शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सेनेला विदर्भाचा लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:05 IST

मुंबईतील शिवसैनिक डरकाळी फोडताना दिसतो तर विदर्भातील शिवसैनिक ती ऐकण्यातच धन्यता मानतो.

शिवसेनेने सातत्याने ‘जय महाराष्ट्र’चा नारा बुलंद केला. पण तो करीत असताना विदर्भातील प्रश्नांकडे, तेथील जनभावनांकडे तर दुर्लक्ष केलेच पण स्वत:च्या राजकीय वारसदारांनाही फारसे झुकते माप दिले नसल्याचा इतिहास आहे. त्यामुळे मुंबईतील शिवसैनिक डरकाळी फोडताना दिसतो तर विदर्भातील शिवसैनिक ती ऐकण्यातच धन्यता मानतो. कारण या शिवसैनिकाला मुंबईतून फारसे कुरवाळले जात नाही. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करताना विदर्भाकडे मात्र सेनेचे गेल्या काळात कमालीचे दुर्लक्ष झाले, हे नाकारता येणार नाही. गेल्या चार वर्षात सेनेने विदर्भातील एकामागे एक संपर्क प्रमुख बदलले. पण एकाही प्रमुखाने कार्यकर्त्यांशी फारसा संपर्क ठेवला नाही. निवडणुकांच्या वेळी मुंबईतून सरदार येतात. तोफगर्जना करतात अन् निघून जातात. निवडणुकीची लढाई संपत येते तरी कार्यकर्त्यांना रसद मिळत नाही. नेहमीच्याच अशा अनुभवामुळे हतबल झालेला, मदतीची आस ठेवून हताश झालेला शिवसैनिक शेवटी भाजपाच्या गळाला लागला. त्याला विदर्भातील दमखम नेतत्व नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आपलेसे वाटू लागले. एकेकाळी विदर्भात शिवसेनेचा बऱ्यापैकी बोलबाला होता. प्रत्येक जिल्ह्यात आमदार होता. मात्र, आता संपूर्ण विदर्भात फक्त चार आमदारांवर शिवसेना गडप झाली आहे. लोकसभेत शिवसेनेला भाजपाची साथ होती. सेनेचे चार खासदार लोकसभेत पोहोचले. भाजपाने साथ सोडताच विधानसभा निवडणुकीत ६२ पैकी फक्त ४ जागा सेनेच्या पदरात पडल्या. स्वबळाचा नारा विदर्भात तरी सेनेच्या अंगलट आला. बहुतांश जागांवर सेनेच्या उमेदवारांनी दखलपात्र मतेही घेतली नाही. पुन्हा सेनेचा स्वबळाचा नारा कायम आहे. उलट यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धार अधिक तीक्ष्ण केली आहे. मात्र, केवळ ‘आवाज कुणाचा’च्या गर्जना करून राज्यात एकहाती सत्ता मिळविता येणार नाही, हे सेनेच्या लक्षात आले आहे. वेगळ्या विदर्भाची भूमिका तीव्रतेने मांडताना विदर्भातील शिवसैनिकांना ‘पोलिटिकल पॉवर’ दिल्याशिवाय उपाय नाही, याची जाणीव ‘मातोश्री’लाही झाली आहे. विदर्भाने ज्याला साथ दिली त्यानेच मुंबईत राज्य केल्याचा इतिहास आहे. सत्तेसाठी ‘शंभर प्लस’ चे टार्गेट भेदण्यासाठी शिवसेनेला विदर्भाचा लळा लागल्याचे दिसते. मे च्या दुसºया आठवड्यात उद्धव ठाकरे नागपुरात आले. विदर्भातील तयारीचा आढावा घेतला. पाठोपाठ परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही चाकं फिरवित संपर्क वाढविला. केवळ बैठकांनी विदर्भाला जिंकणं कठीण आहे. गरज आहे ती मंत्र्यांमार्फत विदर्भातील कार्यकर्त्यांना बळ देण्याची. कारण, लढाई आहे ती विदर्भात घट्ट पाय रोवून बसलेल्या भाजपाशी. हे सेनेला विसरून चालणार नाही.

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र