शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अग्रलेख : न्यायसंस्थेचे घोर अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 05:30 IST

जात वैधता दाखल्यांच्या फेरपडताळणीनंतर त्यातील किती अवैध होते, ते स्पष्ट होईल. त्या वेळच्या निवडणुकीत जिंकलेल्यांपैकी ज्यांचे दाखले अवैध ठरतील त्यांना काहीच केले जाऊ शकत नाही.

महाराष्ट्र सरकारने राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या जात पडताळणी समित्यांनी ३० जुलै २०११ ते ३१ आॅगस्ट २०१२ या १३ महिन्यांच्या काळात सुमारे ३६ हजार व्यक्तींना दिलेल्या जात वैधता दाखल्यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेला निकाल हे न्यायसंस्थेकडून न्याय करण्याच्या नादात केलेल्या अन्यायाचे उदाहरण आहे. या समित्यांनी एकूण ३६ हजार ९२९ व्यक्तींना पडताळणी दाखले दिले. यापैकी ९० टक्क्यांहून अधिक दाखले दक्षता पथकाकडून शहानिशा न करता अवघ्या काही दिवसांत दिले गेले होते. उच्च न्यायालयाने हे सर्व दाखले रद्द करून ते नष्ट करण्याचे आदेश दिले.अपिलात सर्वोच्च न्यायालयाने हे दाखले सरधोपटपणे रद्द न करता त्या दाखल्यांची येत्या सहा महिन्यांत फेरतपासणी करण्याचा आदेश दिला. राज्यघटनेने ज्यांना आरक्षणाचे फायदे दिले आहेत ते फक्त त्यांनाच मिळावेत आणि इतरांनी लबाडीने ते लाटू नयेत याची खात्री करणे हा या निकालामागचा उद्देश आहे. मात्र गेल्या नऊ वर्षांत न्यायालयांमध्ये जे घडले ते पाहता हा उद्देश याआधीच असफल झाल्याचे म्हणावे लागेल. हे दाखले देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याचे निमित्त त्या वेळी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे होते. तरी यापैकी फक्त ४,३५९ दाखले ‘फक्त निवडणुकीसाठी’ असे शिक्के मारून दिलेले होते. बाकीचे दाखले सरसकट सर्व प्रकारच्या आरक्षणासाठी वापरता येतील असे होते. असे संशयास्पद दाखले ज्यांना मिळाले त्यांच्या भावी पिढ्याही त्याचा गैरफायदा घेतील, अशी भीतीही होती. उच्च न्यायालयातील सुनावण़ीच्या वेळी ज्यांनी लबाडीने दाखले मिळविले असतील ते राखीव जागांवर निवडणुका लढवून खºया मागासवर्गीयांचे हक्क ओरबाडून घेतील, ही तातडीची चिंता होती. सुरुवातीस राज्य सरकारने हे दाखले फक्त निवडणुकीपुरते वापरता येतील, असे सांगितले. मात्र नंतर सरकारने असे करता येणार नाही, अशी भूमिका घेतली.त्यामुळे त्या वेळी उच्च न्यायालयाने असा अंतरिम आदेश दिला की, उमेदवाराने अर्जासोबत जोडलेला जात पडताळणी दाखला दक्षता पथकाने शहानिशा न करता दिलेला असेल तर तो अवैध मानावा व अशा उमेदवारास निवडणूक लढवू देऊ नये. पण याविरुद्ध राज्य सरकार अपिलात गेले व सर्वोच्च न्यायालयाने या आदेशास स्थगिती दिली. त्यामुळे अशा संशयास्पद दाखल्यांच्या आधारे हजारो उमेदवारांनी त्या वेळी निवडणूक लढविली. त्यापैकी जे निवडून आले त्यांची पाच वर्षांची मुदतही आता संपली. त्यानंतरच्या निवडणुकीतही हे दाखले वापरले गेले. या सर्व दाखल्यांची फेरपडताळणी झाल्यावर त्यातील किती वैध व किती अवैध होते, ते स्पष्ट होईल. त्या वेळच्या निवडणुकीत जे जिंकले त्यांच्यापैकी ज्यांचे दाखले आता अवैध ठरतील त्यांना काहीच केले जाऊ शकत नाही, कारण त्यांची मुदत संपली आहे. ज्यांनी अशा संशयास्पद दाखल्यांच्या आधारे त्या वेळी आरक्षित जागांवर प्रवेश घेतला असेल व ज्यांचे शिक्षण पूर्ण झाले असेल त्यांच्याबाबतीतही अशीच हतबलता वाट्याला येईल. म्हणूनच सरकारच्या आशीर्वादाने झालेल्या या एवढ्या मोठ्या ढळढळीत बेकायदेशीरपणाला वेळीच पायबंद करू न शकणे हे न्यायसंस्थेचे अपयश आहे. निवडणूक जिंकलेले जे अजूनही पदावर आहेत, जे नोकरीत आहेत व जे अजूनही शिकत आहेत त्यांची पदे, नोकºया व प्रवेश रद्द केले जाऊ शकतील. अशांची संख्या मोठी असेल तर त्यातून असंतोष पसरेल. एकूण समाजातील शोषित आणि वंचितांना आरक्षण देण्याचा उदात्त हेतू विफल करण्याच्या प्रयत्नांना प्रभावीपणे निष्प्रभ करण्यात न्यायसंस्था कमी पडते, हेच यावरून दिसते. ज्याचे परिणाम घड्याळाचे काटे उलटे फिरवूनही पुसून टाकता येत नाहीत अशी प्रकरणेही वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवणे व जे नंतर मागे घेतले जाऊ शकत नाहीत, असे अंतरिम आदेश देणे न्यायसंस्था जोपर्यंत बंद करणार नाही तोपर्यंत अशी लबाडी फोफावतच जाईल. न्यायसंस्थेला हे नक्कीच भूषणावह नाही.

टॅग्स :Courtन्यायालय