शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

तब्बल सात शेतक-यांनी पत्करला आत्महत्येचा मार्ग, बळीराजासाठी ठरली काळी दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:02 IST

दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा उत्सव! यावर्षी मात्र या उत्सवाच्या धामधुमीतच, विदर्भात एक-दोन नव्हे, तर तब्बल सात शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.

दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा उत्सव! यावर्षी मात्र या उत्सवाच्या धामधुमीतच, विदर्भात एक-दोन नव्हे, तर तब्बल सात शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. अस्मानी व सुलतानी संकटांमुळे कुटुंबीयांना दिवाळीसारखा सणही साजरा करता येत नसल्याच्या वैफल्यापोटी त्यांनी शेवटी मृत्यू जवळ केला. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील वरुड बिहाडे गावातील दोन, यवतमाळ जिल्ह्यातील वाठोडा गावातील दोन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील तीन शेतक-यांचा समावेश आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये घालण्यात आलेला घोळ आणि त्यामुळे शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यात झालेला विलंब, या सात शेतकºयांच्या मृत्यूसाठी नक्कीच कुठे तरी कारणीभूत ठरला आहे. कधी काळी अवघ्या देशासाठी आदर्श ठरलेल्या महाराष्ट्रास सुमारे दोन दशकांपासून शेतकरी आत्महत्यांचा फास लागला आहे. अवर्षण, अतिवृष्टी, नापिकी, कर्जाचा बोजा, कृषिमालास योग्य दर न मिळणे, गाठीशी पैसा नसल्याने औषधोपचार न घेता येणे, आदी कारणांमुळे वैफल्यग्रस्त होऊन आजवर हजारो शेतकºयांनी स्वत:चे जीवन संपविले आहे. त्यांची संख्या एव्हाना दोन लाखांच्या घरात पोहोचली आहे. या काळात राज्याने दोन्ही प्रमुख राजकीय विचारधारांची सरकारे अनुभवली. विरोधात असताना शेतकरी हिताच्या गप्पा मारणाºयांना सत्तेची ऊब मिळाली, की त्यांना शेतकºयांचा विसर पडतो आणि सत्तेतून पायउतार झालेल्यांना शेतकरी प्रेमाचे उमाळे येतात! शेतकºयांच्या स्थितीत मात्र काहीही फरक पडत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सोमवारी अमरावती येथे कृषी मालास दीडपट भाव देण्याची मागणी केली. तसे झाल्यास कुणीही कर्जमाफी मागणार नाही, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेमके हेच आश्वासन दिले होते. दुर्दैवाने ना पवारांनी त्यांच्या कारकिर्दीत दीडपट भावाची मागणी पूर्ण केली, ना मोदींनी सत्तेत आल्यावर आश्वासनाची पूर्तता केली! कृषी मालास योग्य भाव मिळाला, तर शेतकरी ना आत्महत्या करेल, ना कर्जमाफी मागेल! हे तर शाळकरी पोरांनाही कळते. त्यासाठी मोदी व पवारांसारख्या धुरंधरांची गरजच काय? त्यांच्याकडून अपेक्षा असते, ती अपेक्षापूर्तीची! जेव्हा पद असते तेव्हा काही करायचे नाही आणि पद नसताना मागण्या करायच्या किंवा आश्वासने द्यायची, ही राजकारण्यांची सवयच शेतकºयांच्या मुळावर उठली आहे. त्यांची ही सवय मोडेल तो शेतकºयांसाठी सुदिन असेल!

टॅग्स :Farmerशेतकरी