.मनमोहन सिंग सरकारची शेतकऱ्यांना ७१ हजार कोटींची कर्जमाफी, हे पवार यांचे कृषिमंत्री म्हणून चर्चेत राहिलेले सर्वांत मोठे योगदान. खरे तर त्यापेक्षा अधिक मोठे योगदान, आयातीसाठी ओळखला जाणारा भारत शेतमालाचा सर्वांत मोठा निर्यातदार बनला हे आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यावेळी शेतकऱ्यांना लाभार्थी बनविण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. शेती कर्जाविषयीचा पुलोद सरकारच्या काळात त्यांनी बंडिंगच्या कर्जाचे ९ कोटी रुपयांचे व्याज माफ करून सुरुवात केली होती. मात्र वारंवार कर्जमाफी हा शेती व शेतकरी संकटातून बाहेर काढण्याचा कायमस्वरूपी उपाय नाही, हे त्यांनी वारंवार बोलून दाखविले.शेतीवरचा बोजा कमी करायला पाहिजे. दोन किंवा तीन भाऊ असतील, तर एकानेच शेती सांभाळायची, इतरांनी दुसरा काहीतरी उद्योग करून शेतीवरचा आर्थिक ताण कमी होईल, हे पवार  सांगत आले. पवारच बघा, कसं शेतीच्या विरोधात बोलतात, अशी टीका त्यांच्यावर झाली.१९९०-९१ मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी रोहयोखाली १०० टक्के अनुदानाची फलोत्पादन योजना आणली, कोरडवाहू फळबागांचा नवा अध्याय लिहिला गेला. तेव्हाही त्यांच्यावर टीका झाली. अलीकडे त्यांनी शेतीची सगळी कामे रोहयोमधून करायला पाहिजेत, असे सांगितले. तेव्हाही टीका झाली, पण टीकाकारांनी मजुरांच्या टंचाईवर उपाय मात्र सांगितले नाहीत. कृषिपंपाची मीटरवर वीजबिलाची पद्धत त्यांनी बंद केल्याला ४० वर्षे झाली. अश्वशक्तीच्या प्रमाणात वीजबिल देण्याचा त्यांचा प्रयोग अनोखा होता. त्याचप्रमाणे, अनुदानावर शेततळ्यांच्या योजनेमुळे कोरडवाहू शेतीला जणू जीवदान मिळाले. महत्त्वाचे म्हणजे, शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांना पाणी लीटरमध्ये मोजण्याची सवय लागली. थेंबाथेंबाचा हिशेब मांडला जाऊ लागला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण