शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

बोल खरे,पण नाही बरे!

By admin | Updated: December 29, 2014 23:39 IST

जेव्हा केव्हा शेतकऱ्यांच्या शिरावरील कर्जाचा डोंगर उतरविण्याच्या आवश्यकतेवर चर्चा सुरु होते, तेव्हा तेव्हा देशभरात आस्ती पक्ष आणि नास्ती पक्ष यांच्यात वितंडवाद सुरू होतो.

जेव्हा केव्हा शेतकऱ्यांच्या शिरावरील कर्जाचा डोंगर उतरविण्याच्या आवश्यकतेवर चर्चा सुरु होते, तेव्हा तेव्हा देशभरात आस्ती पक्ष आणि नास्ती पक्ष यांच्यात वितंडवाद सुरू होतो. अशा कर्जमाफीच्या समर्थनातील आस्ती पक्ष हमखास उद्योगांना दिलेल्या आणि थकलेल्या कर्जाचा उल्लेख करतो आणि त्यांच्या तुलनेत शेतकऱ्यांना कर्जमाफी किती निकडीची आहे, याचे समर्थन करू लागतो. प्रत्येक वेळी ही चर्चा अभिनिवेशानेच केली जाते आणि साहजिकच मग अशा वेळी अर्थकारण बाजूला पडते. ‘चांगले राजकारण हे वाईट अर्थकारण, तर चांगले अर्थकारण हे वाईट राजकारण असते,’ अशा अर्थाचे एक इंग्रजी वचन आहे. त्याचा या संदर्भात अगदी पुरेपूर प्रत्यय येतो. सामान्यत: जेव्हा कोणत्याही आणि विशेषत: लोकसभा वा विधानसभांच्या निवडणुका दृष्टिपथात असतात, तेव्हा राजकीय पक्षांना अचानक शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव होते व या जाणिवेतूनच मग संपूर्र्ण कृषी कर्जमाफ करणे वा गेला बाजार कर्जावरील व्याज माफ करण्याच्या घोषणा सत्ताधारी, तसेच सत्तेच्छुक अशा दोन्ही पक्षांकडून केल्या जातात. काहीअंशी या घोषणा सत्यातदेखील उतरतात. पण त्यातून नेमके काय साध्य होते, शेतकरी खरोखरीच व्याधीमुक्त होतो अथवा नाही, याचा सोक्षमोक्ष कुणी लावीत नाही. आता नेमके तेच काम रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे. कृषी कर्जमाफीची योजना पूर्णपणे निष्प्रभ ठरल्याचे नि:संदिग्ध विधान त्यांनी केले असून ते करतानाच, कर्जमाफीच्या निर्णयांचा कृषी पतपुरवठ्यावर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाल्याचे निदानही त्यांनी केले आहे. अर्थात, हे विधान देशातील सर्वोच्च बँकेच्या सर्वोच्च अधिकाऱ्याने आणि तेही अभ्यासांती केलेले असल्याने या विधानाला भले कोणाचा कितीही विरोध होणारा असला, तरी विद्यमान सरकारला ते गांभीर्याने घ्यावेच लागेल. अर्थात, होणारा विरोध पुन्हा राजकीयच असेल, यात शंका नाही. इतकेच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील बनलेला आत्महत्यांचा प्रश्न त्यांच्या शिरावरील कर्जाशी आणि बँकिंग प्रणालीशी कितपत निगडित आहे, याचादेखील स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची गरज राजन यांनी बोलून दाखविली आहे. अर्थात, रघुराम राजन म्हणतात म्हणून कदाचित हे सारे गांभीर्याने घेतले जाणारे असले, तरी जे लोक वास्तवाशी निगडित आहेत, त्यांची मते विचारात घेतली, तर राजन यांनी नवे काहीच सांगितलेले नाही, असेच त्यातून समोर येऊ शकेल. केवळ कृषी कर्जाच्याच बाबतीत नव्हे, तर शेतकऱ्यांसाठीच्या बव्हंशी योजनांबाबत असा अनुभव येत असतो, की या योजनांचे सरकारला अपेक्षित असलेले संभाव्य लाभार्थी तसेच कोरडे राहतात आणि राज्यकर्त्यांशी ज्यांचे लागेबांधे आहेत, असेच लोक सारे फायदे गिळंकृत करून मोकळे होतात. पुन्हा प्रत्येक वेळी त्यांचाच आवाज मोठा असतो. जागतिक अर्थकारणात नावाजलेले अर्थतज्ज्ञ आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग जेव्हा पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री झाले तेव्हा त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभी इंग्रजीतून जे एक विधान केले होते, ते विधान त्यांच्या कारकिर्दीची दिशा दाखवून देणारे होते. आता यापुढे अन्नछत्रे चालविली जाणार नाहीत, अशा अर्थाच्या त्या विधानाद्वारे त्यांनी सरसकट कर्जमाफी आणि विविध प्रकारची अनुदाने यांच्या दिशेने आपला रोख व्यक्त केला होता. ते करतानाच ग्रामीण विभागातील कर्जवितरणाची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचेही त्यांनी सांगितले होते व त्यासाठी एक योजनाबद्ध आराखडाही जाहीर केला होता. पण, केवळ अर्थमंत्रिपदाच्या काळातच नव्हे, तर त्यानंतर पंतप्रधानकीच्या काळातदेखील त्यांना चांगल्या अर्थकारणाची नव्हे, तर चांगल्या राजकारणाचीच कास धरणे भाग पडले होते. पण हे केवळ त्यांच्याच काळात झाले असे नव्हे. त्यांच्या आधीच्या काळातही तेच झाले आणि कदाचित यापुढील काळातही तसेच होत राहील. पण, देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने असे होत राहणे इष्ट नाही, हे स्पष्टपणे सांगणे आणि शासनकर्त्यांना जागे करणे, इतकाच रघुराम राजन यांचा यामागील हेतू आहे वा असला पाहिजे. एका वेगळ्या अर्थाने राजन यांनी कृषी कर्जमाफीचा फुगा फोडण्याचा प्रयत्न केला आहे, असेही म्हणता येईल. साहजिकच त्यांनी नोंदविलेली निरीक्षणे व केलेले रोगनिदान त्याच भावनेने आणि भूमिकेने स्वीकारले गेले पाहिजे. पण तसे होईलच, याची खात्री देता येत नाही. रिझर्व्ह बँक आणि तिचे गव्हर्नर सरळसरळ शेतकरी विरोधक आहेत, असा निष्कर्ष काढून त्यांच्यावरच टीकेचा भडिमार केला जाऊ शकेल. कारण जे विषय शुद्ध अर्थकारणाशी आणि पर्यायाने देशहिताशी संबंधित आहेत, त्यांच्या बाबतीत तरी राजकारण करू नका, हे आवाहन आजवर एकाही राजकीय पक्षाने गांभीर्याने घेतलेले नसल्याने या वेळी ते गांभीर्य दर्शविले जाईल, अशी आशा कशाच्या जोरावर बाळगणार?