शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावविषयी संवेदनशीलता हवीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 16:26 IST

मिलिंद कुलकर्णी जळगाव शहरातील खड्डयांमुळे १५ दिवसांपूर्वी अनिल बोरोले या ज्येष्ठ उद्योजकाचा मृत्यू झाला आणि जनमानस ढवळून निघाले. अपघातांमध्ये ...

मिलिंद कुलकर्णीजळगाव शहरातील खड्डयांमुळे १५ दिवसांपूर्वी अनिल बोरोले या ज्येष्ठ उद्योजकाचा मृत्यू झाला आणि जनमानस ढवळून निघाले. अपघातांमध्ये रोज कुणी जखमी किंवा मृत्युमुखी पडत असते. ते सगळे निष्पाप असतात. पण नामांकित व्यक्ती अशा घटनेत दगावल्यास त्याची चर्चा होते. स्वाभाविकपणे बोरोले यांच्या अपघाती निधनानंतर खड्डे, अमृत पाणी योजनेच्या नावाखाली दोन वर्षे रस्ते न बनविण्याचा राज्य शासनाचा तुघलकी निर्णय, शहराच्या विशिष्ट भागात रस्तेदुरुस्ती, अमृत योजनेच्या ठेकेदाराकडून दोन महिन्यात दुरुस्तीचा निविदेत निकष असताना त्याकडे महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांचा कानाडोळा यासोबत आमदार सुरेश भोळे यांची पाच वर्षांतील आणि महापौर सीमा भोळे यांच्या दहा महिन्यांतील कारकिर्दीचा लेखा जोखा मांडला गेला. रोटरीसारख्या संस्थेने जळगावच्या विकासाविषयी चर्चासत्र घेतले. अनेक सामाजिक संस्थांनी आंदोलने केली. प्रशासनाला निवेदने दिली. कुणी खड्डयात रोपे लावून निषेध केला. राजकीय पक्षांनी आरोप-प्रत्यारोप केले. जळगावविषयी नागरिकांची संवेदनशीलता यानिमित्ताने प्रकट झाली.भाजप, आमदार आणि महापौर यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याने नागरिकांनी ‘लोकमत अभियाना’त उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सुमारे ३०० हून अधिक नागरिकांनी आपल्या भागातील खड्डयांचे फोटो ‘लोकमत’कडे पाठविले. खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली, हे अभियानाचे मोठे यश आहे. प्रश्न असा आहे की, शहरात खड्डे पडले असतील, तर ते मुरुम, बांधकाम साहित्य टाकून आता बुजविले जात आहेत, मग बोरोले यांच्या अपघाती निधनापूर्वी जर हे झाले असते तर त्यांचे प्राण तरी वाचले असते ना? कर्तव्यपालनात महापालिका अपयशी ठरल्याने नागरिकांचा संताप झाला. प्रशासन जर पदाधिकाऱ्यांचे ऐकत नसेल तर राज्य शासन आपल्याच पक्षाचे असताना तक्रार करायला रोखले कोणी? पण तेही होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे. आमदार सुरेश भोळे यांनी पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘चीड येते ना खड्डयाची?‘ असे प्रचार अभियान राबविले होते. आता पाच वर्षांत जळगावकरांची खड्डयांविषयी चीड कायम का राहिली, याचे उत्तर आमदार भोळे यांनी द्यायला हवे की नको? केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका या तिन्ही ठिकाणी भाजप असताना जळगावचे प्रश्न सुटण्याची किमान सुरुवात दहा महिन्यांत का झाली नाही ? हे ही नागरिकांना सांगावे लागेल. हुडकोच्या कर्जाचा तिढा कायम का आहे? गाळेधारकांकडून नियमानुसार भाडे वसूल करण्याचा निकाल न्यायालयाने दिला असतानाही त्याची अंमलबजावणी का केली जात नाही? राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण का रखडले आहे? भुयारी गटार योजनेचा प्रश्न का भिजत पडला आहे? एलईडी पथदिव्यांमध्ये ठेकेदाराने घोळ कसा केला? स्वच्छता कामाचा ठेकेदार अजून काम का सुरु करीत नाही? अशी प्रश्नांची मालिका आहे. त्याचे उत्तर केवळ ८०० कोटी रुपयांचा निधी आणला असे म्हणून देता येणार नाही. भविष्यातील योजनांचे स्वप्न दाखवून वर्तमानकाळ खडतर ठेवण्यात काहीही हशील नाही, हे जळगावकरांना उमगल्याने त्यांनी सत्तांतर केले आहे. तुम्हीही तेच करीत असाल तर मग तुमच्या आणि त्यांच्यात काय फरक राहिला?भाजप, शिवसेना हे दोन प्रमुख पक्ष महापालिका आणि विधानसभा क्षेत्रात सक्रीय आहेत. यापूर्वी ३० वर्षे सुरेशदादा जैन यांच्या आघाडीची सत्ता पालिकेत राहिली आहे. सदाशिवराव ढेकळे, आबा कापसे, ललित कोल्हे, लता भोईटे यांच्यासारखे दिग्गज नगरसेवक आता भाजपमध्ये आहेत. कैलास सोनवणे, शुचिता हाडा, डॉ.अश्विन सोनवणे यांच्यासारख्या स्वपक्षीय नगरसेवकांकडे दांडगा अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा, ज्येष्ठतेचा उपयोग महापालिकेत करुन घ्यायला हवा. सर्वसमावेशकता राहिली तर कारभार एककल्ली, एकतर्फी होत नाही. प्रत्येकवेळी पक्षाबाहेरील आणि पक्षांतर्गत विरोधकांना बोल लावल्याने आपली उंची आणि कर्तृत्व वाढत नाही, हे राजकारणातील प्रत्येक व्यक्तीने लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे जळगावविषयी प्रत्येक घटक संवेदनशील राहणे अत्यंत आवश्यक आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव