शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

पाकिस्तानचे सिनेट: तेव्हा आणि आता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 11:10 IST

जनरल झिया उल हक यांची हुकूमशाही आणि त्यांनी  लादलेल्या मार्शल लॉ चा निषेध म्हणून अन्य सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता.

- जावेद जब्बारपाकिस्तानात सध्या सिनेट निवडणुकीच्या गतिमान झालेल्या हालचाली पाहताना मला १९८५ सालच्या सिनेट निवडणुकीची आठवण झाली. १९८५ च्या फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर माझी पत्नी शबनम हिने मला आरक्षित जागेसाठी निवडणूक लढवण्यास सुचवले.  जमात- ए-इस्लामी, जमियत-उलेमा- ई-इस्लाम आणि पगारा मुस्लिम लीग या तीन पक्षांनी अप्रत्यक्षपणे निवडणुकीत उतरायची तयारी चालवली होती. जनरल झिया उल हक यांची हुकूमशाही आणि त्यांनी  लादलेल्या मार्शल लॉ चा निषेध म्हणून अन्य सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता.

कोणताच राजकीय अनुभव पदरी नसताना मी निवडणूक लढवायचे ठरवले. मार्शल लॉ च्या सौजन्याने का होईना- लादलेल्या एका मनमानी घटना दुरुस्तीमुळे  सिनेटमधल्या काही जागा तंत्रक्षेत्रातील लोकांसाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे माझ्यासारख्या राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अनेकांना देशाच्या व्यवहारात काही सकारात्मक योगदान देण्याची संधी प्राप्त झाली होती. मी मैदानात उतरण्याचे ठरवले.

एक अनुभवी मित्र म्हणाला, ‘पन्नास लाख रुपये खर्च करण्याची तुमची तयारी असेल तरच ते शक्य होईल!’ (१९८५ चे पन्नास लाख आजच्या पाच कोटीहून अधिक असतील.) सिंध विधानसभेच्या सदस्यांची मते विकत घेण्यासाठीचे ते किमान मूल्य असेल, असे त्याचे म्हणणे होते. आमच्या उत्साहावर पाणी पडले. लाच देऊन काही करणार नसल्याचे मी तत्क्षणी सांगून टाकले. माझा बायोडेटा आणि  एक माहितीपत्रक छापून आम्ही कामास लागलो.  काही निकटवर्ती मित्रांच्या मदतीने आम्ही सिंध प्रांतीय विधिमंडळाच्या शहरी आणि ग्रामीण भागातील सदस्यांशी संपर्क साधू लागलो.  

मार्चच्या प्रारंभीच एक व्यक्ती कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आमच्याकडे आली. ते होते थारपरकरचे सांसद टिकमदास कोहली. त्यांना माझे काम माहिती होते, त्यामुळे त्यांचे मत मलाच द्यायचा निर्णय घेतल्याचे  त्यांनी सांगितले. त्यांचे आभार कसे मानावेत हेच मला कळत नव्हते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसाची सकाळ उजाडली तरी माझ्या उमेदवारीसाठी सूचक आणि अनुमोदक सांसद शोधण्यात आम्हाला यश आले नव्हते.  इतक्यात आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. विद्यापीठातले मला सीनिअर असलेले माझे मित्र अन्वर मकसूद यांचे ज्येष्ठ बंधू अहमद मकसूद यांनी मला फोन केला आणि तत्काळ जाऊन नवाबशहाचे सांसद असलेले बंधुद्वय शौकत अली शाह आणि नवाझ अली शाह यांची भेट घेण्यास सांगितले. अर्ज भरण्याचा अवधी समाप्त होता होता  मी अर्ज दाखल केला.

१४ मार्च रोजी मतदान चालू असतानाच मी घरी गेलो. पराभव स्वीकारण्याची मनोमन तयारी केली होती. इतक्यात एक फोन आला. विजयासाठी आवश्यक असलेल्या पहिल्या पसंतीच्या १४ मतांऐवजी मला तब्बल २१ मते मिळाली होती. माझ्या पत्नीचा प्रचंड आत्मविश्वास, मित्रमंडळींचे साहाय्य आणि मला अज्ञात सांसदांनी दाखवलेल्या दिलदारीमुळे ही सरशी झाली होती. यापैकी कुणीच एका पै चीही अपेक्षा केली नव्हती. राजकारणाचा कोणताच पूर्वानुभव नसताना मी निर्धारित १०,००० रुपयांच्या खर्चाच्या मर्यादेत राहून निवडणूक जिंकली. २००० साली परवेझ मुशर्रफ यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन मी बाहेर पडलो. त्यानंतर २००३ साली सिनेटच्या संभाव्य निवडणुकीत उतरण्याचा विचार करून माझ्या उमेदवारीसाठी सूचक आणि अनुमोदक शोधण्याचा एक अयशस्वी यत्न मी केला. त्यानंतर प्रांतीय विधिमंडळाची एक महिला सदस्य माझ्याकडे आली. तिने दोन कोटी रुपयांच्या बदल्यांत माझ्या अर्जावर सही करण्याची तयारी दर्शवली.

मला आश्चर्याचा धक्काच बसला...

१९८५ च्या त्या काळात प्रलंबित मार्शल लॉ, खोटे इस्लामीकरण आणि पक्षविरहित निवडणुकांमुळे लोकशाही मूल्यांचा आणि संस्थांचा ऱ्हास झाल्याची हाकाटी होत होती. या पार्श्वभूमीवर झालेली निवडणूक जिंकण्यासाठी जो खर्च आला तो २०२१ साली पक्ष पातळीवर लढवण्यात येत असलेल्या निवडणुकीतील महाप्रचंड खर्चाच्या तुलनेत अगदीच नगण्य होता; हा उपरोध लक्षात घेण्याजोगा आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान