शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विखारी प्रचार...

By admin | Updated: October 8, 2014 05:06 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार मोहिमेला उद्धव ठाकरे यांनी ‘अफझलखानाची स्वारी’ म्हटले असेल तर सख्खे भाऊच एकमेकांचे सख्खे वैरी होऊ शकतात हे वचन नव्याने खरे ठरणार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार मोहिमेला उद्धव ठाकरे यांनी ‘अफझलखानाची स्वारी’ म्हटले असेल तर सख्खे भाऊच एकमेकांचे सख्खे वैरी होऊ शकतात हे वचन नव्याने खरे ठरणार आहे. शिवसेना आणि भाजपा यांची मैत्री २५ वर्षांची जुनी आणि मुरलेली आहे. वाजपेयी, अडवाणी, महाजन व मुंडे हे भाजपाचे आणि बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी व स्वत: उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे नेते तिचे शिल्पकार आहेत. ‘हिंदुत्व हा आमच्या स्नेहाचा धागा आहे आणि त्याने आमच्यात ऐक्य घडविले आहे’ असेच दोन्ही बाजूंनी गेली दोन तपे महाराष्ट्राला व देशाला ऐकविले आहे. आता महाजन-मुंडे नाहीत, अडवाणी अडगळीत तर वाजपेयी निकामी आहेत. तिकडे बाळासाहेब काळाच्या पडद्याआड तर मनोहर जोशी अधिकारविहीन आहेत. आताची ‘मुठभेड’ उद्धव आणि मोदी यांच्यातील आहे. मोदींच्या जागी दुसऱ्या कोणत्याही प्रादेशिक नेत्याचे नाव येथे मुद्दामच घेतले नाही. कारण उद्धव ठाकऱ्यांची सेना प्रादेशिक असली तरी ते स्वत:ला राष्ट्रीय नेते समजतात आणि बाळासाहेबांच्या पश्चात हिंदुहृदयांचे सम्राटपण वंशपरंपरेने आपल्याकडे आले आहे असे मानतात. त्याचमुळे भाजपाचे काही दुय्यम दर्जाचे राष्ट्रीय पुढारी शिवसेनेशी चर्चा करायला मुंबईत आले तेव्हा त्यांच्याशी बोलणी करायला स्वत: न जाता उद्धवरावांनी आपले चिरंजीव आदित्य ठाकरे यांना पाठवून त्या पुढाऱ्यांना त्यांचा व आपलाही दर्जा दाखवून दिला. ते असे ‘राष्ट्रीय’ झाल्याने गडकरी-फडणवीस-खडसे किंवा तावडे यांची दखल घेणे त्यांना कमीपणाचे वाटत असणार. त्याचमुळे त्यांनी थेट मोदींवर निशाणा साधून त्यांना अफझलखान म्हटले असणार. मोदींना अफझलखान ठरविले की ते स्वत:ला शिवराय समजत असतील हे ओघानेच येणारे आहे. निवडणूक प्रचारात उतरताना कोणी कोणत्या पातळीपर्यंत खाली जायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. अफझलखान हा दिल्लीहून आला नव्हता. त्याचा गुजरातशीही संबंध नव्हता. तो कर्नाटकातल्या विजापूर दरबारातला एक प्रमुख सरदार होता. शिवाजीचा बंदोबस्त करण्याच्या कामगिरीवर विजापूरच्या बेगमेने त्याची नियुक्ती केली होती. तो प्रतापगडावर राजांना भेटायला आला तेव्हा त्याचा हेतू शुद्ध नव्हता. राजांना मारण्याच्या वा पकडून नेण्याच्या इराद्यानेच तो तेथवर पोहचला होता. शिवरायांनी अत्यंत चतुराईने व चपळाईने त्याच्या पोटात वाघनखे खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढला व त्याचा मुलगा फाजलखान याला पळवून लावून त्याचा पन्हाळ््यापर्यंत पाठलाग केला होता. उद्धव ठाकरे मोदींना अफझलखान म्हणतात तेव्हा त्यांनाही हा इतिहास पाठच असणार. मोदींनाही तो ठाऊक असणार. कालचा मित्र आजचा शत्रू झाला म्हणजे तो कुठवर पोहचतो याची मोदींसकट भाजपाच्या सगळ््या नेत्यांना चांगली कल्पना आली असणार. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत यांच्यातील हेवेदावे चालतील व नंतर ते पुन्हा एकत्र येतील असा भाबडा आशावाद मनाशी बाळगून असलेल्या युतीच्या सहानुभूतीदारांनी यातून बरेच काही शिकावे. जी भाषा ठाकरे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसाठी वापरत नाहीत ती ते मोदी व भाजपासाठी वापरत आहेत हे भविष्यातल्या स्नेहाचे लक्षण नसून सख्ख्या दुष्मनीचे चिन्ह आहे. बाळासाहेब ठाकरे हे एक थोर व्यंगचित्रकार होते. त्यांची चित्रे त्यांच्या टीकाविषयाचा कोथळा बाहेर काढणारीच असत. पण मोदींना अफझलखान किंवा भाजपाला विजापूरच्या बादशाहीची सेना समजणे त्यांच्याही मनात कधी आले नसणार. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या पुढे जाणारे की मागे थांबणारे हे यातून आपल्यालाही समजावे. असो, मोदींना त्यांनी अफझलखान म्हटले काय किंवा शाहिस्तेखान म्हटले काय, हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेला तो नेता महाराष्ट्रात यायचा काही थांबायचा नाही आणि तो तसा येत राहिल्याने सेनेचे सत्तेचे स्वप्नही तिच्याजवळ यायचे नाही. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेला जवळचा वाटेल असा एकही पक्ष उद्धव ठाकरे यांच्या या भाषेने आता उरला नाही हेही यावेळी लक्षात यावे. रामदास आठवले दूर गेले आहेत, जानकर-शेट्टी आणि मेटे जवळ राहिले नाहीत, भाजपाला अफझलखानाची सेना म्हणून ठाकऱ्यांनी थेट शत्रुत्वाच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे. या स्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष व काही अपक्ष उरणार आहेत. यातील कोणत्याही पक्षाशी शिवसेनेची नवी युती होणार नाही हे उघड आहे आणि सेनेला सत्तेजवळ नेऊ शकतील एवढे अपक्षही नव्या विधानसभेत असण्याची शक्यता कमी आहे. काही का असेना, या निमित्ताने आपण ज्यांना आपले पुढारी म्हणतो ती माणसे कोणत्या पातळीवरची आहेत एवढे जरी जनतेला समजले तरी तो या वादावादीचा एक लाभच मानला पाहिजे.