शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

ज्येष्ठांना हवी सुरक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:53 IST

वृद्धत्वाची ही एक बाजू. ज्येष्ठ नागरिकांना साथच मिळत नाही. आर्थिकदृष्ट्या परावलंबी असणा-यांची दु:खे वेगळीच; पण आर्थिक पातळीवर चांगली परिस्थिती असूनही ही साथ मिळतेच, असे नाही. अगदी पैसे देऊन ‘केअरटेकर’ म्हणजे वैयक्तिक सहायक नेमला तरी तो जिवावर उठू शकतो.

सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे,उन्हामधल्या म्हाताºयाला फक्त तुझा हात दे !वृद्धत्वाची ही एक बाजू. ज्येष्ठ नागरिकांना साथच मिळत नाही. आर्थिकदृष्ट्या परावलंबी असणा-यांची दु:खे वेगळीच; पण आर्थिक पातळीवर चांगली परिस्थिती असूनही ही साथ मिळतेच, असे नाही. अगदी पैसे देऊन ‘केअरटेकर’ म्हणजे वैयक्तिक सहायक नेमला तरी तो जिवावर उठू शकतो. पुण्यातील दीपाली कोल्हटकर यांच्या भीषण खुनाच्या प्रकारातून ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आला आहे. हा केवळ एकच प्रकार नाही. मुंबईतही ज्येष्ठांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्याची राजधानी ज्येष्ठांसाठी असुरक्षित बनली आहे; असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. संपूर्ण राज्यात गेल्या काही वर्षांत एकाकी वृद्धांच्या खुनाच्या घटनांतही वाढ होत आहे. बहुतांश वेळा घरातील नोकरांकडून असे प्रकार होतात. मुंबई-पुण्यासारख्या शहरांत या घटनांचे प्रमाण मोठे आहे. राष्टÑीय गुन्हे अहवालातही याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वैद्यकीय उपचारांच्या सुविधा आणि चांगले जीवनमान यामुळे देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. अनेक जण आर्थिक प्रश्नांमुळे जर्जर झालेले आहेत. पण, ज्यांनी आयुष्याचे व्यवस्थित नियोजन केले, मुलांनीही माता-पित्यांना वाºयावर सोडले नाही अशांचेही प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत. राज्यात ज्येष्ठ नागरिकांचे धोरणच तयार नाही. यामध्ये ज्येष्ठांना विविध सुविधा पुरविण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेची हमीही देण्याचे प्रस्तावित आहे. यातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शहरांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांना एकटे राहावे लागते. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना नोकर किंवा परिचारिकांची सेवा घेता येते. परंतु, शॉप अ‍ॅक्टच्या एका परवान्यावर सुरू होणाºया या संस्थांची माहिती पोलिसांनी संकलित करणे आवश्यक आहे. आमदार डॉ. नीलम गोºहे यांनी याबाबत विधान परिषदेत लक्षवेधी मांडली होती. त्यानंतर प्रत्येक शहरातील पोलीस आयुक्तालयात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात आला. सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अखत्यारीत हा विषय आहे. परंतु, या मंत्रालयाला ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही. वृद्धाश्रम या कल्पनेकडे वाईट अर्थाने पाहिले जाते; परंतु चौकोनी कुटुंबांमुळे ते आता गरजेचे आहेत. किमान सुरक्षितता तेथे लाभते. मात्र, शासनाने चार वर्षांपासून वृद्धाश्रमांचे अनुदान बंद केले आहे. भविष्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढणार आहे. वैद्यकीय, निवास यासारख्या आर्थिक पातळीवरील सुविधांचा विचार करताना सुरक्षिततेचा मुद्दा डोळ्यांआड करून चालणार नाही. यासाठी केवळ शासनानेच नव्हे, तर समाजानेही पुढाकार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र