शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंशिस्तीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 00:06 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांतातील स्वयंसेवकांचा पुणे शहरानजीक भरलेला ‘शिवशक्ती संगम’ हा मेळावा म्हणजे संघातील स्वयंशिस्तीचे दर्शन घडविणारा एक आगळा प्रयोग होता

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांतातील स्वयंसेवकांचा पुणे शहरानजीक भरलेला ‘शिवशक्ती संगम’ हा मेळावा म्हणजे संघातील स्वयंशिस्तीचे दर्शन घडविणारा एक आगळा प्रयोग होता. संघाने आपल्या शाखा विस्तारासाठी जे विभिन्न भौगोलिक भाग पाडले आहेत त्या प्रत्येक भागात असे मेळावे घेण्याची संघाची परंपरा असल्याचे सांगितले जात असले तरी ज्या पद्धतीने या संगमाची गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरु होती, ती पाहाता त्याच्या माध्यमातून आपल्या विराट सामर्थ्याचे दर्शन घडविण्याचा हेतू लपून राहिला नव्हता. सुमारे दीड लाख स्वयंसेवक या संगमात सहभागी झाले होते, यात विशेष काही नाही. कारण ते येणारच होते. पण ज्यांचा संघाशी काहीही संबंध नाही, किंबहुना ज्यांच्या मनात संघाविषयी काहीशी शंकेची वा संशयाची भावना आहे अशा लोकानीही आवर्जून उपस्थित राहावे यासाठी संघाचे पदाधिकारी विशेष प्रयत्नशील होते. मुळात या जाणिवेची दखल घेणे आणि आपल्या अंतगृहात बाहेरच्यांना प्रवेश देऊन शक्य झाले तर त्यांच्यात मतपरिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करणे हे म्हटले तर संघ आता कूस बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षण मानावे लागेल. पुणे शहराच्या विस्तारात हिंजवडी परिसर माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित विविध आस्थापनांनी गजबजलेला परिसर. तिथेच संगम घडवून आणण्यामागे त्या परिसरात कार्यरत युवकांवर संघाची मोहिनी टाकण्याचा एक प्रयत्न म्हणूनही त्याकडे बघता येईल. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचे एकट्याचे भाषण ठेऊन आणि सारे काही वेळेवर आटोपून सुनियोजनाचा जो वस्तुपाठ संघाने घालून दिला तो राजकीय पक्षांनी आणि त्यातही संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपाने आवर्जून गिरवायला हरकत नाही. कारण अलीकडच्या काळात बहुतेक राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी घडाळाशी जणू फटकून वागण्याचीच शपथ घेतली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचा हा सर्वात मोठा मेळावा. तो होण्यापूर्वी खुद्द संघातीलच काही लोकाना धडधडू लागले होते, कारण भागवत केव्हां, कुठे आणि काय बोलतील याचा म्हणे त्यांना भरवसाच वाटेनासा झाला होता. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर भागवतांनी जातीधारित आरक्षणाच्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज बोलून दाखविल्यामुळे ते राज्य भाजपाला गमवावे लागले असे भाजपाला वाटते. पण पुण्याच्या ‘संगमा’त भागवतांनी तसे कोणतेही वक्तव्य केले नाही. मूलत: संघाचा विचार लष्करी शिस्तीच्या आणि म्हणून लष्कराच्याही जवळ जाणारा असल्याने भारत जोवर आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवित नाही तोवर त्याची प्रतिष्ठा उंचावणार नाही या त्यांच्या मांडणीत नवे काही नाही. सरकार किंवा सत्ता यांना दुय्यम स्थान देऊन सामाजिक एकोप्याला त्यांनी दिलेले अधिक महत्व म्हणजे संघ ही एक केवळ सांस्कृतिक संघटना असल्याच्या मूळ भूमिकेचा पुनरुच्चार आहे. त्याचा वास्तवातील अर्थ संघ आता सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करणारा नाही असा असेल तर भाजपाला ती एक हवीहवीशी वाटणारी संगम भेटचठरु शकेल.