शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

स्वयंशिस्तीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 00:06 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांतातील स्वयंसेवकांचा पुणे शहरानजीक भरलेला ‘शिवशक्ती संगम’ हा मेळावा म्हणजे संघातील स्वयंशिस्तीचे दर्शन घडविणारा एक आगळा प्रयोग होता

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांतातील स्वयंसेवकांचा पुणे शहरानजीक भरलेला ‘शिवशक्ती संगम’ हा मेळावा म्हणजे संघातील स्वयंशिस्तीचे दर्शन घडविणारा एक आगळा प्रयोग होता. संघाने आपल्या शाखा विस्तारासाठी जे विभिन्न भौगोलिक भाग पाडले आहेत त्या प्रत्येक भागात असे मेळावे घेण्याची संघाची परंपरा असल्याचे सांगितले जात असले तरी ज्या पद्धतीने या संगमाची गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरु होती, ती पाहाता त्याच्या माध्यमातून आपल्या विराट सामर्थ्याचे दर्शन घडविण्याचा हेतू लपून राहिला नव्हता. सुमारे दीड लाख स्वयंसेवक या संगमात सहभागी झाले होते, यात विशेष काही नाही. कारण ते येणारच होते. पण ज्यांचा संघाशी काहीही संबंध नाही, किंबहुना ज्यांच्या मनात संघाविषयी काहीशी शंकेची वा संशयाची भावना आहे अशा लोकानीही आवर्जून उपस्थित राहावे यासाठी संघाचे पदाधिकारी विशेष प्रयत्नशील होते. मुळात या जाणिवेची दखल घेणे आणि आपल्या अंतगृहात बाहेरच्यांना प्रवेश देऊन शक्य झाले तर त्यांच्यात मतपरिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करणे हे म्हटले तर संघ आता कूस बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षण मानावे लागेल. पुणे शहराच्या विस्तारात हिंजवडी परिसर माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित विविध आस्थापनांनी गजबजलेला परिसर. तिथेच संगम घडवून आणण्यामागे त्या परिसरात कार्यरत युवकांवर संघाची मोहिनी टाकण्याचा एक प्रयत्न म्हणूनही त्याकडे बघता येईल. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचे एकट्याचे भाषण ठेऊन आणि सारे काही वेळेवर आटोपून सुनियोजनाचा जो वस्तुपाठ संघाने घालून दिला तो राजकीय पक्षांनी आणि त्यातही संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपाने आवर्जून गिरवायला हरकत नाही. कारण अलीकडच्या काळात बहुतेक राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी घडाळाशी जणू फटकून वागण्याचीच शपथ घेतली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचा हा सर्वात मोठा मेळावा. तो होण्यापूर्वी खुद्द संघातीलच काही लोकाना धडधडू लागले होते, कारण भागवत केव्हां, कुठे आणि काय बोलतील याचा म्हणे त्यांना भरवसाच वाटेनासा झाला होता. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर भागवतांनी जातीधारित आरक्षणाच्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज बोलून दाखविल्यामुळे ते राज्य भाजपाला गमवावे लागले असे भाजपाला वाटते. पण पुण्याच्या ‘संगमा’त भागवतांनी तसे कोणतेही वक्तव्य केले नाही. मूलत: संघाचा विचार लष्करी शिस्तीच्या आणि म्हणून लष्कराच्याही जवळ जाणारा असल्याने भारत जोवर आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवित नाही तोवर त्याची प्रतिष्ठा उंचावणार नाही या त्यांच्या मांडणीत नवे काही नाही. सरकार किंवा सत्ता यांना दुय्यम स्थान देऊन सामाजिक एकोप्याला त्यांनी दिलेले अधिक महत्व म्हणजे संघ ही एक केवळ सांस्कृतिक संघटना असल्याच्या मूळ भूमिकेचा पुनरुच्चार आहे. त्याचा वास्तवातील अर्थ संघ आता सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करणारा नाही असा असेल तर भाजपाला ती एक हवीहवीशी वाटणारी संगम भेटचठरु शकेल.