शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

देवा तू तरी सांग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:56 IST

देव देव्हाऱ्यात ठेवण्यापेक्षा मनात भाव असला तरी पावतो. मनी नाही भाव तरी देवा मला पाव, असा अट्टाहास करणा-यांना देव कधीच पावत नसतो !

देव देव्हाऱ्यात ठेवण्यापेक्षा मनात भाव असला तरी पावतो. मनी नाही भाव तरी देवा मला पाव, असा अट्टाहास करणा-यांना देव कधीच पावत नसतो ! मुळात विज्ञानयुगात ‘देव’ यावर चर्चा न केलेलीच बरी. मात्र देशात स्मार्ट सिटीच्या कामात नंबर वन असलेल्या नागपुरात अनधिकृत धार्मिक अतिक्रमणामुळे महापालिका आयुक्त आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतींना त्यांचे देव पाण्यात ठेवण्याची वेळ आली आहे ! महापालिका आणि सुधार प्रन्यास या दोन्ही यंत्रणा अनधिकृत धार्मिक अतिक्रमणे हटविण्यात अपयशी ठरल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या संस्थांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत या दोन्ही संस्थांच्या प्रमुखांना न्यायासनापुढे उभे केले. अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भात या संस्थांना तंबी देत कारवाईचा अ‍ॅक्शन प्लॅन सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार महापालिका क्षेत्रात २९ सप्टेंबर २००९ पूर्वीची १५२१ अनधिकृत धार्मिकस्थळे होती. सर्वेक्षणानंतर त्यापैकी १८ धार्मिक स्थळांना ‘अ’ गटात तर, १५०३ धार्मिकस्थळांना ‘ब’ गटात टाकण्यात आले. ‘अ’ गटातील धार्मिक स्थळे नियमित केली जाणार आहेत. आतापर्यंत ‘ब’ गटातील केवळ ५४ धार्मिकस्थळे तोडण्यात आली आहेत. १ मे १९६० पूर्वी बांधण्यात आलेली ‘ब’ गटामधील अनधिकृत धार्मिक स्थळे तोडण्यासाठी राज्यस्तरीय समितीची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे ‘ब’ गटामधील ११५ धार्मिकस्थळे पाडण्याची परवानगी मिळण्यासाठी २१ एप्रिल २०१८ रोजी राज्यस्तरीय समितीला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. २९ सप्टेंबर २००९ नंतरची ५५ अनधिकृत धार्मिकस्थळे असून त्यापैकी ५१ धार्मिकस्थळे आतापर्यंत तोडण्यात आली आहेत. सुधार प्रन्यासच्या हद्दीत २७५ अनधिकृत धार्मिकस्थळे आहे. मुळात समाजसुधारकांची थोर परंपरा असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात धार्मिकस्थळांच्या अतिक्रमणाच्या मुद्यावर न्यायालयाला वेळ वाया घालवावा लागतो, ही निश्चितच चिंतनाची बाब आहे. उच्च न्यायालयाने यापूर्वी अनधिकृत धार्मिकस्थळे आणि त्यांच्या अतिक्रमणासंदर्भात राज्य सरकारला ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तरी प्रशासकीय यंत्रणा राजकीय आणि धार्मिक दबावापोटी यासंदर्भात कारवाई करताना हात आखडता घेताना दिसून येतात. मुळात शहरांचा विकास करायचा असल्यास अतिक्रमणे हटविणे आवश्यकच आहे. मग ते कोणतेही असो. आजच्या ‘समाज’सुधारकांना मात्र पुरोगामी विचारसरणीचा विसर पडलेला दिसतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नव्या युगाचा मंत्र देताना ‘साधन अब बदलाना होगा. घर घर यही गाना होगा. एक जमाना था, जपतप का, यज्ञयागतिरथका अब तो श्रम देकर ग्रामोंको, ठीक बनाना होगा.’ हे कधीच सांगितले आहे. तरीही आम्ही धार्मिक स्थळाच्या अतिक्रमणाच्या मुद्यावर थांबलो आहे. त्यामुळे न्यायदेवतेवर ‘देवा आता तू तरी सांग’ यांना हे म्हणण्याची निश्चितच वेळ आली आहे.