शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सेनेला विदर्भाचा लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:05 IST

मुंबईतील शिवसैनिक डरकाळी फोडताना दिसतो तर विदर्भातील शिवसैनिक ती ऐकण्यातच धन्यता मानतो.

शिवसेनेने सातत्याने ‘जय महाराष्ट्र’चा नारा बुलंद केला. पण तो करीत असताना विदर्भातील प्रश्नांकडे, तेथील जनभावनांकडे तर दुर्लक्ष केलेच पण स्वत:च्या राजकीय वारसदारांनाही फारसे झुकते माप दिले नसल्याचा इतिहास आहे. त्यामुळे मुंबईतील शिवसैनिक डरकाळी फोडताना दिसतो तर विदर्भातील शिवसैनिक ती ऐकण्यातच धन्यता मानतो. कारण या शिवसैनिकाला मुंबईतून फारसे कुरवाळले जात नाही. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करताना विदर्भाकडे मात्र सेनेचे गेल्या काळात कमालीचे दुर्लक्ष झाले, हे नाकारता येणार नाही. गेल्या चार वर्षात सेनेने विदर्भातील एकामागे एक संपर्क प्रमुख बदलले. पण एकाही प्रमुखाने कार्यकर्त्यांशी फारसा संपर्क ठेवला नाही. निवडणुकांच्या वेळी मुंबईतून सरदार येतात. तोफगर्जना करतात अन् निघून जातात. निवडणुकीची लढाई संपत येते तरी कार्यकर्त्यांना रसद मिळत नाही. नेहमीच्याच अशा अनुभवामुळे हतबल झालेला, मदतीची आस ठेवून हताश झालेला शिवसैनिक शेवटी भाजपाच्या गळाला लागला. त्याला विदर्भातील दमखम नेतत्व नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आपलेसे वाटू लागले. एकेकाळी विदर्भात शिवसेनेचा बऱ्यापैकी बोलबाला होता. प्रत्येक जिल्ह्यात आमदार होता. मात्र, आता संपूर्ण विदर्भात फक्त चार आमदारांवर शिवसेना गडप झाली आहे. लोकसभेत शिवसेनेला भाजपाची साथ होती. सेनेचे चार खासदार लोकसभेत पोहोचले. भाजपाने साथ सोडताच विधानसभा निवडणुकीत ६२ पैकी फक्त ४ जागा सेनेच्या पदरात पडल्या. स्वबळाचा नारा विदर्भात तरी सेनेच्या अंगलट आला. बहुतांश जागांवर सेनेच्या उमेदवारांनी दखलपात्र मतेही घेतली नाही. पुन्हा सेनेचा स्वबळाचा नारा कायम आहे. उलट यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धार अधिक तीक्ष्ण केली आहे. मात्र, केवळ ‘आवाज कुणाचा’च्या गर्जना करून राज्यात एकहाती सत्ता मिळविता येणार नाही, हे सेनेच्या लक्षात आले आहे. वेगळ्या विदर्भाची भूमिका तीव्रतेने मांडताना विदर्भातील शिवसैनिकांना ‘पोलिटिकल पॉवर’ दिल्याशिवाय उपाय नाही, याची जाणीव ‘मातोश्री’लाही झाली आहे. विदर्भाने ज्याला साथ दिली त्यानेच मुंबईत राज्य केल्याचा इतिहास आहे. सत्तेसाठी ‘शंभर प्लस’ चे टार्गेट भेदण्यासाठी शिवसेनेला विदर्भाचा लळा लागल्याचे दिसते. मे च्या दुसºया आठवड्यात उद्धव ठाकरे नागपुरात आले. विदर्भातील तयारीचा आढावा घेतला. पाठोपाठ परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही चाकं फिरवित संपर्क वाढविला. केवळ बैठकांनी विदर्भाला जिंकणं कठीण आहे. गरज आहे ती मंत्र्यांमार्फत विदर्भातील कार्यकर्त्यांना बळ देण्याची. कारण, लढाई आहे ती विदर्भात घट्ट पाय रोवून बसलेल्या भाजपाशी. हे सेनेला विसरून चालणार नाही.

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र