शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
4
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
5
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
6
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
7
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
8
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
9
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
10
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
11
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
12
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
13
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
15
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
16
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
17
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
18
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय

शनैश्चरशरण देवेन्द्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2016 03:53 IST

शनि शिंगणापुरातील शनीच्या प्रतिकात्मक शीळेच्या चौथऱ्यावर महिलांना असलेली बंदी उठवावी म्हणून भूमाता ब्रिगेड नावाच्या संस्थेच्या महिलांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले खरे, पण मुख्यमंत्र्यांनी

शनि शिंगणापुरातील शनीच्या प्रतिकात्मक शीळेच्या चौथऱ्यावर महिलांना असलेली बंदी उठवावी म्हणून भूमाता ब्रिगेड नावाच्या संस्थेच्या महिलांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले खरे, पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट पंतप्रधानांकडे जाण्याचा आणि त्यांच्याच करवी एखादा कायदा करुन देशातील सर्वच देवालयांमधील महिलांवर असलेली बंदी उठवून घेण्याचा सल्ला दिल्याने मुख्यमंत्रीदेखील शनैश्चरशरण असावेत असा निष्कर्ष काढण्यास जागा झाली आहे. राज्याचा कारभारी म्हणून त्यांनी सपत्नीक चौथऱ्यावर जावे असे आवाहन भूमातांनी केले होते पण तेही मुख्यमंत्र्यांनी काही मनावर घेतले नाही. आता तेथील देवस्थानच्या विश्वस्तांनी एक वेगळाच तोडगा मांडला आहे. महिलांना तर परवानगी देणारच नाही पण नगद अकरा हजार एकशे रुपये देणाऱ्या पुरुषांना चौथऱ्यावर जाण्यासाठी दिली जाणारी परवानगीदेखील रद्द करण्याचा विचार करु असे या विश्वस्तांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आंदोलन करणाऱ्या महिला आणि त्यांचे पाठीराखे तद्दन नास्तिक असल्याने त्यांच्याशी चर्चा काय करायची असा प्रतिप्रश्न उपस्थित करुन चर्चेचा प्रस्तावदेखील त्यांनी नाकारला आहे. एकूणच आता या प्रकरणातही राजकारणाचा प्रवेश झाला असल्याचे हे निदर्शक आहे. या राजकारणाचाच आणखी एक पैलू म्हणजे आखाडा परिषदेने यात घेतलेली उडी. महिलांना देशातील कोणत्याही देवालयात बंदी असता कामा नये कारण स्त्री आणि पुरुष यात भेद करता येत नाही असे या परिषदेच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. अलीकडेच पार पडलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभ मेळ्यात काही महिला साध्वींनी त्यांच्या स्वतंत्र आखाड्यास अनुमती, आखाड्यास स्वतंत्र जागा आणि शाही स्नानाचा हक्क मिळावा म्हणून आग्रह धरला असता तो याच आखाडा परिषदेने नाकारला होता. इतकेच नव्हे तर साध्वींच्या आखाड्याच्या प्रमुख महिलेने आखाडा परिषदेच्या अध्यक्षांवर गंभीर आरोपदेखील केला होता हे लक्षणीय!