शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अग्रलेख : न्यायसंस्थेचे घोर अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 05:30 IST

जात वैधता दाखल्यांच्या फेरपडताळणीनंतर त्यातील किती अवैध होते, ते स्पष्ट होईल. त्या वेळच्या निवडणुकीत जिंकलेल्यांपैकी ज्यांचे दाखले अवैध ठरतील त्यांना काहीच केले जाऊ शकत नाही.

महाराष्ट्र सरकारने राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या जात पडताळणी समित्यांनी ३० जुलै २०११ ते ३१ आॅगस्ट २०१२ या १३ महिन्यांच्या काळात सुमारे ३६ हजार व्यक्तींना दिलेल्या जात वैधता दाखल्यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेला निकाल हे न्यायसंस्थेकडून न्याय करण्याच्या नादात केलेल्या अन्यायाचे उदाहरण आहे. या समित्यांनी एकूण ३६ हजार ९२९ व्यक्तींना पडताळणी दाखले दिले. यापैकी ९० टक्क्यांहून अधिक दाखले दक्षता पथकाकडून शहानिशा न करता अवघ्या काही दिवसांत दिले गेले होते. उच्च न्यायालयाने हे सर्व दाखले रद्द करून ते नष्ट करण्याचे आदेश दिले.अपिलात सर्वोच्च न्यायालयाने हे दाखले सरधोपटपणे रद्द न करता त्या दाखल्यांची येत्या सहा महिन्यांत फेरतपासणी करण्याचा आदेश दिला. राज्यघटनेने ज्यांना आरक्षणाचे फायदे दिले आहेत ते फक्त त्यांनाच मिळावेत आणि इतरांनी लबाडीने ते लाटू नयेत याची खात्री करणे हा या निकालामागचा उद्देश आहे. मात्र गेल्या नऊ वर्षांत न्यायालयांमध्ये जे घडले ते पाहता हा उद्देश याआधीच असफल झाल्याचे म्हणावे लागेल. हे दाखले देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याचे निमित्त त्या वेळी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे होते. तरी यापैकी फक्त ४,३५९ दाखले ‘फक्त निवडणुकीसाठी’ असे शिक्के मारून दिलेले होते. बाकीचे दाखले सरसकट सर्व प्रकारच्या आरक्षणासाठी वापरता येतील असे होते. असे संशयास्पद दाखले ज्यांना मिळाले त्यांच्या भावी पिढ्याही त्याचा गैरफायदा घेतील, अशी भीतीही होती. उच्च न्यायालयातील सुनावण़ीच्या वेळी ज्यांनी लबाडीने दाखले मिळविले असतील ते राखीव जागांवर निवडणुका लढवून खºया मागासवर्गीयांचे हक्क ओरबाडून घेतील, ही तातडीची चिंता होती. सुरुवातीस राज्य सरकारने हे दाखले फक्त निवडणुकीपुरते वापरता येतील, असे सांगितले. मात्र नंतर सरकारने असे करता येणार नाही, अशी भूमिका घेतली.त्यामुळे त्या वेळी उच्च न्यायालयाने असा अंतरिम आदेश दिला की, उमेदवाराने अर्जासोबत जोडलेला जात पडताळणी दाखला दक्षता पथकाने शहानिशा न करता दिलेला असेल तर तो अवैध मानावा व अशा उमेदवारास निवडणूक लढवू देऊ नये. पण याविरुद्ध राज्य सरकार अपिलात गेले व सर्वोच्च न्यायालयाने या आदेशास स्थगिती दिली. त्यामुळे अशा संशयास्पद दाखल्यांच्या आधारे हजारो उमेदवारांनी त्या वेळी निवडणूक लढविली. त्यापैकी जे निवडून आले त्यांची पाच वर्षांची मुदतही आता संपली. त्यानंतरच्या निवडणुकीतही हे दाखले वापरले गेले. या सर्व दाखल्यांची फेरपडताळणी झाल्यावर त्यातील किती वैध व किती अवैध होते, ते स्पष्ट होईल. त्या वेळच्या निवडणुकीत जे जिंकले त्यांच्यापैकी ज्यांचे दाखले आता अवैध ठरतील त्यांना काहीच केले जाऊ शकत नाही, कारण त्यांची मुदत संपली आहे. ज्यांनी अशा संशयास्पद दाखल्यांच्या आधारे त्या वेळी आरक्षित जागांवर प्रवेश घेतला असेल व ज्यांचे शिक्षण पूर्ण झाले असेल त्यांच्याबाबतीतही अशीच हतबलता वाट्याला येईल. म्हणूनच सरकारच्या आशीर्वादाने झालेल्या या एवढ्या मोठ्या ढळढळीत बेकायदेशीरपणाला वेळीच पायबंद करू न शकणे हे न्यायसंस्थेचे अपयश आहे. निवडणूक जिंकलेले जे अजूनही पदावर आहेत, जे नोकरीत आहेत व जे अजूनही शिकत आहेत त्यांची पदे, नोकºया व प्रवेश रद्द केले जाऊ शकतील. अशांची संख्या मोठी असेल तर त्यातून असंतोष पसरेल. एकूण समाजातील शोषित आणि वंचितांना आरक्षण देण्याचा उदात्त हेतू विफल करण्याच्या प्रयत्नांना प्रभावीपणे निष्प्रभ करण्यात न्यायसंस्था कमी पडते, हेच यावरून दिसते. ज्याचे परिणाम घड्याळाचे काटे उलटे फिरवूनही पुसून टाकता येत नाहीत अशी प्रकरणेही वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवणे व जे नंतर मागे घेतले जाऊ शकत नाहीत, असे अंतरिम आदेश देणे न्यायसंस्था जोपर्यंत बंद करणार नाही तोपर्यंत अशी लबाडी फोफावतच जाईल. न्यायसंस्थेला हे नक्कीच भूषणावह नाही.

टॅग्स :Courtन्यायालय