शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

शाब्बास भावा यमके!

By राजा माने | Updated: July 30, 2018 03:08 IST

नमस्कारमंडळी, इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेची तुमची ओळख आहेच! पण यमकेबद्दलची खास ओळख मात्र काही जणांना नसेल. तर इंद्रदरबाराने मराठी भूमीतील बातम्यांसाठी स्टार रिपोर्टर नेमण्याची जबाबदारी नारदमुनींवर सोपविली होती.

नमस्कारमंडळी, इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेची तुमची ओळख आहेच! पण यमकेबद्दलची खास ओळख मात्र काही जणांना नसेल. तर इंद्रदरबाराने मराठी भूमीतील बातम्यांसाठी स्टार रिपोर्टर नेमण्याची जबाबदारी नारदमुनींवर सोपविली होती. त्यावेळी हा यमके त्यांना सापडला! यमके हा आमच्या यमगरवाडीचा. त्याचं खरं नाव मन कवडे पण त्याचे मित्र त्याला ‘एमके’ म्हणायचे. पुढे ‘एमके’ या नावाचे ‘यमके’ असे बारसे कधी झाले हे आता कुणालाच आठवत नाही... यमके हा राजकुमार हिरानी यांच्या ‘पीके’चा डुप्लिकेट.समोरच्या व्यक्तीचा हात हातात घेतला की, त्या व्यक्तीची भूतकाळ व भविष्यातील ‘मन की बात’ जाणण्याची दिव्यशक्ती जशी ‘पीके’कडे होती तशीच दिव्यशक्ती यमकेलाही लाभली होती. नेमक्या त्याच कारणाने नारदमुनींनी त्याची इंद्रलोकांचा ‘स्टार रिपोर्टर’ म्हणून नेमणूक केली. तेव्हापासून नारद यमकेचे महागुरू झाले... असा हा यमके आपला रिपोर्ट तयार करायच्या नादात असतानाच त्याला चक्क पीकेचाच फोन आला... रिंगटोन वाजू लागली... बाबा कहता है अब बस्स... अब बस्स...! ( यमकेने फोन घेतला बोलू लागला)यमके : नमस्ते भाई... कैसे याद किया...पीके : शाब्बास भावा यमके!यमके : अरे भाई, वो शाब्बास राहुल है यमके नही! और तुमकू सावज-बिवज की माहिती चाहिये तो मेरे पास नही.पीके : शाब्बास तुझे ही बोला, क्योंकि तूने साप छोडनेवाला रिपोर्ट जो दिया था...यमके : भाई, अब मराठीमेच बोलता... आषाढी वारी हा मराठीभूमीचा श्रद्धेचा सोहळा असतो. तिथे वाईट काम करणाऱ्याला थाराच नसतो...पीके : मुझे मालूम है, लेकिन मैने शाब्बासकी दुसरे कारण से दी है...यमके : हो, बहुतेक महागुरूंनी मराठा आरक्षणासंदर्भात ज्या कंड्या पिकविण्याचा प्रयत्न केला असता तो मी होऊ दिला नाही. म्हणूनच ना...( यमकेने नारदमुनींचे नाव उच्चारताच इच्छा नसताना एखाद्याने फेसबुकवर आपल्याला टॅग करावे अगदी तस्सेच तेथे महागुरू नारद प्रकटले...)नारायण... नारायण!नारद : काय यमके-पीके? कोण आणि कसल्या कंड्या पिकवतो आहे? (महागुरूच्या प्रश्नाने यमके चपापला.. )यमके : प..प्रणाम महागुरू... काही नाही. पीके हिराणींच्या ‘संजू’च्या यशाच्या व हिंदीतील सैराट ‘धडक’ ची भट्टी जमली नसल्याच्या कंड्या मी पिकवत होतो...नारद : असत्य बोलतोस..सरकारला जागे करायचे म्हणजे नक्की काय? प्रत्येक गावात तुमचे दोन गट. एका गटाने काही तरी केले म्हणून दुसरा गट काही तरी करणारच! राज्य पातळीवरील नेत्यांचेही तसेच..अनेक नेते आणि अनेक गट. कुणी गनिमी कावा,कुणी आसूडाची तर कुणी गांधीगिरीची भाषा करतोय. मला कंड्या पिकवतो म्हणता...यमके : गुरुवर्य सगळे नेते त्यांचाच अजेंडा पुढे सरकवताहेत. उद्धवांना अचानक राम मंदिराची ओढ लागलीय. जिनिअस राज आपल्याच ढंगात आहेत. पवारसाहेब पण कडेकडेनेच पोहतायत.नारद : म्हणूनच नरेंद्रभाऊंच्या साक्षीने निघालेला विशेष अधिवेशनाचा मार्ग बरा...

(तिरकस)

टॅग्स :Politicsराजकारण