शहरं
Join us  
Trending Stories
1
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
2
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
3
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
4
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
5
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
6
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
7
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
8
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
9
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
10
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
11
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
12
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
13
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
14
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
15
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
16
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
17
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
18
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या टॉप ५ महिला क्रिकेटपटू!
19
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
20
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

सेनेला विदर्भाचा लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:05 IST

मुंबईतील शिवसैनिक डरकाळी फोडताना दिसतो तर विदर्भातील शिवसैनिक ती ऐकण्यातच धन्यता मानतो.

शिवसेनेने सातत्याने ‘जय महाराष्ट्र’चा नारा बुलंद केला. पण तो करीत असताना विदर्भातील प्रश्नांकडे, तेथील जनभावनांकडे तर दुर्लक्ष केलेच पण स्वत:च्या राजकीय वारसदारांनाही फारसे झुकते माप दिले नसल्याचा इतिहास आहे. त्यामुळे मुंबईतील शिवसैनिक डरकाळी फोडताना दिसतो तर विदर्भातील शिवसैनिक ती ऐकण्यातच धन्यता मानतो. कारण या शिवसैनिकाला मुंबईतून फारसे कुरवाळले जात नाही. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करताना विदर्भाकडे मात्र सेनेचे गेल्या काळात कमालीचे दुर्लक्ष झाले, हे नाकारता येणार नाही. गेल्या चार वर्षात सेनेने विदर्भातील एकामागे एक संपर्क प्रमुख बदलले. पण एकाही प्रमुखाने कार्यकर्त्यांशी फारसा संपर्क ठेवला नाही. निवडणुकांच्या वेळी मुंबईतून सरदार येतात. तोफगर्जना करतात अन् निघून जातात. निवडणुकीची लढाई संपत येते तरी कार्यकर्त्यांना रसद मिळत नाही. नेहमीच्याच अशा अनुभवामुळे हतबल झालेला, मदतीची आस ठेवून हताश झालेला शिवसैनिक शेवटी भाजपाच्या गळाला लागला. त्याला विदर्भातील दमखम नेतत्व नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आपलेसे वाटू लागले. एकेकाळी विदर्भात शिवसेनेचा बऱ्यापैकी बोलबाला होता. प्रत्येक जिल्ह्यात आमदार होता. मात्र, आता संपूर्ण विदर्भात फक्त चार आमदारांवर शिवसेना गडप झाली आहे. लोकसभेत शिवसेनेला भाजपाची साथ होती. सेनेचे चार खासदार लोकसभेत पोहोचले. भाजपाने साथ सोडताच विधानसभा निवडणुकीत ६२ पैकी फक्त ४ जागा सेनेच्या पदरात पडल्या. स्वबळाचा नारा विदर्भात तरी सेनेच्या अंगलट आला. बहुतांश जागांवर सेनेच्या उमेदवारांनी दखलपात्र मतेही घेतली नाही. पुन्हा सेनेचा स्वबळाचा नारा कायम आहे. उलट यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धार अधिक तीक्ष्ण केली आहे. मात्र, केवळ ‘आवाज कुणाचा’च्या गर्जना करून राज्यात एकहाती सत्ता मिळविता येणार नाही, हे सेनेच्या लक्षात आले आहे. वेगळ्या विदर्भाची भूमिका तीव्रतेने मांडताना विदर्भातील शिवसैनिकांना ‘पोलिटिकल पॉवर’ दिल्याशिवाय उपाय नाही, याची जाणीव ‘मातोश्री’लाही झाली आहे. विदर्भाने ज्याला साथ दिली त्यानेच मुंबईत राज्य केल्याचा इतिहास आहे. सत्तेसाठी ‘शंभर प्लस’ चे टार्गेट भेदण्यासाठी शिवसेनेला विदर्भाचा लळा लागल्याचे दिसते. मे च्या दुसºया आठवड्यात उद्धव ठाकरे नागपुरात आले. विदर्भातील तयारीचा आढावा घेतला. पाठोपाठ परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही चाकं फिरवित संपर्क वाढविला. केवळ बैठकांनी विदर्भाला जिंकणं कठीण आहे. गरज आहे ती मंत्र्यांमार्फत विदर्भातील कार्यकर्त्यांना बळ देण्याची. कारण, लढाई आहे ती विदर्भात घट्ट पाय रोवून बसलेल्या भाजपाशी. हे सेनेला विसरून चालणार नाही.

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र