शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मानवतेविरुद्धच्या गुन्ह्याबद्दलची संवेदनशीलता...

By किरण अग्रवाल | Updated: December 23, 2021 10:33 IST

Editors view : अशा घटना मानवतेलाही धक्का देणाऱ्या ठरतात, त्यामुळे त्याची गंभीर दखल घेणे भाग पडते.

- किरण अग्रवाल

 नात्यांमधील नजाकत ही त्यातील मान-सन्मान व मर्यादांमुळे टिकून असते. यातील मर्यादांच्या अवलंबातून नाती अधिक गहिरीही होतात. काही नाती ही नाजूक व हळवी असतात, त्यांना संवेदनेची किनार असते. या संवेदनांचा ओलावाच अधिकतर नाती टिकवून ठेवण्यास कामी येतो. खळखळून वाहणाऱ्या झऱ्यातून जो नाद अनुभवयास येतो तसा तो नात्यांमध्ये असला की त्याची वीण अधिक घट्ट होते. हा नाद विश्वासाचा असावा लागतो, आपुलकीचा व जिव्हाळ्याचा असावा लागतो, तसा तो मर्यादांचे भान ठेवणाराही असावा लागतो. हे भान सुटले की कुटुंबाचा व समाजाचाही धाक उरत नाही. सद्सद्विवेक बुद्धी गहाण पडली की अविवेक बळावतो व त्यातून अनाचारही घडून येतो. नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना त्यातूनच घडून येतात. अशा घटना मानवतेलाही धक्का देणाऱ्या ठरतात, त्यामुळे त्याची गंभीर दखल घेणे भाग पडते; जी एका प्रकरणात उच्च न्यायालयाने घेतल्याचे दिसून आले. 

अडचणीच्या काळात नात्यांची कसोटी लागते, पण कधीकधी नात्यांमधील मर्यादा ओलांडण्याचे प्रकार घडून येतात तेव्हा मानवतेलाही धक्का लागून गेल्याशिवाय राहत नाही. असाच एक प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे घडला होता. तेथे व्यवसायाने मजूर असणाऱ्या एका पित्याने आपल्याच अल्पवयीन मुलीवर सतत बलात्कार करून तिचा दोनदा गर्भपात करण्यात आला होता. तिसऱ्या वेळी मुलीने बाळाला जन्म दिल्यामुळे पित्याचे दुष्कृत्य उघड झाले होते. याप्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यावर आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी करताना बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार हा मानवतेविरुद्धचा आणि दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले व संबंधितांचे अपील फेटाळून लावले. मुलीचे संरक्षण करणे बापाची जबाबदारी असते. बाप हा मुलीसाठी ताकद, आधार व विश्वस्त असतो, परंतु या प्रकरणात बापानेच मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले हा अत्यंत अश्लील, जघन्य व खुनापेक्षाही अधिक गंभीर गुन्हा असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. समाज भलेही संवेदनाहीन होत चालला असेल, परंतु न्यायालये किती संवेदनशील आहेत हेच यातून लक्षात घ्यायचे. अर्थात, न्यायाच्या प्रक्रियेत वस्तुस्थिती व पुराव्यांखेरीज संवेदनांना फारसा अर्थ नसतो हे खरे, परंतु म्हणून भावनांचा किंवा मानवतेचा विचार बाजूस पडतो असे अजिबात नाही. 

खरेतर बलात्काराच्या घटनांमध्ये सुमारे ९० टक्क्यांपेक्षा अधिक आरोपी हे नात्यातील किंवा परिचयातीलच आढळून येत असल्याचे पाहता मानवतेबरोबरच नातेसंबंधही पणास लागतात. संस्काराची शिदोरी सुटून गेली की असे प्रकार घडतात. केवळ बलात्कारच नव्हे, तर प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीची अगर पत्नीची केली जाणारी हत्या असो, की अनैतिक संबंधातून होणारे कुटुंब कलह; अपवादात्मक असले तरी असल्या घटना समाज मनावर दूरगामी परिणाम करणाऱ्या असतात, त्यामुळे या मागील ऱ्हासाच्या कारणांबद्दल समाजातील मान्यवरांनी चिंतन करणे गरजेचे ठरावे. विकृत मनोवृत्ती व विभक्त कुटुंब पद्धतीतून ओढवलेली अनिर्बंधता यासारखी अनेक कारणे यामागे आहेतच, परंतु कायद्यासोबतच समाजाचा व कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा धाक न उरल्याचेही यातून लक्षात यावे. सामाजिक जाणिवा व नात्यांमधील बंध सैलावत आहेत ते त्याचमुळे. माणूस माणसाविरुद्ध उठला असून मानवता लयास जात असल्याचे अशा घटनातून समोर येते. बापाचा मुलीवरील बलात्कार हा मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे जे मत उच्च न्यायालयाने नोंदविले आहे ते याचसंदर्भाने अतिशय महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Courtन्यायालयSocialसामाजिक