शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, दहा पोरे जन्माला घाला!

By admin | Updated: December 28, 2016 02:56 IST

विश्व हिंदू परिषदेच्या प्रवीण तोगडियांना प्रत्येक हिंदू कुटुंबात किमान ४ मुले जन्माला यायला हवी आहेत. रा.स्व.संघाचे माजी सरसंघचालक कुप्प.सी. सुदर्शन यांना ५ मुले जन्माला येणे

विश्व हिंदू परिषदेच्या प्रवीण तोगडियांना प्रत्येक हिंदू कुटुंबात किमान ४ मुले जन्माला यायला हवी आहेत. रा.स्व.संघाचे माजी सरसंघचालक कुप्प.सी. सुदर्शन यांना ५ मुले जन्माला येणे आवश्यक वाटत होते. तर आताच्या ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांना त्यात दुपटीची भर घालून ‘प्रत्येक हिंदू स्त्रीने दहा मुलांना (मुली नकोत) जन्म देणे गरजेचे वाटत आहे’ नागपूर या संघाच्या राजधानीत भरलेल्या धर्मसंस्कृती महाकुंभाचा समारोप करताना या वासुदेवानंदांनी साऱ्या हिंदूंना व विशेषत: त्यातील स्त्रियांना हा धर्मादेश ऐेकवला आहे. धर्माचा हा आदेश शिरोधार्ह मानून हिंदू महिलांनी तो पूर्ण करण्यासाठी उत्साहाने पुढे आले पाहिजे असे ते म्हणाले नाहीत, एवढेच. ‘हम दो हमारे दो हे सरकारी आवाहन हिंदूविरोधी आहे. ते हिंदूंची देशातील संख्या कमी करणारे आहे, सबब त्याकडे दुर्लक्ष करा व दहा पोरे जन्माला घाला’ असे या ब्रह्मचाऱ्याचे सांगणे आहे. आठव्या शतकात झालेल्या श्रीमद् आद्य शंकराचार्यांच्या पदाची उंची आणि महती त्यांच्या पश्चात जी घसरत गेली ती आताच्या शंकराचार्यांनी पुरती तळापर्यंत नेली आहे. त्यांना धर्माचे नेते म्हणून आपल्या जबाबदाऱ्या समजत नाहीत, समाजाचे सेवक म्हणून त्यांच्याकडे येणारे उत्तरदायित्वही कळत नाही. झालेच तर त्यांना ब्रह्मचर्याएवढ्याच गृहस्थाश्रमाच्या मर्यादाही कळत नाहीत. त्यातून त्यांना हिंदूच नव्हे तर कोणत्याही धर्मातील स्त्रियांच्या शरीरस्वास्थ्याविषयी काहीएक सहानुभूती वा आस्थाही नाही. सध्या देशात एक पुरुष व एक स्त्री अशा मॉनॉगॉमस कुटुंबांचा कायदा आहे आणि तो हिंदूंएवढाच अल्पसंख्यकांनाही लागू करा अशी मागणी आहे. जास्तीची मुले वाढविणे हे गरीबच नव्हे तर मध्यमवर्गीयांनाही आता आपत्तीजनक वाटू लागले आहे. मुलांचे पालनपोषण, शिक्षण व रोजगार या आजच्या पालकांसमोरच्या मोठ्या समस्या आहेत. मात्र त्याची काळजी करण्याची या वासुदेवानंदांसारख्या शंकराचार्य म्हणविणाऱ्यांना गरज नाही. जे स्वत:ला जमत नाही वा करायचे नाही ते जगाला करायला सांगून मोकळे होणे हा तसाही सगळ््या गादीधारक गुरुंचा प्रस्थापित व्यवसाय आहे. या गादीधारकांना लाभणारे भगतही दुर्दैवाने आपल्या साक्षर समाजात भरपूर आहेत. त्यातले काही या शंकराचार्यांच्या आदेशानुसार कामाला लागले असण्याची शक्यताही नाकारता येणारी नाही. (संघाच्या सुदर्शन यांनी जेव्हा पाच पोरांचा आदेश आपल्या स्वयंसेवकांना दिला तेव्हा केरळातल्या एका भगिनीने त्यांना पत्र पाठवून आपली व्यथा कळविली होती. त्या पत्रात ‘आता माझे वय झाले आहे, अन्यथा मी आपला आदेश अमलात आणला असता’ असे तिने म्हटले होते.) भारतीय समाज हा मुळातच बऱ्यापैकी धर्मश्रद्ध व गुरु परंपरेला वंदन करणारा आहे. त्याला आपले गुरू हे दैवत स्थानीच वाटत आले आहेत. गुरूची आज्ञा वा संदेश हा या समाजाला धर्माज्ञेएवढाच पूज्य वाटत आला आहे. अशा समाजात अंधश्रद्धा नेहमीच बळकट असतात. या भाबडेपणाचा फायदा घेणारे व त्यावर आपली धनसंपदा वाढविणारे आणि आपल्या गाद्या बळकट करीत नेणारे बुवा आणि बाबा आता देशाच्या चांगल्या परिचयाचे झाले आहेत. तरीही शंकराचार्य या नामाभिधानाला हिंदू समाजात आजही मोठी प्रतिष्ठा व सन्मान आहे. हे नाव लावणाऱ्यांनी जास्तीतजास्त जबाबदारीच्या व समाजभानाच्या दृष्टीने वागले व बोलले पाहिजे ही अपेक्षा स्वाभाविक म्हणावी अशी आहे. त्यातून ही माणसे जेव्हा मुख्यमंत्री व त्यांच्यासारख्या महत्त्वाच्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाषणे करतात तेव्हा त्यांनी किमान आपले वक्तव्य हास्यास्पद व टिंगलीचा विषय होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. वासुदेवानंद महत्त्वाचे नसतात, त्यांनी धारण केलेले शंकराचार्य हे नाव कमालीच्या आदराचे असते. किमान त्या नावाला जागून आपण जबाबदारीने बोलले पाहिजे हे या वासुदेवानंदाला समजले पाहिजे. या माणसांना त्यांची जबाबदारी कळत नसेल तर मुख्यमंत्र्यांसारख्या तेथे हजर नेत्यांनी त्यांना खोडून काढण्याचे धाडस दाखविले पाहिजे. राज्यकर्ते असे धाडस करणार नसतील तर वासुदेवानंदाला तेही सामील आहेत असेच म्हणणे भाग पडेल. धर्मसंसद किंवा महाकुंभ यासारख्या सर्वसामान्यांच्या मेळाव्यात अशी माणसे का आणली जातात, हाच त्यांच्या आयोजकांना आपण विचारावा असा प्रश्न आहे. धर्माचा आचार्य हा नुसता धार्मिक असून चालत नाही. त्याला एका सामाजिक उत्तरदायित्वाचीही जोड असावी लागते. त्याला राजकारण आणि समाजव्यवस्था यांचेही भान असावे लागते. त्याहून महत्त्वाची बाब, त्याला आपल्या समाजातील स्त्रियांच्या आताच्या अवस्थेचीही पुरेशी माहिती असावी लागते. ती न घेता तिच्यावर दहा पोरांना जन्म देण्याची अशी सक्ती लादणे ही बाब ती घालू पाहणारे वासुदेवानंद हे इसम शंकराचार्याच्या नामाभिधानाला पुरेसे योग्य नाहीत, असेच म्हणणे भाग आहे.