शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पाकिस्तानचे सिनेट: तेव्हा आणि आता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 11:10 IST

जनरल झिया उल हक यांची हुकूमशाही आणि त्यांनी  लादलेल्या मार्शल लॉ चा निषेध म्हणून अन्य सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता.

- जावेद जब्बारपाकिस्तानात सध्या सिनेट निवडणुकीच्या गतिमान झालेल्या हालचाली पाहताना मला १९८५ सालच्या सिनेट निवडणुकीची आठवण झाली. १९८५ च्या फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर माझी पत्नी शबनम हिने मला आरक्षित जागेसाठी निवडणूक लढवण्यास सुचवले.  जमात- ए-इस्लामी, जमियत-उलेमा- ई-इस्लाम आणि पगारा मुस्लिम लीग या तीन पक्षांनी अप्रत्यक्षपणे निवडणुकीत उतरायची तयारी चालवली होती. जनरल झिया उल हक यांची हुकूमशाही आणि त्यांनी  लादलेल्या मार्शल लॉ चा निषेध म्हणून अन्य सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता.

कोणताच राजकीय अनुभव पदरी नसताना मी निवडणूक लढवायचे ठरवले. मार्शल लॉ च्या सौजन्याने का होईना- लादलेल्या एका मनमानी घटना दुरुस्तीमुळे  सिनेटमधल्या काही जागा तंत्रक्षेत्रातील लोकांसाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे माझ्यासारख्या राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अनेकांना देशाच्या व्यवहारात काही सकारात्मक योगदान देण्याची संधी प्राप्त झाली होती. मी मैदानात उतरण्याचे ठरवले.

एक अनुभवी मित्र म्हणाला, ‘पन्नास लाख रुपये खर्च करण्याची तुमची तयारी असेल तरच ते शक्य होईल!’ (१९८५ चे पन्नास लाख आजच्या पाच कोटीहून अधिक असतील.) सिंध विधानसभेच्या सदस्यांची मते विकत घेण्यासाठीचे ते किमान मूल्य असेल, असे त्याचे म्हणणे होते. आमच्या उत्साहावर पाणी पडले. लाच देऊन काही करणार नसल्याचे मी तत्क्षणी सांगून टाकले. माझा बायोडेटा आणि  एक माहितीपत्रक छापून आम्ही कामास लागलो.  काही निकटवर्ती मित्रांच्या मदतीने आम्ही सिंध प्रांतीय विधिमंडळाच्या शहरी आणि ग्रामीण भागातील सदस्यांशी संपर्क साधू लागलो.  

मार्चच्या प्रारंभीच एक व्यक्ती कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आमच्याकडे आली. ते होते थारपरकरचे सांसद टिकमदास कोहली. त्यांना माझे काम माहिती होते, त्यामुळे त्यांचे मत मलाच द्यायचा निर्णय घेतल्याचे  त्यांनी सांगितले. त्यांचे आभार कसे मानावेत हेच मला कळत नव्हते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसाची सकाळ उजाडली तरी माझ्या उमेदवारीसाठी सूचक आणि अनुमोदक सांसद शोधण्यात आम्हाला यश आले नव्हते.  इतक्यात आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. विद्यापीठातले मला सीनिअर असलेले माझे मित्र अन्वर मकसूद यांचे ज्येष्ठ बंधू अहमद मकसूद यांनी मला फोन केला आणि तत्काळ जाऊन नवाबशहाचे सांसद असलेले बंधुद्वय शौकत अली शाह आणि नवाझ अली शाह यांची भेट घेण्यास सांगितले. अर्ज भरण्याचा अवधी समाप्त होता होता  मी अर्ज दाखल केला.

१४ मार्च रोजी मतदान चालू असतानाच मी घरी गेलो. पराभव स्वीकारण्याची मनोमन तयारी केली होती. इतक्यात एक फोन आला. विजयासाठी आवश्यक असलेल्या पहिल्या पसंतीच्या १४ मतांऐवजी मला तब्बल २१ मते मिळाली होती. माझ्या पत्नीचा प्रचंड आत्मविश्वास, मित्रमंडळींचे साहाय्य आणि मला अज्ञात सांसदांनी दाखवलेल्या दिलदारीमुळे ही सरशी झाली होती. यापैकी कुणीच एका पै चीही अपेक्षा केली नव्हती. राजकारणाचा कोणताच पूर्वानुभव नसताना मी निर्धारित १०,००० रुपयांच्या खर्चाच्या मर्यादेत राहून निवडणूक जिंकली. २००० साली परवेझ मुशर्रफ यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन मी बाहेर पडलो. त्यानंतर २००३ साली सिनेटच्या संभाव्य निवडणुकीत उतरण्याचा विचार करून माझ्या उमेदवारीसाठी सूचक आणि अनुमोदक शोधण्याचा एक अयशस्वी यत्न मी केला. त्यानंतर प्रांतीय विधिमंडळाची एक महिला सदस्य माझ्याकडे आली. तिने दोन कोटी रुपयांच्या बदल्यांत माझ्या अर्जावर सही करण्याची तयारी दर्शवली.

मला आश्चर्याचा धक्काच बसला...

१९८५ च्या त्या काळात प्रलंबित मार्शल लॉ, खोटे इस्लामीकरण आणि पक्षविरहित निवडणुकांमुळे लोकशाही मूल्यांचा आणि संस्थांचा ऱ्हास झाल्याची हाकाटी होत होती. या पार्श्वभूमीवर झालेली निवडणूक जिंकण्यासाठी जो खर्च आला तो २०२१ साली पक्ष पातळीवर लढवण्यात येत असलेल्या निवडणुकीतील महाप्रचंड खर्चाच्या तुलनेत अगदीच नगण्य होता; हा उपरोध लक्षात घेण्याजोगा आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान