शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देवा तू तरी सांग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:56 IST

देव देव्हाऱ्यात ठेवण्यापेक्षा मनात भाव असला तरी पावतो. मनी नाही भाव तरी देवा मला पाव, असा अट्टाहास करणा-यांना देव कधीच पावत नसतो !

देव देव्हाऱ्यात ठेवण्यापेक्षा मनात भाव असला तरी पावतो. मनी नाही भाव तरी देवा मला पाव, असा अट्टाहास करणा-यांना देव कधीच पावत नसतो ! मुळात विज्ञानयुगात ‘देव’ यावर चर्चा न केलेलीच बरी. मात्र देशात स्मार्ट सिटीच्या कामात नंबर वन असलेल्या नागपुरात अनधिकृत धार्मिक अतिक्रमणामुळे महापालिका आयुक्त आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतींना त्यांचे देव पाण्यात ठेवण्याची वेळ आली आहे ! महापालिका आणि सुधार प्रन्यास या दोन्ही यंत्रणा अनधिकृत धार्मिक अतिक्रमणे हटविण्यात अपयशी ठरल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या संस्थांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत या दोन्ही संस्थांच्या प्रमुखांना न्यायासनापुढे उभे केले. अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भात या संस्थांना तंबी देत कारवाईचा अ‍ॅक्शन प्लॅन सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार महापालिका क्षेत्रात २९ सप्टेंबर २००९ पूर्वीची १५२१ अनधिकृत धार्मिकस्थळे होती. सर्वेक्षणानंतर त्यापैकी १८ धार्मिक स्थळांना ‘अ’ गटात तर, १५०३ धार्मिकस्थळांना ‘ब’ गटात टाकण्यात आले. ‘अ’ गटातील धार्मिक स्थळे नियमित केली जाणार आहेत. आतापर्यंत ‘ब’ गटातील केवळ ५४ धार्मिकस्थळे तोडण्यात आली आहेत. १ मे १९६० पूर्वी बांधण्यात आलेली ‘ब’ गटामधील अनधिकृत धार्मिक स्थळे तोडण्यासाठी राज्यस्तरीय समितीची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे ‘ब’ गटामधील ११५ धार्मिकस्थळे पाडण्याची परवानगी मिळण्यासाठी २१ एप्रिल २०१८ रोजी राज्यस्तरीय समितीला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. २९ सप्टेंबर २००९ नंतरची ५५ अनधिकृत धार्मिकस्थळे असून त्यापैकी ५१ धार्मिकस्थळे आतापर्यंत तोडण्यात आली आहेत. सुधार प्रन्यासच्या हद्दीत २७५ अनधिकृत धार्मिकस्थळे आहे. मुळात समाजसुधारकांची थोर परंपरा असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात धार्मिकस्थळांच्या अतिक्रमणाच्या मुद्यावर न्यायालयाला वेळ वाया घालवावा लागतो, ही निश्चितच चिंतनाची बाब आहे. उच्च न्यायालयाने यापूर्वी अनधिकृत धार्मिकस्थळे आणि त्यांच्या अतिक्रमणासंदर्भात राज्य सरकारला ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तरी प्रशासकीय यंत्रणा राजकीय आणि धार्मिक दबावापोटी यासंदर्भात कारवाई करताना हात आखडता घेताना दिसून येतात. मुळात शहरांचा विकास करायचा असल्यास अतिक्रमणे हटविणे आवश्यकच आहे. मग ते कोणतेही असो. आजच्या ‘समाज’सुधारकांना मात्र पुरोगामी विचारसरणीचा विसर पडलेला दिसतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नव्या युगाचा मंत्र देताना ‘साधन अब बदलाना होगा. घर घर यही गाना होगा. एक जमाना था, जपतप का, यज्ञयागतिरथका अब तो श्रम देकर ग्रामोंको, ठीक बनाना होगा.’ हे कधीच सांगितले आहे. तरीही आम्ही धार्मिक स्थळाच्या अतिक्रमणाच्या मुद्यावर थांबलो आहे. त्यामुळे न्यायदेवतेवर ‘देवा आता तू तरी सांग’ यांना हे म्हणण्याची निश्चितच वेळ आली आहे.