शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

स्वयंशिस्तीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 00:06 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांतातील स्वयंसेवकांचा पुणे शहरानजीक भरलेला ‘शिवशक्ती संगम’ हा मेळावा म्हणजे संघातील स्वयंशिस्तीचे दर्शन घडविणारा एक आगळा प्रयोग होता

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांतातील स्वयंसेवकांचा पुणे शहरानजीक भरलेला ‘शिवशक्ती संगम’ हा मेळावा म्हणजे संघातील स्वयंशिस्तीचे दर्शन घडविणारा एक आगळा प्रयोग होता. संघाने आपल्या शाखा विस्तारासाठी जे विभिन्न भौगोलिक भाग पाडले आहेत त्या प्रत्येक भागात असे मेळावे घेण्याची संघाची परंपरा असल्याचे सांगितले जात असले तरी ज्या पद्धतीने या संगमाची गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरु होती, ती पाहाता त्याच्या माध्यमातून आपल्या विराट सामर्थ्याचे दर्शन घडविण्याचा हेतू लपून राहिला नव्हता. सुमारे दीड लाख स्वयंसेवक या संगमात सहभागी झाले होते, यात विशेष काही नाही. कारण ते येणारच होते. पण ज्यांचा संघाशी काहीही संबंध नाही, किंबहुना ज्यांच्या मनात संघाविषयी काहीशी शंकेची वा संशयाची भावना आहे अशा लोकानीही आवर्जून उपस्थित राहावे यासाठी संघाचे पदाधिकारी विशेष प्रयत्नशील होते. मुळात या जाणिवेची दखल घेणे आणि आपल्या अंतगृहात बाहेरच्यांना प्रवेश देऊन शक्य झाले तर त्यांच्यात मतपरिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करणे हे म्हटले तर संघ आता कूस बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षण मानावे लागेल. पुणे शहराच्या विस्तारात हिंजवडी परिसर माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित विविध आस्थापनांनी गजबजलेला परिसर. तिथेच संगम घडवून आणण्यामागे त्या परिसरात कार्यरत युवकांवर संघाची मोहिनी टाकण्याचा एक प्रयत्न म्हणूनही त्याकडे बघता येईल. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचे एकट्याचे भाषण ठेऊन आणि सारे काही वेळेवर आटोपून सुनियोजनाचा जो वस्तुपाठ संघाने घालून दिला तो राजकीय पक्षांनी आणि त्यातही संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपाने आवर्जून गिरवायला हरकत नाही. कारण अलीकडच्या काळात बहुतेक राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी घडाळाशी जणू फटकून वागण्याचीच शपथ घेतली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचा हा सर्वात मोठा मेळावा. तो होण्यापूर्वी खुद्द संघातीलच काही लोकाना धडधडू लागले होते, कारण भागवत केव्हां, कुठे आणि काय बोलतील याचा म्हणे त्यांना भरवसाच वाटेनासा झाला होता. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर भागवतांनी जातीधारित आरक्षणाच्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज बोलून दाखविल्यामुळे ते राज्य भाजपाला गमवावे लागले असे भाजपाला वाटते. पण पुण्याच्या ‘संगमा’त भागवतांनी तसे कोणतेही वक्तव्य केले नाही. मूलत: संघाचा विचार लष्करी शिस्तीच्या आणि म्हणून लष्कराच्याही जवळ जाणारा असल्याने भारत जोवर आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवित नाही तोवर त्याची प्रतिष्ठा उंचावणार नाही या त्यांच्या मांडणीत नवे काही नाही. सरकार किंवा सत्ता यांना दुय्यम स्थान देऊन सामाजिक एकोप्याला त्यांनी दिलेले अधिक महत्व म्हणजे संघ ही एक केवळ सांस्कृतिक संघटना असल्याच्या मूळ भूमिकेचा पुनरुच्चार आहे. त्याचा वास्तवातील अर्थ संघ आता सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करणारा नाही असा असेल तर भाजपाला ती एक हवीहवीशी वाटणारी संगम भेटचठरु शकेल.