शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

पत्रकारांच्या सुरक्षेचा ‘बंदोबस्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:27 IST

​​​​​​​लखनौमध्ये आबिद अली या पत्रकारावर टोळक्याने हल्ला केला, तेव्हा त्याची पत्नी घरातून रिव्हॉल्व्हर घेऊन बाहेर आली आणि तिने हल्लेखोरांवर चक्क गोळीबार केला.

- संदीप प्रधानलखनौमध्ये आबिद अली या पत्रकारावर टोळक्याने हल्ला केला, तेव्हा त्याची पत्नी घरातून रिव्हॉल्व्हर घेऊन बाहेर आली आणि तिने हल्लेखोरांवर चक्क गोळीबार केला... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाटोडीवर आडवा हात मारत ही दृश्ये पाहिली. लागलीच त्यांनी आपल्या स्वीय सहायकांना फोन लावला आणि तातडीने पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या मंडळींची बैठक बोलावण्याचे फर्मान सोडले. रात्री-अपरात्री पेंगुळलेल्या समितीच्या प्रतिनिधींना रामप्रहरीच्या बैठकीचे निरोप गेले. सकाळी डोळे चोळत मंडळी बैठकीच्या दालनात दाखल झाली. पत्रकारांवरील हल्ल्याचा विषय काढला, तरी छान तोंडभरून हसत सरकारीछापाचे उत्तर देणारे फडणवीस अचानक स्वत:हून बैठकीला कसे तयार झाले, या कल्पनेने अस्वस्थ झालेल्या काही समिती सदस्यांनी तो नारायण आज पश्चिमेकडे, तर उगवला नाही ना? या कल्पनेनं दोन-पाच वेळा पश्चिमेकडं न्याहाळलं. एक-दोघा सदस्यांनी बैठकीच्या दालनात परस्परांना कडकडून चिमटे काढून पाहिले, पण हे स्वप्न नव्हते. तेवढ्यात, मुख्यमंत्री फडणवीस दाखल झाले. पत्रकार मित्रांनो, तुमच्यावरील हल्ल्याच्या घटना रोखण्याकरिता कठोर कायदा करण्याचा आपला इरादा पक्का आहेच. मात्र, यापूर्वी डॉक्टरांवरील हल्ले रोखण्याचा कायदा करून फारसे हाती लागलेले नाही. त्यामुळे सरकारने एक जालीम उपाय योजण्याचे ठरवले आहे. मला सर्व पत्रकारांच्या पत्नींची नावे व फोन नंबर हवे आहेत. या भाऊरायाची भाऊबीज दिवाळीपूर्वी अ‍ॅडव्हान्स घरपोच होईल. मात्र, ती भेट केवळ त्याच बाळगू शकतील. एवढे बोलून फडणवीस निघून गेले. समितीचे सदस्य उघड्या तोंडाचा चंबू करून बसले. अवघ्या दोनच दिवसांत सर्व पत्रकारांच्या घरी बंद खोके पोहोचले. अर्थात, ते पत्रकारांच्या पत्नीच्याच हाती सोपवले गेले. आईच्या नावे चक्क मुख्यमंत्र्यांकडून आलेली ही गिफ्ट उघडून पाहायला पोरंबाळं उतावीळ झाली. मात्र, जेव्हा खोक्यातून बाहेर आलेले घोडे बायकोने पत्रकार नवरोजींवर रोखलेले पाहिले, तेव्हा अनेकांची दातखीळ बसली. काहींचा रक्तदाब वाढला, तर काहींनी कानाला जानवी गुंडाळत पळ काढला. पत्रकार घरातून बाहेर पडताना ‘सौ’ने भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असे म्हटले तरी कार्यालय गाठेपर्यंत बहुतांश पत्रकार दहावेळा मागं वळून पाहू लागले. सुटीच्या दिवशी काही पत्रकारांवर आपल्या चिरंजीवांसोबत चोर-पोलीस खेळण्याची आफत ओढवली. चोर झाल्यानं हॅण्ड्सअप केलेल्या पत्रकारांचे पाय लटपटा कापू लागायचे, तर तिकडं माझं गुणाचं गं पोरं अगदी सीआयडीमधल्या दयासारखं दिसतंय, असं म्हणत सौ पोराचे पापे घेत असायच्या. रात्री काम संपल्यावर रेंगाळणाºया पत्रकारांना ‘वेळेवर येताय ना घरी’ हे पत्नीचे उद्गार गब्बरसिंगच्या ‘अब गोली खा’, ऐकू येऊ लागले. एक-दोघा पत्रकारांच्या बायकोने जेम्स बॉण्डसारखा हातात रिव्हॉल्व्हर घेतलेला डीपी ठेवल्याने त्यांचे चेहरे ‘स्कायफॉल’ अर्थात आभाळ कोसळल्यासारखे झाले होते. पत्रकारांच्या घरात ‘सामान’ (हा गँगमधील शब्द) असल्याची वार्ता सर्वदूर पसरल्यावर एक दिवस सर्व घोडे गोळा करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला पत्रकार गेले, तेव्हा ते हुबेहूब खºयासारखे दिसणारे खेळण्यातील घोडे होते, हा उलगडा झाला...