शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

तब्बल सात शेतक-यांनी पत्करला आत्महत्येचा मार्ग, बळीराजासाठी ठरली काळी दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:02 IST

दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा उत्सव! यावर्षी मात्र या उत्सवाच्या धामधुमीतच, विदर्भात एक-दोन नव्हे, तर तब्बल सात शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.

दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा उत्सव! यावर्षी मात्र या उत्सवाच्या धामधुमीतच, विदर्भात एक-दोन नव्हे, तर तब्बल सात शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. अस्मानी व सुलतानी संकटांमुळे कुटुंबीयांना दिवाळीसारखा सणही साजरा करता येत नसल्याच्या वैफल्यापोटी त्यांनी शेवटी मृत्यू जवळ केला. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील वरुड बिहाडे गावातील दोन, यवतमाळ जिल्ह्यातील वाठोडा गावातील दोन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील तीन शेतक-यांचा समावेश आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये घालण्यात आलेला घोळ आणि त्यामुळे शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यात झालेला विलंब, या सात शेतकºयांच्या मृत्यूसाठी नक्कीच कुठे तरी कारणीभूत ठरला आहे. कधी काळी अवघ्या देशासाठी आदर्श ठरलेल्या महाराष्ट्रास सुमारे दोन दशकांपासून शेतकरी आत्महत्यांचा फास लागला आहे. अवर्षण, अतिवृष्टी, नापिकी, कर्जाचा बोजा, कृषिमालास योग्य दर न मिळणे, गाठीशी पैसा नसल्याने औषधोपचार न घेता येणे, आदी कारणांमुळे वैफल्यग्रस्त होऊन आजवर हजारो शेतकºयांनी स्वत:चे जीवन संपविले आहे. त्यांची संख्या एव्हाना दोन लाखांच्या घरात पोहोचली आहे. या काळात राज्याने दोन्ही प्रमुख राजकीय विचारधारांची सरकारे अनुभवली. विरोधात असताना शेतकरी हिताच्या गप्पा मारणाºयांना सत्तेची ऊब मिळाली, की त्यांना शेतकºयांचा विसर पडतो आणि सत्तेतून पायउतार झालेल्यांना शेतकरी प्रेमाचे उमाळे येतात! शेतकºयांच्या स्थितीत मात्र काहीही फरक पडत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सोमवारी अमरावती येथे कृषी मालास दीडपट भाव देण्याची मागणी केली. तसे झाल्यास कुणीही कर्जमाफी मागणार नाही, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेमके हेच आश्वासन दिले होते. दुर्दैवाने ना पवारांनी त्यांच्या कारकिर्दीत दीडपट भावाची मागणी पूर्ण केली, ना मोदींनी सत्तेत आल्यावर आश्वासनाची पूर्तता केली! कृषी मालास योग्य भाव मिळाला, तर शेतकरी ना आत्महत्या करेल, ना कर्जमाफी मागेल! हे तर शाळकरी पोरांनाही कळते. त्यासाठी मोदी व पवारांसारख्या धुरंधरांची गरजच काय? त्यांच्याकडून अपेक्षा असते, ती अपेक्षापूर्तीची! जेव्हा पद असते तेव्हा काही करायचे नाही आणि पद नसताना मागण्या करायच्या किंवा आश्वासने द्यायची, ही राजकारण्यांची सवयच शेतकºयांच्या मुळावर उठली आहे. त्यांची ही सवय मोडेल तो शेतकºयांसाठी सुदिन असेल!

टॅग्स :Farmerशेतकरी