शहरं
Join us  
Trending Stories
1
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
2
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
3
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
4
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
5
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
6
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
7
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
8
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
9
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
10
Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
11
जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड
12
निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
13
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
14
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
15
अरे बापरे! तुम्हीही प्लास्टिकचा कोबी खाताय? धक्कादायक Video पाहून व्हाल हैराण
16
दुर्गापूरमध्ये मित्रानेच एमबीबीएस विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केले? पोलिसांनी केली अटक
17
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
18
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
19
बॉलिवूडवर शोककळा! पंकज धीर यांच्यानंतर दिग्गज अभिनेत्री मधुमती यांचं निधन, ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?

भक्ताचे शंकानिरसन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 05:40 IST

व्याकूळ परमभक्ताच्या मनात काही शंका निर्माण झाल्या, तर भगवंत स्वत:च शंकांचे निराकरण करतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा जो व्याकूळ परमभक्त असतो, त्याच्या हातून चूक केवळ अज्ञान दाटून आल्यामुळे घडते...

- वामनराव देशपांडेव्याकूळ परमभक्ताच्या मनात काही शंका निर्माण झाल्या, तर भगवंत स्वत:च शंकांचे निराकरण करतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा जो व्याकूळ परमभक्त असतो, त्याच्या हातून चूक केवळ अज्ञान दाटून आल्यामुळे घडते, ती अशी की तो जेवढे जाणतो, त्याच्या मर्यादित बुद्धीला जेवढे झेपेल तेवढेच सत्य आहे अशी त्याची समजूत होते. याचा अभिमान त्या साधक भक्ताला होतो. तो त्या भक्ताच्या पतनाचा क्षण ठरतो. म्हणून भगवंत स्वत: आपल्या भक्ताचे अज्ञान दूर करतो. भगवंत अर्जुनाला या अज्ञानमयी क्षणांच्या समाप्तीचा मार्ग सांगतात.तस्मादज्ञानसम्भूतं हत्स्थं ज्ञानासिनात्मन :।छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत।।पार्था, केवळ अज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या आपल्या अंत:करणात घट्ट रुतून बसलेल्या संशयाला, हातात आपण ज्ञानरूपी धारदार तलवार घेऊन त्या अज्ञानाने माखलेल्या संशयाला नष्ट केले पाहिजे, तरच चित्तात समत्व नांदायला सुरुवात होईल. हाच सर्वोत्तम योग अहे. एकदा का चित्त स्थिर झाले, की तू युद्ध करायला सिद्ध होशील. पार्था, कर्मयोगी पुरुषच संशयात्मा नष्ट करू शकतो...या दृश्य सुंदर विश्वात आपल्याला ही मानवी योनी प्राप्त झालेली आहे. हीच भगवंतांची फार मोठी कृपा झालेली आहे. याची कृतज्ञ जाणीव होणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रथम शारीर भाव विसर्जित करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण जेव्हा शरीराशी तादात्म्य पावतो, तेव्हाच शरीरांतर्गत षड्रिपू सतत बंड करून उठतात. त्यांचा आपल्या नित्य जगण्यावर तीव्र परिणाम होतो. या षड्रिपूंना नष्ट करण्यासाठी भगवंतांनी एकूण २० साधने सांगितली आहेत. ती सर्वांगात भिनणे निश्चितच आवश्यक आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक