शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
4
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
5
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
6
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
7
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
8
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
9
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
10
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
11
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
12
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
13
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
14
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
15
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
16
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
17
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
18
Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!
19
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
20
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?

वावटळीत उडाली योजना

By admin | Updated: July 13, 2016 02:23 IST

खाजगी कंपनी आणि लोकसहभागातून सुरु झालेला औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्याचा देशातील पहिला प्रयोग अखेर अकाळी संपुष्टात आला

खाजगी कंपनी आणि लोकसहभागातून सुरु झालेला औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्याचा देशातील पहिला प्रयोग अखेर अकाळी संपुष्टात आला. पाण्याच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी जनआंदोलन उभे करण्याचाही प्रयत्न झाला. या आंदोलनाच्या टेकूचा आधार घेत भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम यांनी एकत्र येत शिवसेनेला आपल्यामागे फरपटत आणून हा करार रद्द करण्यास भाग पाडले. आता शहराचा पाणीपुरवठा पुन्हा महापालिकेकडे येण्याचा मार्ग खुला झाला आहे. औरंगाबाद वॉटर युटिलिटी ऊर्फ समांतर ही कंपनी कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारीत आहे.पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) ही कल्पना पाणी पुरवठ्याच्या खाजगीकरणासाठी देशात प्रथमच औरंगाबादला अस्तित्वात आली. २००७ साली या कामासाठी केंद्र सरकारने ३५० कोटी रुपये मंजूर केले. योजना महत्त्वाकांक्षी असल्याने ती यशस्वी झाली तर देशात इतरत्र ती राबविण्याचा केंद्राचा इरादा होता. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना शिवसेनेची सत्ता असणाऱ्या महापालिकेला एवढा मोठा निधी मिळाला; पण महापालिकेनेही हा निधी मिळविण्यासाठी तेवढेच श्रम घेतले होते. तज्ज्ञांची समिती नेमून २०४६ सालापर्यंत शहराची पाण्याची गरज कशी वाढत जाणार, लोकसंख्येची वाढ, शहराचा होणारा विस्तार आदी सर्व मुद्दे अभ्यासून अहवाल तयार केला. आज असा भविष्याचा वेध घेणारा अहवाल देशात कोणत्याच महानगरपालिकेकडे नाही, ही कौतुकाची बाब आहे.या योजनेला केंद्राची मंजुरी मिळेपर्यंत सारे काही सुरळीत होते. जेव्हा कंत्राटदार नेमण्याची वेळ आली त्यावेळी साडेतीनशे कोटीच्या लोण्याच्या गोळ्याकडे सर्वांचे लक्ष गेले आणि पतंगबाजी सुरू झाली. या काटाकाटीत कंत्राटदार नेमण्यात तीन वर्षे विलंब झाला. यात अनेकांचे हितसंबंध आडवे आले. केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारने मंजूर केलेल्या योजनेला सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) आणि कल्याण काळे (काँग्रेस) या महाराष्ट्रातील तत्कालीन आमदारांनी विधिमंडळात केलेला विरोध अनाकलनीय होता. योजना जनकल्याणाची नाही असा विरोधकांचा आक्षेप आहे. यातून काही प्रश्न निर्माण होतात. खुद्द मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असता, त्या चौकशीचा अहवाल येण्यापूर्वीच कंत्राट रद्द करण्याची घाई भाजपा आणि इतर पक्षांना का झाली? कंत्राट तर रद्द केले; पण या योजनेत पाणीपुरवठ्याची जी पायाभूत सेवा उभी राहणार होती तिचे काय? केंद्र सरकारने निधी काढून घेतला तर आर्थिक गणित कसे जुळविणार? कारण पालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. करार रद्द करण्यापूर्वी कंपनीचे काम, कार्यपद्धती याच्या विरोधात लवाद किंवा न्यायालयात जाण्याचा मार्ग का स्वीकारला गेला नाही? कंपनीचे काम प्रारंभीपासून समाधानकारक नव्हते. तिने पाईपलाईन टाकणे, जलकुंभाची उभारणी करणे, याचे वेळापत्रक पाळले नाही. पाणीपट्टीत अव्वाच्या सव्वा वाढ केली आणि सेवाही विस्कळीत होती. त्यामुळे एवढा मोठा प्रकल्प सांभाळण्यात ही कंपनी सक्षम आहे का, हाच प्रश्न निर्माण झाला होता.दोन महिन्यांपूर्वी महापालिकेचे आयुक्त म्हणून बकोरिया आले आणि आल्याबरोबर त्यांनी पहिले हे काम उरकले. करार रद्द होण्यामागे भाजपा-शिवसेनेतील राजकारण आहे. त्यात ही योजना खासदार चंंद्रकांत खैरेंनी आणली, त्यामुळे एका दगडात दोन पक्षी बकोरियांच्या हातून मारण्याची भाजपाची खेळी यशस्वी झाली. योजनेला विरोध करणारे आंदोलक, नगरसेवक यापैकी एकानेही ‘समांतर’ गेल्यानंतर काय, याचा पर्याय दिलेला नाही आणि कोणाजवळही तो नाही. कंपनीशी केलेला ४०० पानांचा कराररद्द करण्यापूर्वी किती नगरसेवकांनी त्याचा अभ्यास केला? हे सगळे प्रश्न उत्तर न मिळणारे असतात. राजकारणातील वाऱ्याला कोणतीच दिशा नसते. या वाऱ्याच्या वावटळीत अशा अनेक योजना उडून जातात.- सुधीर महाजन